शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आटपाडी, दिघंची परिसरात पाऊस

By admin | Updated: September 5, 2015 23:33 IST

परतीचा पाऊस : बळिराजा काहीसा सुखावला

आटपाडी/दिघंची : आटपाडी तालुका डोळ्यात जीव आणून ज्याची वाट पहात होता, तो परतीचा पाऊस शनिवारी रात्री अक्षरश: बरसला. दुष्काळाच्या धास्तीने हतबल झालेला बळिराजा आटपाडी, दिघंची, राजेवाडी परिसरात पावसाच्या दमदार हजेरीने काहीसा सुखावला आहे. पावसाच्या पहिल्या सरीच्या आगमनाची खबरबात घेण्यासाठी खानापूर-आटपाडीतील गावागावात रात्री उशिरापर्यंत फोनाफोनी सुरू होती. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते; पण हवेत उकाडाही जाणवत होता. सायंकाळी ढग दाटून आले आणि रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा दिघंची परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही वेळातच विठलापूर, आटपाडी, राजेवाडी परिसरातही सरी कोसळू लागल्या. पाऊस सुरू होताच परिसरातील आटपाडी, दिघंचीसह परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. तीन तास पडलेल्या जोराच्या पावसाने परिसरात पाणीच पाणी झाले होते. दुष्काळाच्या छायेत वावरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या कालावधीनंतर पावसाच्या दमदार हजेरीमुळे दिलासा मिळाला आहे. पावसाचे, पाण्याचे मोल संपूर्ण तालुका चांगलेच जाणतो. रात्री उशिरापर्यंत बच्चे कंपनीसह वडिलधाऱ्यांनीही या बरसातीचा आनंद लुटला. (वार्ताहर)