शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

तारळी नदीपात्रात कृत्रिम पूरस्थिती!

By admin | Updated: January 6, 2017 22:59 IST

दरवाजाचे बॉनेट तुटले : धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग

तारळे : तारळी धरणाच्या निरीक्षण गॅलरीजवळील दरवाजाचे बॉनेट शुक्रवारी सकाळी अचानक तुटले. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कामाच्या दर्जावरून तारळी धरण अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. ५.८५ टीएमसी क्षमतेच्या तारळी धरणात सध्या ४.२० टीएमसी साठा आहे. या धरणाच्या निरीक्षण गॅलरीतून शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक मोठा आवाज करत पाण्याचा लोट बाहेर पडताना दिसू लागला. ही बातमी काही वेळात वाऱ्यासारखी परिसरात पसरली. तारळी नदीत पावसाळ्यासारखे गढूळ पाणी वाहत येत असल्याचे दिसू लागल्याने अनेक अफवा पसरल्या. त्यामुळे परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी धरणाच्या भिंतीकडे धाव घेतली.व्हॉल्व्हमधून भरपूर प्रमाणात पाणी नदीपात्रातून वाहून जात आहे. ही माहिती सोशल मीडियावरून पसरल्यानंतर तारळी, पाली, उंब्रजसह अनेक ठिकाणचे पूल व गावाजवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर जाऊन नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी खातरजमा करून घेतली.घटनेची माहिती मिळताच सहायक अभियंता हेमंत घोलप यांनी कर्मचाऱ्यांसह धरणाकडे धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पर्यायी दरवाजा बसविण्यास सुरुवातही केली; परंतु तो दरवाजा वापरात नसल्याने गंजलेला आहे. त्यामुळे तो मनुष्यबळाचा वापर करून खाली जात नव्हता. त्यामुळे विद्युत शक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे तज्ज्ञांना बाहेरून बोलाविले आहे. हे पथक आल्यानंतरच दरवाजाचे काम होणार आहे. (वार्ताहर)धरणाच्या नियंत्रण व्हॉल्व्हच्या आतील मधल्या दरवाजाचे बॉनेट पाण्याच्या दाबामुळे तुटले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये. यांत्रिक विभागाच्या मदतीने दरवाजा बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात लवकरच यश येईल. - हेमंत घोलप, सहायक अभियंता, तारळी धरणआपत्कालीन विभागाचा गोंधळदरवाजाचा व्हॉल्व्ह अचानक तुटल्याने पूर परिस्थिती उद्भवली होती. या परिस्थितीत लोखंडी दरवाजा बसविण्याचा पर्याय आहे; परंतु याकडे कधीही ढुंकून न पाहिल्याने दरवाजा बसविण्यात या विभागाला अनेक अडचणी येत होत्या. विद्युत ताकद कमी पडत असल्याचे काहीजण, तर काहीजण तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत होते. खंडोबा यात्रेत खबरदारीच्या सूचनापालीच्या श्री क्षेत्र खंडोबा देवाची यात्रा चार दिवसांवर आली असून, नदीपात्रातील वाळवंटात लहान-मोठी शेकडो दुकाने थाटण्यात व्यावसायिक मग्न आहेत. त्यातच ही घटना घडल्याने पालमधील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. त्यामुळे यात्रा कमिटी, प्रशासन व ग्रामपंचायतीने त्यांना खबरदारीच्या सूचना देत उपाय योजिले आहेत.