शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
4
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
7
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
8
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
9
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
10
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
11
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
12
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
14
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
15
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
16
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
17
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
18
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
19
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

तारळी नदीपात्रात कृत्रिम पूरस्थिती!

By admin | Updated: January 6, 2017 22:59 IST

दरवाजाचे बॉनेट तुटले : धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग

तारळे : तारळी धरणाच्या निरीक्षण गॅलरीजवळील दरवाजाचे बॉनेट शुक्रवारी सकाळी अचानक तुटले. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कामाच्या दर्जावरून तारळी धरण अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. ५.८५ टीएमसी क्षमतेच्या तारळी धरणात सध्या ४.२० टीएमसी साठा आहे. या धरणाच्या निरीक्षण गॅलरीतून शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक मोठा आवाज करत पाण्याचा लोट बाहेर पडताना दिसू लागला. ही बातमी काही वेळात वाऱ्यासारखी परिसरात पसरली. तारळी नदीत पावसाळ्यासारखे गढूळ पाणी वाहत येत असल्याचे दिसू लागल्याने अनेक अफवा पसरल्या. त्यामुळे परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी धरणाच्या भिंतीकडे धाव घेतली.व्हॉल्व्हमधून भरपूर प्रमाणात पाणी नदीपात्रातून वाहून जात आहे. ही माहिती सोशल मीडियावरून पसरल्यानंतर तारळी, पाली, उंब्रजसह अनेक ठिकाणचे पूल व गावाजवळील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर जाऊन नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी खातरजमा करून घेतली.घटनेची माहिती मिळताच सहायक अभियंता हेमंत घोलप यांनी कर्मचाऱ्यांसह धरणाकडे धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पर्यायी दरवाजा बसविण्यास सुरुवातही केली; परंतु तो दरवाजा वापरात नसल्याने गंजलेला आहे. त्यामुळे तो मनुष्यबळाचा वापर करून खाली जात नव्हता. त्यामुळे विद्युत शक्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे तज्ज्ञांना बाहेरून बोलाविले आहे. हे पथक आल्यानंतरच दरवाजाचे काम होणार आहे. (वार्ताहर)धरणाच्या नियंत्रण व्हॉल्व्हच्या आतील मधल्या दरवाजाचे बॉनेट पाण्याच्या दाबामुळे तुटले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये. यांत्रिक विभागाच्या मदतीने दरवाजा बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात लवकरच यश येईल. - हेमंत घोलप, सहायक अभियंता, तारळी धरणआपत्कालीन विभागाचा गोंधळदरवाजाचा व्हॉल्व्ह अचानक तुटल्याने पूर परिस्थिती उद्भवली होती. या परिस्थितीत लोखंडी दरवाजा बसविण्याचा पर्याय आहे; परंतु याकडे कधीही ढुंकून न पाहिल्याने दरवाजा बसविण्यात या विभागाला अनेक अडचणी येत होत्या. विद्युत ताकद कमी पडत असल्याचे काहीजण, तर काहीजण तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत होते. खंडोबा यात्रेत खबरदारीच्या सूचनापालीच्या श्री क्षेत्र खंडोबा देवाची यात्रा चार दिवसांवर आली असून, नदीपात्रातील वाळवंटात लहान-मोठी शेकडो दुकाने थाटण्यात व्यावसायिक मग्न आहेत. त्यातच ही घटना घडल्याने पालमधील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. त्यामुळे यात्रा कमिटी, प्रशासन व ग्रामपंचायतीने त्यांना खबरदारीच्या सूचना देत उपाय योजिले आहेत.