शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

वारकऱ्यांचे शिळे अन्न खाल्याने २३ जनावरे दगावली

By admin | Updated: July 5, 2014 00:19 IST

कोळकीतील प्रकार : शेकडो शेळ्यांची प्रकृती खालावली; शिल्लक अन्न उघड्यावर टाकले होते

कोळकी : सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असलेल्या पालखीतील वारकऱ्यांसाठी बनविलेले शिल्लक अन्न खाल्ल्याने चौदा बकऱ्या व नऊ शेळ्या अशी सुमारे २३ जनावरे दगावली आहेत. आणखी शेकडो जनावरे अत्यवस्थ अवस्थेत आहेत.कोळकी येथील शारदानगर येथे किसन पांगरू दडस (रा. दुधेबावी, ता. फलटण) हे दीड महिन्यापासून पाल ठोकून ६५ जनावरांसह राहत आहेत. तसेच सजाबाई मारुती कोकरे (रा. तिरकवाडी, ता. फलटण) या ६० शेळ्यांसमवेत पाल ठोकून राहत आहेत. त्यांनी काल, गुरुवारी शारदानगर व वनदेवशेरी परिसरात मेंढ्या व शेळ्या चरायला नेल्या होत्या. त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी बनवलेले शिल्लक अन्न उघड्यावर टाकले होते. जनावरांनी ते अन्न दिवसभर खाल्ल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास जनावरांना पाणी पाजल्यानंतर अचानकपणे जनावारांचे पोट फुगणे, रवंथ न करणे, चालता न येणे अन् उभे राहिल्यानंतर खाली पडणे, अशी लक्षणे दिसू लागली. यामुळे भयभीत झालेल्या दडस यांनी हा प्रकार नातेवाइकांनी दूरध्वनीवरून कळविला. जनावरांच्या खासगी डॉक्टरांच्या उपचारास प्रतिसाद न देता अनेक जनावरांनी जागीच माना टाकल्या. त्यामध्ये किसन दडस यांच्या चौदा बकऱ्या, तर सजाबाई कोकरे यांच्या सहा शेळ्या, तीन करडांचा मृत्यू झाला. पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठविले. त्यांनी रात्रभर जनावरांवर औषधोपचार केल्याने काही जनावरे वाचली. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)