शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मूळ कामाच्या ठिकाणी तत्काळ हजर व्हा!

By admin | Updated: July 6, 2016 00:23 IST

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश; खातेप्रमुख सोडत नसल्याचा होत होता आरोप

सातारा : जिल्हा परिषदेतील ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत, त्या कर्मचाऱ्यांना तत्काळ मूळ ठिकाणी हजर होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. आता या आदेशाचे कर्मचाऱ्यांकडून पालन होणार की त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावणार?, हा सवाल अनुत्तरित आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनी १३ एप्रिल २०१६ रोजी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश काढले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ (नेमणुकीच्या) ठिकाणी असणाऱ्या कार्यालयात हजर व्हावे, असा आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशानंतरही हे कर्मचारी त्याच ठिकाणी काम करत आहेत. हे कर्मचारी मूळ नेमणुकीच्या ठिकाणी काम न करता जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांमध्ये चिकटून बसले आहेत. त्यामुळे नियुक्तीच्या ठिकाणी कामाचा खोळंबा झाल्याची चर्चा होती. याबाबत ‘लोकमत’ ने ३० जूनच्या अंकात ‘बदल्यांचे आदेश होऊनही कर्मचारी खाते सोडेनात!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गुरुवारी (दि. ३० ) जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा झाली.जिल्हा परिषदेत चिकटून राहिलेल्या या कर्मचाऱ्यांबाबत नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख काय भूमिका घेणार?, याचीही जोरदार चर्चा सुरू होती. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन डॉ. देशमुख यांनी प्रशासन विभागाकडून याची खातरजमा केली. तर संबंधित खातेप्रमुख या कर्मचाऱ्यांना साडत नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यावर देशमुख यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ कामाच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश तत्काळ काढा, असे प्रशासन विभागाला सांगितले आहे. (प्रतिनिधी)तोंडी आदेशाने कारवाई होणार का?जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी प्रतिनियुक्त्या रद्द होऊन देखील मूळ ठिकाणी हजर होत नाहीत, त्यांना तत्काळ असे तोंडी आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. वास्तविक, १३ एप्रिल २०१६ च्या लेखी आदेशानेच कार्यवाही अपेक्षित होते; आता तोंडी आदेशाने तरी सोयीच्या खात्यांना चिकटून राहिलेल्यांचे ‘जुगाड’ मोकळे होणार का?, असा सवाल व्यक्त केला जात आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या आदेशाच्या प्रतीत ज्या कर्मचाऱ्यांची नावे होती, त्या कर्मचाऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली; परंतु जवळपास १५० कर्मचारी अशा प्रकारे नियमबाह्यरीत्या काम करत असल्याची कुणकुण आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात?, हेही पाहण्याजोगे ठरणार आहे.