शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

मृत्यूच्या सावलीखाली तब्बल १५० कुटुंबीय !

By admin | Updated: June 23, 2016 01:17 IST

सातारा पालिका : मालक-भाडेकरूंमुळे नाईलाज; केवळ नोटीस चिटकविण्याची कारवाई

सातारा : मोडकळीस आलेल्या इमारती.. मात्र भाडेकरू आणि मालकांचा वाद सुरू असल्यामुळे जीव धोक्यात घालतायेत परंतु घर सोडण्यास मात्र अनेकजण तयार नाहीत. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना केवळ इमारतीच्या भिंतीवर नोटीस चिकटविण्यापलीकडे काहीच करता येत नाही. एखादी दुर्घटना घडली तर पालिकेच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा वेळीच सावध राहा असा गर्भीत इशाराही पालिकेने दिला आहे.शहरात अनेक ठिकाणी धोकादायक इमारती आहेत. शहरामध्ये नवनवीन इमारती तयार होत असल्या तरी फार वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती पालिकेच्या धोकादायक लिस्टमध्ये येत आहेत. त्यामुळे हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात तब्बल १५० इमारती धोकादायक असून, त्यामध्ये ५ इमारती केव्हाही पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा इमारती अत्यंत धोकादायक असतानाही या इमारतीमध्ये राहणारे लोक घरे सोडण्यास तयार होत नाहीत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच धोकादायक इमारतीमधील लोकांनी आत्ताच तेथील वास्तव्य सोडावे, अशा प्रकारच्या नोटिसाही पालिकेने संबंधित घरमालकांना पाठविल्या आहेत. परंतु त्याचा काहीएक उपयोग होत नाही, अशी हताश प्रतिक्रिया पालिकेचे अधिकारी देत आहेत.घरमालक इमारत पाडण्यास तयार झाला तर त्याला भाडेकरू अडथळा आणून न्यायालयात धाव घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी साताऱ्यात गणेशोत्सव मिरवणुकीच्या वेळी सिटी पोस्टाशेजारील एका इमारतीची भिंत कोसळून दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळीही पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पालिकेने अशा धोकादायक इमारती का पाडल्या नाहीत, असेही प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु पालिकेने संबंधित मालकांना नोटिसा पाठविल्याचे पुढे आल्यानंतर टीकाकारांची तोंडे बंद झाली. (प्रतिनिधी)कुटुंबाचा विचार करा..एखादी ुर्दैवी घटना घडल्यानंतरच लोक यावर चर्चा करतात. परंतु ही घटना घडू नये म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणीही हातभार लावत नाही, अशी खंतही एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून पालिकेने धोकादायक इमारतीवर नोटीस चिटकवून खबरदारी घेतली आहे. मात्र रोज मृत्यूच्या सावलीखाली राहण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार करा, असे भावनिक आवाहनही पालिकने यानिमित्ताने केले आहे. धोकादायक इमारतीमध्ये राहू नका, असे लोकांना वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र कोणीही ऐकत नाही. अनेकांचे वाद न्यायालयात सुरू आहेत. त्यामुळे आमचाही नाईलाज होत आहे.- प्रदीप साबळे (बांधकाम अभियंता, सातारा पालिका)