शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात उन्हामुळे जिल्ह्याचा ...

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात उन्हामुळे जिल्ह्याचा ताप वाढणार आहे. तसेच लवकरच कमाल तापमान ४० अंशावर जाण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात हिवाळी ऋतूमध्ये थंडीचे प्रमाण कमी होते. एकवेळ फक्त तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर तापमान हे सतत १४ ते १५ अंशावर राहिले. त्यामुळे यंदा थंडीची तीव्रता अधिक जाणवली नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ झाली. कमाल तापमान तर सतत ३५ अंशावर होते. मार्च महिन्यातच कमाल तापमानही ३९ अंशापर्यंत पोहोचले होते, तर आता एप्रिल महिना सुरू झाल्यापासूनही कमाल तापमान ३८ अंशापर्यंत आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ऊन वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहे.

सातारा शहरातही उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. यामुळे सातारकर उकाड्याने हैराण झाले आहेत. पुढील दीड महिना तरी उन्हाची तीव्रता राहणार आहे.

चौकट :

३८.९ पर्यंत पोहोचले तापमान...

जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत कमाल तापमान हे ३८.०९ अंशापर्यंत पोहोचले आहे. २९ मार्चला साताऱ्यात या तापमानाची नोंद झाली होती.

त्याचबरोबर मागील पाच दिवसांपासून ३७ अंशावर तापमान कायम आहे. १ एप्रिलला ३८.०२, २ एप्रिल रोजी ३७.०७ कमाल तापमान नोंद झाले होते, तर ३ एप्रिलला साताऱ्यात ३८ अंशावर पारा होता.

................................

असा राहील आठवडा...

जिल्ह्यात किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. कधी १७ अंशापर्यंत खाली येते, तर काहीवेळा पारा २० अंशापर्यंत जात आहे. मात्र, कमाल तापमान ३७ अंशावर कायम आहे. तरीही काहीवेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे कमाल तापमान वाढत असले तरी उतारही येत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत कमाल तापमान ४० अंशापर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे.

फोटो ओळ : सातारा शहरातील कमाल तापमान ३८ अंशावर जात असल्याने उन्हाची तीव्रता जाणवते. त्यामुळे दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यावरही तुरळक गर्दी दिसून येते. (छाया : नितीन काळेल)

................................................................