शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मूळ कामाच्या ठिकाणी तत्काळ हजर व्हा!

By admin | Updated: July 6, 2016 00:23 IST

जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश; खातेप्रमुख सोडत नसल्याचा होत होता आरोप

सातारा : जिल्हा परिषदेतील ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत, त्या कर्मचाऱ्यांना तत्काळ मूळ ठिकाणी हजर होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. आता या आदेशाचे कर्मचाऱ्यांकडून पालन होणार की त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावणार?, हा सवाल अनुत्तरित आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनी १३ एप्रिल २०१६ रोजी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे आदेश काढले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ (नेमणुकीच्या) ठिकाणी असणाऱ्या कार्यालयात हजर व्हावे, असा आदेश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशानंतरही हे कर्मचारी त्याच ठिकाणी काम करत आहेत. हे कर्मचारी मूळ नेमणुकीच्या ठिकाणी काम न करता जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांमध्ये चिकटून बसले आहेत. त्यामुळे नियुक्तीच्या ठिकाणी कामाचा खोळंबा झाल्याची चर्चा होती. याबाबत ‘लोकमत’ ने ३० जूनच्या अंकात ‘बदल्यांचे आदेश होऊनही कर्मचारी खाते सोडेनात!’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गुरुवारी (दि. ३० ) जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा झाली.जिल्हा परिषदेत चिकटून राहिलेल्या या कर्मचाऱ्यांबाबत नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख काय भूमिका घेणार?, याचीही जोरदार चर्चा सुरू होती. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन डॉ. देशमुख यांनी प्रशासन विभागाकडून याची खातरजमा केली. तर संबंधित खातेप्रमुख या कर्मचाऱ्यांना साडत नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यावर देशमुख यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना मूळ कामाच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश तत्काळ काढा, असे प्रशासन विभागाला सांगितले आहे. (प्रतिनिधी)तोंडी आदेशाने कारवाई होणार का?जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी प्रतिनियुक्त्या रद्द होऊन देखील मूळ ठिकाणी हजर होत नाहीत, त्यांना तत्काळ असे तोंडी आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. वास्तविक, १३ एप्रिल २०१६ च्या लेखी आदेशानेच कार्यवाही अपेक्षित होते; आता तोंडी आदेशाने तरी सोयीच्या खात्यांना चिकटून राहिलेल्यांचे ‘जुगाड’ मोकळे होणार का?, असा सवाल व्यक्त केला जात आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या आदेशाच्या प्रतीत ज्या कर्मचाऱ्यांची नावे होती, त्या कर्मचाऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली; परंतु जवळपास १५० कर्मचारी अशा प्रकारे नियमबाह्यरीत्या काम करत असल्याची कुणकुण आहे. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतात?, हेही पाहण्याजोगे ठरणार आहे.