शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

बारामतीच्या पाण्याचा जाब रामराजेंना विचारा!

By admin | Updated: March 8, 2015 00:15 IST

उदयनराजेंचा घणाघात : लोलकमंत्रिपद टिकवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घास घेतला हिरावून; खंडाळ्याचे पाणी परजिल्ह्याला देण्याचे घोर पाप

सातारा : ‘दैव देते आणि कर्म नेते, हे कशाला म्हणतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नीरा-देवघर प्रकल्पाच्या पाणी वाटप. प्रकल्प अहवालानुसार जर पाणीवाटप ठेवले असते तर बारामती आणि इंदापूरला पाणी मिळाले नसते. बारामतीला पाणी मिळाले नसते तर आपले लोलकमंत्रिपद राहिले नसते म्हणून पूर्वीच्या नियोजनावर बोळा फिरवून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढण्याचा कृतघ्नपणा तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी केला आहे. आता यांनाच लोकांनी जाब विचारावा,’ असा घणाघाती हल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता केला. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ब्रिटिशकालीन भाटघर धरण व त्यानंतर बांधलेल्या वीर धरणाचे पाणी भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या दुष्काळी तालुक्यांना नीरा डावा आणि उजव्या कालव्याद्वारे अनुक्रमे ४३ व ५७ टक्के या प्रमाणात वाटप करण्याचे प्रकल्प अहवालानुसार नियोजित होते. परंतु, तत्कालीन कृष्णा खोऱ्याचे जलसंपदा मंत्र्यांनी आपल्या अधिकारात नीरा-देवघर धरणातील पाण्याच्या वाटपाचे नियोजन बदलले. डाव्या कालव्याचे ४३ ऐवजी ६० टक्के आणि उजव्या कालव्याचे ५७ ऐवजी ४० टक्के नियोजन केले. त्यामुळे नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या खंडाळा, शिरवळ, फलटण या भागांतील व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येण्यापासून वंचित राहिल्या आहेत. नीरा-देवघर धरणाचा उजवा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा आहे. अद्याप फक्त ३५ किलोमीटरचेच काम झालेले आहे. या खात्याच्या पूर्वीच्या मंत्र्यांने या प्रकल्पास पुरेसा निधी दिला नाही. पुढची कामे रखडवून सोयीस्कररीत्या खंडाळा तालुक्याचे पाणी बारामती आणि इंदापूर या तालुक्यांना देण्याचे पाप केले.आता त्यासाठी मूळ नियोजनानुसार पाणी वाटपाचे फेर नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकल्प अहवालानुसार नीरा डाव्या व उजव्या कालव्याचे अनुक्रमे ४३ व ५७ टक्के नियोजन पूर्ववतच करावे लागणार आहे. पूर्वीच्या मंत्र्यांनी प्रकल्पास पुरेसा निधी दिला नाही. पुढील कामे त्यांनीच जाणीवपूर्वक रखडवून ठेवली. पाण्याचा वापर होत नाही म्हणून खंडाळा तालुक्याचे पाणी बारामती, इंदापूर तालुक्यांना देण्याचे घोर पाप या लोकांनी केले आहे. या कर्मदरिद्री नियोजनाचा जाब आता शेतकऱ्यांनी त्यांना विचारला पाहिजे,’ असेही उदयनराजेंनी माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता म्हटले आहे. स्वार्थांध व्यक्तींनी नियोजन बदलले... खंडाळा तालुक्यातील गावडेवाडी, शेखमिरवाडी, वाघोशी या उपसा सिंचन योजना प्रस्तावित केल्या आहेत. यामुळे जवळपास २१ हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल. परंतु, दुर्दैवाने स्वार्थांध व्यक्तींनी पाणी वाटपाचे नियोजन बदलले. या योजनांस निधी उपलब्ध होत नाही. यामळे सर्व कामे प्रलंबित आहेत. गेल्या पाच वर्षांत नीरा-देवघर प्रकल्पासाठी १०८ कोटींचा निधी मिळाला. परंतु, ही कामे पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटींची गरज आहे. हा निधी मिळविण्यासाठी केंद्रीय जलआयोगाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.