शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अण्णासाहेब.. असून अडचण, नसून खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2015 00:23 IST

न्याय मागायचा कुठे? : वरकुटे मलवडीसह चार गावांचा प्रश्न; दाखले, सातबारा उतारा वेळेत मिळत नाही

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडीसह महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, बनगरवाडी गावांना तलाठी असून, अडचण आणि नसून खोळंबा असाच काहीसा प्रकार गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. सातबारा उतारे, विविध दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.वरकुटे मलवडी परिसरातील छोट्या-मोठ्या वाड्या-वस्त्यांची एकंदरीत लोकसंख्या आठ-दहा हजारांच्या आसपास आहे. या लोकांसाठी मुख्य कार्यक्षेत्र वरकुटे मलवडी हे गाव आहे. वरकुटे मलवडी येथे अनेक वर्षांपासून एकच तलाठी कार्यरत आहे. वर्षभरापूर्वी मधुकर सोनवणे हे तलाठी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून वरकुटे-मलवडीत दररोज नित्य नियमाने येऊन काम पाहणारा असा एकही तलाठी लोकांना लाभला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गासह विद्यार्थी आणि नागरिकांची दाखला, उताऱ्यांची कामे खोळंबलेली आहेत.सोनवणे यांच्या निवृत्तीनंतर बदलीवर आलेल्या तीन-चार तलाठ्यांनी कार्यालयीन दफ्तर आॅनलाईन करावयाच्या नावाखाली टंगळमंगळ करीत कामकाज केले नाही. काही तलाठी वरकुटे मलवडी येथे काम करायचे नाही म्हणून येत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांस फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वरकुटे मलवडी येथे तलाठी नियमीत येत नसल्याने सातबारा, दाखले पाहिजे असल्यास सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या म्हसवडला जाऊन ते घ्यावे लागत आहेत. त्यातच सध्या दहावी-बारावीच्या मुलांचे निकाल लागल्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता जातीचे दाखले, रहिवाशी दाखले अशा अनेक कागदपत्रांची गरज भासत आहे. अशावेळी वेळेत दाखले मिळत नाहीत. प्रामुख्याने शैक्षणिक कामे वेळेवर पूर्ण नाही झाली तर होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्न आहे.तरी संबंधित विभागाने वरकुटे मलवडी येथे कायमस्वरूपी काम पाहणारा तलाठी द्यावा, अशी मागणी वरकुटे मलवडीसह परिसरातील जनतेतून होत आहे. (वार्ताहर)वरकुटे मलवडीला अनेकांचा नकार...वरकुटे मलवडी येथे एखाद्या तलाठ्याची बदली झाली तर रुजू होण्यास त्यांचा प्रथम नकारच असतो. त्यामुळे या गावाला वर्षभरात नियमीत येणारा एकही तलाठी लाभलेला नाही. गेल्या एक वर्षापासून अनेक तलाठ्यांनी वरकुटे मलवडी येथे काम पाहिले आहे. त्यामुळे वरकुटे मलवडीसह चार गावांसाठी नियमीत व वेळेवर येणाऱ्या तलाठ्याची प्रतीक्षा आहे. सध्या शाळा, महाविद्यालये प्रवेशाचे दिवस आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर कागदपत्रे मिळण्याची गरज आहे. त्यादृष्टीने वरकुटे मलवडी येथे तलाठ्याची नियुक्ती करणे गरजेचे आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.