शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

अंनिस महापुरुषांचा विचार पुढे नेत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:28 IST

सातारा : बुद्ध, चार्वाक, तुकाराम, फुले, शाहू, आंबेडकर, इत्यादी महापुरुषांचे विचार मांडून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच महापुरुषांचा वारसा ...

सातारा : बुद्ध, चार्वाक, तुकाराम, फुले, शाहू, आंबेडकर, इत्यादी महापुरुषांचे विचार मांडून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच महापुरुषांचा वारसा पुढे नेत आहे, असे मत ज्येष्ठ अंनिस कार्यकर्ते अण्णा कडलास्कर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे नवीन कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण हेतूने राज्यव्यापी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अंनिस कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पार्श्वभूमी आणि गेल्या ३२ वर्षांपासूनची समितीची कारकीर्द आणि यशस्वी घोडदौड आपल्या विस्तृत मांडणीतून प्रशिक्षणार्थींसमोर सादर केली.

या दीर्घ प्रवासात आलेल्या असंख्य अडचणींचा आणि कठीण प्रसंगांचा उल्लेखही त्यांनी आपल्या विषयाच्या मांडणीत केला. तसेच विज्ञान, निर्भयता, नीती या तत्वांचे महत्त्व सांगितले.

मुक्ता दाभोलकर यांनी नवीन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना ‘अंनिस’ची चतूर्सुत्री उदाहरणासह समजावून सांगितली. जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा याबाबतही माहिती दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राबवत असलेले विविध उपक्रम या चतूर्सुत्रीभोवती कसे गुंफलेले आहेत, हेही त्यांनी समजावून सांगितले.

हमीद दाभोलकर आणि मिलिंद देशमुख यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात नवीन कार्यकर्त्यांच्या मनाला पडणाऱ्या प्रश्नांवर उत्तरे दिली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहसापेक्षा आपुलकीची जास्त गरज असते, असेही ते म्हणाले. तर मिलिंद देशमुख यांनी खगोलशास्त्रीय माहिती देताना फलज्योतिष हे शास्त्र नाही आणि ग्रह, ताऱ्यांचा मानवी जीवनावर अजिबात परिणाम होत नाही, हे प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

एकूण १२८ शिबिरार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला. हे शिबिर सर्व नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जोडून घेण्यासाठी उत्साहवर्धक असे ठरले. राजीव देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानत शिबिराचा समारोप केला.