शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

बारामतीच्या पाण्याचा जाब रामराजेंना विचारा!

By admin | Updated: March 8, 2015 00:15 IST

उदयनराजेंचा घणाघात : लोलकमंत्रिपद टिकवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घास घेतला हिरावून; खंडाळ्याचे पाणी परजिल्ह्याला देण्याचे घोर पाप

सातारा : ‘दैव देते आणि कर्म नेते, हे कशाला म्हणतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नीरा-देवघर प्रकल्पाच्या पाणी वाटप. प्रकल्प अहवालानुसार जर पाणीवाटप ठेवले असते तर बारामती आणि इंदापूरला पाणी मिळाले नसते. बारामतीला पाणी मिळाले नसते तर आपले लोलकमंत्रिपद राहिले नसते म्हणून पूर्वीच्या नियोजनावर बोळा फिरवून सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढण्याचा कृतघ्नपणा तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी केला आहे. आता यांनाच लोकांनी जाब विचारावा,’ असा घणाघाती हल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता केला. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ब्रिटिशकालीन भाटघर धरण व त्यानंतर बांधलेल्या वीर धरणाचे पाणी भोर, खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या दुष्काळी तालुक्यांना नीरा डावा आणि उजव्या कालव्याद्वारे अनुक्रमे ४३ व ५७ टक्के या प्रमाणात वाटप करण्याचे प्रकल्प अहवालानुसार नियोजित होते. परंतु, तत्कालीन कृष्णा खोऱ्याचे जलसंपदा मंत्र्यांनी आपल्या अधिकारात नीरा-देवघर धरणातील पाण्याच्या वाटपाचे नियोजन बदलले. डाव्या कालव्याचे ४३ ऐवजी ६० टक्के आणि उजव्या कालव्याचे ५७ ऐवजी ४० टक्के नियोजन केले. त्यामुळे नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या खंडाळा, शिरवळ, फलटण या भागांतील व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली येण्यापासून वंचित राहिल्या आहेत. नीरा-देवघर धरणाचा उजवा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा आहे. अद्याप फक्त ३५ किलोमीटरचेच काम झालेले आहे. या खात्याच्या पूर्वीच्या मंत्र्यांने या प्रकल्पास पुरेसा निधी दिला नाही. पुढची कामे रखडवून सोयीस्कररीत्या खंडाळा तालुक्याचे पाणी बारामती आणि इंदापूर या तालुक्यांना देण्याचे पाप केले.आता त्यासाठी मूळ नियोजनानुसार पाणी वाटपाचे फेर नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रकल्प अहवालानुसार नीरा डाव्या व उजव्या कालव्याचे अनुक्रमे ४३ व ५७ टक्के नियोजन पूर्ववतच करावे लागणार आहे. पूर्वीच्या मंत्र्यांनी प्रकल्पास पुरेसा निधी दिला नाही. पुढील कामे त्यांनीच जाणीवपूर्वक रखडवून ठेवली. पाण्याचा वापर होत नाही म्हणून खंडाळा तालुक्याचे पाणी बारामती, इंदापूर तालुक्यांना देण्याचे घोर पाप या लोकांनी केले आहे. या कर्मदरिद्री नियोजनाचा जाब आता शेतकऱ्यांनी त्यांना विचारला पाहिजे,’ असेही उदयनराजेंनी माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता म्हटले आहे. स्वार्थांध व्यक्तींनी नियोजन बदलले... खंडाळा तालुक्यातील गावडेवाडी, शेखमिरवाडी, वाघोशी या उपसा सिंचन योजना प्रस्तावित केल्या आहेत. यामुळे जवळपास २१ हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल. परंतु, दुर्दैवाने स्वार्थांध व्यक्तींनी पाणी वाटपाचे नियोजन बदलले. या योजनांस निधी उपलब्ध होत नाही. यामळे सर्व कामे प्रलंबित आहेत. गेल्या पाच वर्षांत नीरा-देवघर प्रकल्पासाठी १०८ कोटींचा निधी मिळाला. परंतु, ही कामे पूर्ण करण्यासाठी एक हजार कोटींची गरज आहे. हा निधी मिळविण्यासाठी केंद्रीय जलआयोगाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.