शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

गाढवांची लगीनघाई..!

By admin | Updated: August 26, 2015 21:38 IST

पावसासाठी गर्दभ विवाह : तब्बल साडेचार हजार रूपये खर्चून साताऱ्यात रंगला सोहळा

सातारा : पाऊस पडावा यासाठी माणसं नानाविध उपाय योजतायत. कुठं महादेवाला कोंडून ठेवताय तर कुठं शिवलिंग डोक्यावर घेऊन गावभर आरोळ्या देत वरुणराजाची आळवणी करतायत. कुणी देवही पाण्यात ठेवतंय... पण एवढे सगळे यत्न करूनही मेघराजाला काही केल्या पाझर फुटेना. असं म्हटलं जातं की सगळं उपाय करून थकल्यावर माणसाला गाढवाचेही पाय धरावे लागतात. अगदी तस्संच काहीसंं साताऱ्यात घडलं. निसर्गापुढं हात टेकलेल्या माणसानं चक्क गाढवाचे पाय थरले अन् बोहल्यावरउभं करून दोन गाढवांचं लग्न लावून चांगल्या पावसाची प्रार्थना केली.स्थळ जुनी भाजीमंडई, रविवार पेठ, सातारा. वेळ अकरा वाजून पाच मिनिटांची. एरव्ही बाजारासाठी येणाऱ्या ग्राहक-विक्रेत्यांनी गर्दीनं बहरलेला हा परिसर बुधवारी मात्र एका वेगळ्याच कारणानं गजबजून गेला होता. लोकांची लगबग सुरू होती... पण बाजारासाठी नव्हे तर एका आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्यासाठी. पावसानं पाठ फिरविल्यामुळं वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी येथील रहिवाशांनी चक्क गाढवाचा विवाहसोहळा आयोजित केलेला. तहसील कार्यालयासमोर गाढवाच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. दोन्ही बाजूकडील वऱ्हाडी मंडळीही उपस्थित होती. अशातच साजशृंगार केलेली लाजरी नववधू आणि डोक्यावर टोपी, मुंडावळ्या बांधलेला रुबाबदार वर यांना वाजतगाजत विवाहस्थळी आणण्यात आले. भरजरी लाल रंगाच्या चुनरीत चेहरा लपवून वधू गाढव आपल्या भावी सोबत्याबरोबर लाजत-मुरडत चाललेली पाहून रस्त्यावरील वाहनेही थबकली. सर्व तयारी झाल्यानंतर अकरा वाजून पाच मिनिट या शुभमुहूर्तावर लग्नाला प्रारंभ झाला. अशा या अनोख्या लग्नाची ही तिसरी गोष्ट. तिसरी यासाठी की यापूर्वी दोन वर्षे अशाच प्रकारे रविवार पेठेतील जुन्या भाजीमंडईतील ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावल्यामुळं चक्क पाऊस पडल्याचा दावा केला आहे. यंदा या लग्न समारंभासाठी लोकवर्गणी काढण्यात आली. प्रत्येकाने दहा-वीस रुपये दिले.लग्नसमारंभास संजय कांबळे, राजू कांबळे, तानाजी बडेकर, मुन्ना फरास, अजय घाडगे, मनोज घाडगे, रवी सोलंकी, जया शिवघण, शोभा रणपिसे, मालन रणपिसे, मीना पिसे व पेठेतील सुमारे साठ ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)ढोलीबाजा अन् आंतरपाटया लग्नासाठी साडेचार हजार रुपये खर्च आला. दीड हजार रुपये भाडे देऊन गाढवं आणली होती. याशिवाय गाढवांना सांभाळणारे, ढोलीबाजा, हारतुरे, चुनरी, टोपी, आंतरपाट व इतर असा एकूण साडेचार हजार रुपयांचा खर्च या लग्नासाठी करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दोन्ही गाढवांमध्ये आंतरपाट धरून मंगलाष्टक म्हणण्यात आल्या. वधू गाढवाच्या मागे मुलीचा मामा म्हणून एकजण हातात लिंबू खोवलेला सुरा धरून उभा होता. नवदाम्पत्यावर अक्षतांचा वर्षाव केला अन् वाजंत्रींनी वाद्यांचा गजर केला. लग्नाची अशीही दंतकथा...मेघ हा पृथ्वीचा पती असल्याची दंतकथा सांगितली जाते. म्हणूनच पाऊस आला की, ‘धरणी माय.. तुझा पती आला गं बाय’ असे म्हटले जाते. मेघ बरसत नाही म्हणून त्याची भार्या पृथ्वी हिचं लग्न गाढवाशी लावून खिजवलं जातं. जेणेकरून आपल्या पत्नीच्या रक्षणासाठी मेघराजा धावून येईल, असा एक समज आहे.