शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

बारामतीच्या पाण्याचा जाब रामराजेंना विचारा!

By admin | Updated: March 8, 2015 00:15 IST

उदयनराजेंचा घणाघात : लोलकमंत्रिपद टिकवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घास घेतला हिरावून; खंडाळ्याचे पाणी परजिल्ह्याला देण्याचे घोर पाप

सातारा : ‘दैव देते आणि कर्म नेते, हे कशाला म्हणतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नीरा-देवघर प्रकल्पाच्या पाणी वाटप. प्रकल्प अहवालानुसार जर पाणीवाटप ठेवले असते तर बारामती आणि इंदापूरला पाणी मिळाले नसते. बारामतीला पाणी मिळाले नसते तर आपले लोलकमंत्रिपद राहिले नसते म्हणून पूर्वीच्या नियोजनावर बोळा फिरवून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढण्याचा कृतघ्नपणा तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी केला आहे. आता यांनाच लोकांनी जाब विचारावा,’ असा घणाघाती हल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता केला. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ब्रिटिशकालीन भाटघर धरण व त्यानंतर बांधलेल्या वीर धरणाचे पाणी भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या दुष्काळी तालुक्यांना नीरा डावा आणि उजव्या कालव्याद्वारे अनुक्रमे ४३ व ५७ टक्के या प्रमाणात वाटप करण्याचे प्रकल्प अहवालानुसार नियोजित होते. परंतु, तत्कालीन कृष्णा खोऱ्याचे जलसंपदा मंत्र्यांनी आपल्या अधिकारात नीरा-देवघर धरणातील पाण्याच्या वाटपाचे नियोजन बदलले. डाव्या कालव्याचे ४३ ऐवजी ६० टक्के आणि उजव्या कालव्याचे ५७ ऐवजी ४० टक्के नियोजन केले. त्यामुळे नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या खंडाळा, शिरवळ, फलटण या भागांतील व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येण्यापासून वंचित राहिल्या आहेत. नीरा-देवघर धरणाचा उजवा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा आहे. अद्याप फक्त ३५ किलोमीटरचेच काम झालेले आहे. या खात्याच्या पूर्वीच्या मंत्र्यांने या प्रकल्पास पुरेसा निधी दिला नाही. पुढची कामे रखडवून सोयीस्कररीत्या खंडाळा तालुक्याचे पाणी बारामती आणि इंदापूर या तालुक्यांना देण्याचे पाप केले.आता त्यासाठी मूळ नियोजनानुसार पाणी वाटपाचे फेर नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकल्प अहवालानुसार नीरा डाव्या व उजव्या कालव्याचे अनुक्रमे ४३ व ५७ टक्के नियोजन पूर्ववतच करावे लागणार आहे. पूर्वीच्या मंत्र्यांनी प्रकल्पास पुरेसा निधी दिला नाही. पुढील कामे त्यांनीच जाणीवपूर्वक रखडवून ठेवली. पाण्याचा वापर होत नाही म्हणून खंडाळा तालुक्याचे पाणी बारामती, इंदापूर तालुक्यांना देण्याचे घोर पाप या लोकांनी केले आहे. या कर्मदरिद्री नियोजनाचा जाब आता शेतकऱ्यांनी त्यांना विचारला पाहिजे,’ असेही उदयनराजेंनी माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता म्हटले आहे. स्वार्थांध व्यक्तींनी नियोजन बदलले... खंडाळा तालुक्यातील गावडेवाडी, शेखमिरवाडी, वाघोशी या उपसा सिंचन योजना प्रस्तावित केल्या आहेत. यामुळे जवळपास २१ हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल. परंतु, दुर्दैवाने स्वार्थांध व्यक्तींनी पाणी वाटपाचे नियोजन बदलले. या योजनांस निधी उपलब्ध होत नाही. यामळे सर्व कामे प्रलंबित आहेत. गेल्या पाच वर्षांत नीरा-देवघर प्रकल्पासाठी १०८ कोटींचा निधी मिळाला. परंतु, ही कामे पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटींची गरज आहे. हा निधी मिळविण्यासाठी केंद्रीय जलआयोगाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.