शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

वीर मावळ्यांचे विचार आत्मसात करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

रामापूर : ‘छत्रपती शिवप्रभूंसमवेत स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या समाजातील अठरापगड जाती-धर्मातील वीर मावळ्यांचे कर्तृत्व हे महान आहेच. त्यांच्या कर्तृत्वाला आणि ...

रामापूर : ‘छत्रपती शिवप्रभूंसमवेत स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या समाजातील अठरापगड जाती-धर्मातील वीर मावळ्यांचे कर्तृत्व हे महान आहेच. त्यांच्या कर्तृत्वाला आणि बलिदानाला न विसरता युवा पिढीने वीर मावळ्यांचे आचार, विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन नागोजीराव पाटणकर वाचनालयाचे अध्यक्ष चंद्रहार ऊर्फ बकाजी निकम यांनी केले.

पाटण येथील नागोजीराव पाटणकर वाचनालयात नरवीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोयना शिक्षण संस्थेचे सचिव अमरसिंह पाटणकर, माजी सरपंच चंद्रकांत मोरे, यशवंतराव जगताप, आबासाहेब भोळे, विक्रांत कांबळे उपस्थित होते.

ग्रंथपाल संजय इंगवले म्हणाले, ‘मंदिराची सुंदरता ही केवळ मंदिराच्या कळसाकडे पाहिल्यावर लक्षात येत नाही तर मातीखाली दडलेल्या पायातील ज्या भक्कम पायरीवर ते मंदिर उभे आहे, त्या पायरीकडे पाहिल्यानंतरच त्याची सुंदरता, भव्यता लक्षात येते. त्याप्रमाणेच शिवप्रभूंच्या हिंदवी स्वराजाची इमारतदेखील नेताजी, तानाजी, येसाजी, बाजी, जिवाजी, मुरारबाजी, कोंडाजी, शिवा काशीद यांच्यासारख्या मावळ्यांच्या बलिदानाच्या पायावरच उभी राहिली आहे. म्हणूनच आज शिवप्रभूंच्या कार्याइतकेच स्वराज्याच्या या शिलेदारांच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण, चिंतन होणे खूप गरजेचे आहे.’

यावेळी अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. ग्रंथपाल संजय इंगवले यांनी स्वागत केले तर दत्तात्रय कवडे यांनी आभार मानले.

फोटो : 14 केआरडी 04

कॅप्शन : पाटण येथे बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशिद यांच्या प्रतिमेला चंद्रहार निकम, अमरसिंह पाटणकर, संजय इंगवले यांनी अभिवादन केले.