शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

तमिळनाडूतील ‘श्रीफळां’चे जिल्ह्यात आगमन

By admin | Updated: March 14, 2017 22:52 IST

दर स्थिर : जत्रा, लग्नसराईच्या तोंडावर आवक वाढली; सातारा मार्केट यार्डात आठवड्याला ७५ हजार नारळ

सातारा : जत्रा आणि लग्नसराईचा मुहूर्त तोंडावर आला असून, जिल्ह्यात नारळाची आवक हळूहळू वाढू लागली आहे. विशेष म्हणजे तमिळनाडू राज्यातून नारळांची आवक होत असून, सातारा मार्केट यार्डात आठवड्याला तब्बल ७५ हजार नारळ आणले जात आहेत. नोटाबंदीचा परिणाम या व्यवसायावर झाला असल्याने दोन महिन्यांपासून नारळाचे दरही स्थिर आहेत.ज्याप्रमाणे चहापानाशिवाय पाहुण्यांचा पाहुणचार पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे नारळाशिवाय स्वागत, मानपानाचा कार्यक्रमही पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे नारळाला शुभकार्यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. नारळाचा उपयोग हा प्रामुख्याने खाद्यप्रदार्थ बनविण्याबरोबरच मानपानासाठी केला जातो. नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, जत्रा, लग्नसराईत तर नारळाला प्रचंड मागणी असते. या काळात नारळाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते.नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यात नारळांची आवक मोठ्या प्रमाणात घटली. परिणामी बाराशे रुपये प्रति शेकडा या दरावरून नारळ थेट आठशे रुपयांवर आला. आवकही कमी आणि मागणीही कमी असे चित्र नोटाबंदीमुळे निर्माण झाले होते. मात्र, सध्या लग्नसराई व जत्रांचा हंगाम सुरू होत असल्याने नारळाला मागणी वाढत चालली असून, याचे दरही स्थिरावले आहेत.सातारा जिल्ह्यात सध्या तमिळनाडू राज्यातून नारळांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. नारळाचे आठवड्याला तीन तर महिन्याकाठी १२ ट्रक तमिळनाडूहून साताऱ्यात येत आहेत. सध्या अकराशे रुपये प्रति शेकडा असा दर असून, जिल्ह्यात विविध ठिकाणांहून नारळाला मागणी होत आहे. आगामी काळात आवक वाढणार आहे. तसेच नारळालाही मागणी राहणार आहे. (प्रतिनिधी)एका महिन्यात तीन लाख नारळ... सातारा येथील मार्केट यार्डात आठवड्याला तीन तर महिन्याला १२ ते १३ ट्रक नारळ दाखल होत आहेत. एका ट्रकात सुमारे २५ हजार इतके नारळ असतात. म्हणजेच महिन्याला सरासरी तीन लाख नारळांची विक्री एका सातारा शहरातून होत आहे.