शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

अण्णासाहेब.. असून अडचण, नसून खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2015 00:23 IST

न्याय मागायचा कुठे? : वरकुटे मलवडीसह चार गावांचा प्रश्न; दाखले, सातबारा उतारा वेळेत मिळत नाही

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडीसह महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, बनगरवाडी गावांना तलाठी असून, अडचण आणि नसून खोळंबा असाच काहीसा प्रकार गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. सातबारा उतारे, विविध दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.वरकुटे मलवडी परिसरातील छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांची एकंदरीत लोकसंख्या आठ-दहा हजारांच्या आसपास आहे. या लोकांसाठी मुख्य कार्यक्षेत्र वरकुटे मलवडी हे गाव आहे. वरकुटे मलवडी येथे अनेक वर्षांपासून एकच तलाठी कार्यरत आहे. वर्षभरापूर्वी मधुकर सोनवणे हे तलाठी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून वरकुटे-मलवडीत दररोज नित्य नियमाने येऊन काम पाहणारा असा एकही तलाठी लोकांना लाभला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गासह विद्यार्थी आणि नागरिकांची दाखला, उताऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत.सोनवणे यांच्या निवृत्तीनंतर बदलीवर आलेल्या तीन-चार तलाठ्यांनी कार्यालयीन दफ्तर आॅनलाईन करावयाच्या नावाखाली टंगळमंगळ करीत कामकाज केले नाही. काही तलाठी वरकुटे मलवडी येथे काम करायचे नाही म्हणून येत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांस फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वरकुटे मलवडी येथे तलाठी नियमीत येत नसल्याने सातबारा, दाखले पाहिजे असल्यास सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या म्हसवडला जाऊन ते घ्यावे लागत आहेत. त्यातच सध्या दहावी-बारावीच्या मुलांचे निकाल लागल्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता जातीचे दाखले, रहिवाशी दाखले अशा अनेक कागदपत्रांची गरज भासत आहे. अशावेळी वेळेत दाखले मिळत नाहीत. प्रामुख्याने शैक्षणिक कामे वेळेवर पूर्ण नाही झाली तर होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.तरी संबंधित विभागाने वरकुटे मलवडी येथे कायमस्वरूपी काम पाहणारा तलाठी द्यावा, अशी मागणी वरकुटे मलवडीसह परिसरातील जनतेतून होत आहे. (वार्ताहर)वरकुटे मलवडीला अनेकांचा नकार...वरकुटे मलवडी येथे एखाद्या तलाठ्याची बदली झाली तर रुजू होण्यास त्यांचा प्रथम नकारच असतो. त्यामुळे या गावाला वर्षभरात नियमीत येणारा एकही तलाठी लाभलेला नाही. गेल्या एक वर्षापासून अनेक तलाठ्यांनी वरकुटे मलवडी येथे काम पाहिले आहे. त्यामुळे वरकुटे मलवडीसह चार गावांसाठी नियमीत व वेळेवर येणाऱ्या तलाठ्याची प्रतीक्षा आहे. सध्या शाळा, महाविद्यालये प्रवेशाचे दिवस आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वरकुटे मलवडी येथे तलाठ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.