शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ‘बाणाची’ आतषबाजी

By admin | Updated: October 23, 2014 00:10 IST

औंध : ऐन दिवाळीत वातावरण तंग

औंध : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औंध जिल्हा परिषद गटातील नेत्यांना या निवडणूक निकालाचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.औंध जिल्हा परिषद गटात गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचे कायम वर्चस्व राहले आहे; परंतु या निवडणुकीत घड्याळ चालू ठेवण्यात त्यांना अपयश आले आहे. तसेच विधानपरिषदेचे आमदार प्रभाकर घार्गे यांचा ही हाच जिल्हा परिषद गट आहे. त्यामुळे बालेकिल्ला मजबूत राहील, अशी सर्वांची अपेक्षा होती. औंध जिल्हा परिषद गटातील एकूण मतांपैकी रणजित देधमुख यांनी ४,६६७ मते घेतली, तर जयाकुमार गोरेयांनी सुतळी बॉम्ब लावून ४,१८६ मते मिळविली. पाठोपाठ शेखर गोरेंनी ‘लक्ष्मी’फटाका लावून ४,०६४ मते तर सदाशिव पोळ यांना २,५५४ मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीची जिल्हा परिषद गटात झालेली पिछेहाट ही नेत्यांनी आत्मपरीक्षण करून बालेकिल्ला अभेद्य ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकूणच बाणाने या गटात केलेल्या आतषबाजीची सर्वत्र खुमासदार चर्चा सुरू आहे. तसेच शेखर गोरेंनी पहिल्याच प्रयत्नात बालेकिल्ल्याला लावलेला अ‍ॅटोम बॉम्ब हा सुध्दा विषय महत्त्वाचा आहे. जयाकुमार गोरे दोन नंबरची मते घेतील, हा सर्वांचाच अंदाज होता. मात्र, इतर बाबतीत सर्वांचा अंदाज ‘लवंगी फटाका’ ठरला. (वार्ताहर)रणजित देशमुख यांनी तालुक्याचा स्वाभिमान जागृत ठेवून खुद्द औंधमध्ये देखील बाणाने आतषबाजी केली आहे.