शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

वारकऱ्यांचे शिळे अन्न खाल्याने २३ जनावरे दगावली

By admin | Updated: July 5, 2014 00:19 IST

कोळकीतील प्रकार : शेकडो शेळ्यांची प्रकृती खालावली; शिल्लक अन्न उघड्यावर टाकले होते

कोळकी : सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असलेल्या पालखीतील वारकऱ्यांसाठी बनविलेले शिल्लक अन्न खाल्ल्याने चौदा बकऱ्या व नऊ शेळ्या अशी सुमारे २३ जनावरे दगावली आहेत. आणखी शेकडो जनावरे अत्यवस्थ अवस्थेत आहेत.कोळकी येथील शारदानगर येथे किसन पांगरू दडस (रा. दुधेबावी, ता. फलटण) हे दीड महिन्यापासून पाल ठोकून ६५ जनावरांसह राहत आहेत. तसेच सजाबाई मारुती कोकरे (रा. तिरकवाडी, ता. फलटण) या ६० शेळ्यांसमवेत पाल ठोकून राहत आहेत. त्यांनी काल, गुरुवारी शारदानगर व वनदेवशेरी परिसरात मेंढ्या व शेळ्या चरायला नेल्या होत्या. त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी बनवलेले शिल्लक अन्न उघड्यावर टाकले होते. जनावरांनी ते अन्न दिवसभर खाल्ल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास जनावरांना पाणी पाजल्यानंतर अचानकपणे जनावारांचे पोट फुगणे, रवंथ न करणे, चालता न येणे अन् उभे राहिल्यानंतर खाली पडणे, अशी लक्षणे दिसू लागली. यामुळे भयभीत झालेल्या दडस यांनी हा प्रकार नातेवाइकांनी दूरध्वनीवरून कळविला. जनावरांच्या खासगी डॉक्टरांच्या उपचारास प्रतिसाद न देता अनेक जनावरांनी जागीच माना टाकल्या. त्यामध्ये किसन दडस यांच्या चौदा बकऱ्या, तर सजाबाई कोकरे यांच्या सहा शेळ्या, तीन करडांचा मृत्यू झाला. पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठविले. त्यांनी रात्रभर जनावरांवर औषधोपचार केल्याने काही जनावरे वाचली. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर)