शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या सावलीखाली तब्बल १५० कुटुंबीय !

By admin | Updated: June 23, 2016 01:17 IST

सातारा पालिका : मालक-भाडेकरूंमुळे नाईलाज; केवळ नोटीस चिटकविण्याची कारवाई

सातारा : मोडकळीस आलेल्या इमारती.. मात्र भाडेकरू आणि मालकांचा वाद सुरू असल्यामुळे जीव धोक्यात घालतायेत परंतु घर सोडण्यास मात्र अनेकजण तयार नाहीत. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना केवळ इमारतीच्या भिंतीवर नोटीस चिकटविण्यापलीकडे काहीच करता येत नाही. एखादी दुर्घटना घडली तर पालिकेच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा वेळीच सावध राहा असा गर्भीत इशाराही पालिकेने दिला आहे.शहरात अनेक ठिकाणी धोकादायक इमारती आहेत. शहरामध्ये नवनवीन इमारती तयार होत असल्या तरी फार वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती पालिकेच्या धोकादायक लिस्टमध्ये येत आहेत. त्यामुळे हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात तब्बल १५० इमारती धोकादायक असून, त्यामध्ये ५ इमारती केव्हाही पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा इमारती अत्यंत धोकादायक असतानाही या इमारतीमध्ये राहणारे लोक घरे सोडण्यास तयार होत नाहीत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच धोकादायक इमारतीमधील लोकांनी आत्ताच तेथील वास्तव्य सोडावे, अशा प्रकारच्या नोटिसाही पालिकेने संबंधित घरमालकांना पाठविल्या आहेत. परंतु त्याचा काहीएक उपयोग होत नाही, अशी हताश प्रतिक्रिया पालिकेचे अधिकारी देत आहेत.घरमालक इमारत पाडण्यास तयार झाला तर त्याला भाडेकरू अडथळा आणून न्यायालयात धाव घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी साताऱ्यात गणेशोत्सव मिरवणुकीच्या वेळी सिटी पोस्टाशेजारील एका इमारतीची भिंत कोसळून दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळीही पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पालिकेने अशा धोकादायक इमारती का पाडल्या नाहीत, असेही प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु पालिकेने संबंधित मालकांना नोटिसा पाठविल्याचे पुढे आल्यानंतर टीकाकारांची तोंडे बंद झाली. (प्रतिनिधी)कुटुंबाचा विचार करा..एखादी ुर्दैवी घटना घडल्यानंतरच लोक यावर चर्चा करतात. परंतु ही घटना घडू नये म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणीही हातभार लावत नाही, अशी खंतही एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून पालिकेने धोकादायक इमारतीवर नोटीस चिटकवून खबरदारी घेतली आहे. मात्र रोज मृत्यूच्या सावलीखाली राहण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार करा, असे भावनिक आवाहनही पालिकने यानिमित्ताने केले आहे. धोकादायक इमारतीमध्ये राहू नका, असे लोकांना वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र कोणीही ऐकत नाही. अनेकांचे वाद न्यायालयात सुरू आहेत. त्यामुळे आमचाही नाईलाज होत आहे.- प्रदीप साबळे (बांधकाम अभियंता, सातारा पालिका)