शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

अण्णासाहेब.. असून अडचण, नसून खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2015 00:23 IST

न्याय मागायचा कुठे? : वरकुटे मलवडीसह चार गावांचा प्रश्न; दाखले, सातबारा उतारा वेळेत मिळत नाही

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडीसह महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, बनगरवाडी गावांना तलाठी असून, अडचण आणि नसून खोळंबा असाच काहीसा प्रकार गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. सातबारा उतारे, विविध दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.वरकुटे मलवडी परिसरातील छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांची एकंदरीत लोकसंख्या आठ-दहा हजारांच्या आसपास आहे. या लोकांसाठी मुख्य कार्यक्षेत्र वरकुटे मलवडी हे गाव आहे. वरकुटे मलवडी येथे अनेक वर्षांपासून एकच तलाठी कार्यरत आहे. वर्षभरापूर्वी मधुकर सोनवणे हे तलाठी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून वरकुटे-मलवडीत दररोज नित्य नियमाने येऊन काम पाहणारा असा एकही तलाठी लोकांना लाभला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गासह विद्यार्थी आणि नागरिकांची दाखला, उताऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत.सोनवणे यांच्या निवृत्तीनंतर बदलीवर आलेल्या तीन-चार तलाठ्यांनी कार्यालयीन दफ्तर आॅनलाईन करावयाच्या नावाखाली टंगळमंगळ करीत कामकाज केले नाही. काही तलाठी वरकुटे मलवडी येथे काम करायचे नाही म्हणून येत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांस फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वरकुटे मलवडी येथे तलाठी नियमीत येत नसल्याने सातबारा, दाखले पाहिजे असल्यास सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या म्हसवडला जाऊन ते घ्यावे लागत आहेत. त्यातच सध्या दहावी-बारावीच्या मुलांचे निकाल लागल्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता जातीचे दाखले, रहिवाशी दाखले अशा अनेक कागदपत्रांची गरज भासत आहे. अशावेळी वेळेत दाखले मिळत नाहीत. प्रामुख्याने शैक्षणिक कामे वेळेवर पूर्ण नाही झाली तर होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.तरी संबंधित विभागाने वरकुटे मलवडी येथे कायमस्वरूपी काम पाहणारा तलाठी द्यावा, अशी मागणी वरकुटे मलवडीसह परिसरातील जनतेतून होत आहे. (वार्ताहर)वरकुटे मलवडीला अनेकांचा नकार...वरकुटे मलवडी येथे एखाद्या तलाठ्याची बदली झाली तर रुजू होण्यास त्यांचा प्रथम नकारच असतो. त्यामुळे या गावाला वर्षभरात नियमीत येणारा एकही तलाठी लाभलेला नाही. गेल्या एक वर्षापासून अनेक तलाठ्यांनी वरकुटे मलवडी येथे काम पाहिले आहे. त्यामुळे वरकुटे मलवडीसह चार गावांसाठी नियमीत व वेळेवर येणाऱ्या तलाठ्याची प्रतीक्षा आहे. सध्या शाळा, महाविद्यालये प्रवेशाचे दिवस आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वरकुटे मलवडी येथे तलाठ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.