शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कऱ्हाड उत्तरच्या आमदारांना घरी बसवा

By admin | Updated: August 3, 2014 01:53 IST

उंब्रज : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात बाळासाहेब पाटील यांच्यावर खरमरीत टीका

उंब्रज : ‘कऱ्हाड उत्तरचे आमदार विधानसभेत बोलताना कधीही दिसले नाहीत. तेव्हा अशा मुक्या-बहिऱ्या लोकप्रतिनिधीला घरी बसविणेच योग्य आहे,’ अशी खरमरीत टीका आमदार बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आली. उंब्रज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा झाला. यावेळी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, कऱ्हाड तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार शेट्टी म्हणाले, ‘साखरसम्राट हे राक्षस आहेत. त्यांना संपविण्यासाठी लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताचे ब्रह्मास्त्र दिले आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करून सर्वसामान्यांच्या मानगुटीवर गेली पंधरा वर्षे बसलेले आघाडीचे सरकार पाडावे. साखर कारखान्याच्या माध्यमातून बांडगुळे तयार झाली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना अज्ञानात ठेवण्याचे काम केले आहे. येथील शेतकरी साखर कारखान्याकडून मिळणारी साखर व चेअरमनकडून मिळणारे चहा व बिस्कीट या पुरताच मर्यादित होता; परंतु आता शेतकरी जागे झाले आहेत.’ प्रदेशाध्यक्ष खोत म्हणाले, ‘लोकशाहीत झोपडपट्टीत राहणारा माणूस देशाचा राजा ठरवू शकतो. येथे शेतकरी विरोधात गेला की त्याला अडवले जातेय. वाळूमाफिया, गुंडांना हाताशी धरले आहे. घोटाळे करणाऱ्या सगळ्यांना येरवड्याच्या तुरुंगात घालण्यासाठी व आरपारची लढाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे.’ मनोज घोरपडे म्हणाले, ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखाने उसाला दर देत आहेत. परंतु सातारा जिल्ह्यातील कारखाने दर जाहीर करत नाहीत. आम्ही येथील संघटित दहशतवाद मोडून काढणार आहे. शेतकऱ्यावर अन्याय करू दिला जाणार नाही. खपवूनही घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही विरोधकांचा दबाव घेत नाही. वेळ पडल्यास दबाव टाकू शकतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भविष्यात दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत.’ दीपक साबळे यांनी प्रास्ताविक केले. अंजन घाडगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)