शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जंगलातील प्राणीही प्लास्टिकमुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:20 IST

खंडाळा : शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा कमी होऊ लागला असला तरी मानवाने केलेल्या अतिवापरामुळे तो शहरे सोडून जंगलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा त्रास प्राण्यांनाही होत आहे. जंगली प्राणीही प्लास्टिक मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जंगलात प्लास्टिक निर्मूलनाची चळवळ उभी राहणे गरजेचे असून, पर्यटकांनी ...

खंडाळा : शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा कमी होऊ लागला असला तरी मानवाने केलेल्या अतिवापरामुळे तो शहरे सोडून जंगलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा त्रास प्राण्यांनाही होत आहे. जंगली प्राणीही प्लास्टिक मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जंगलात प्लास्टिक निर्मूलनाची चळवळ उभी राहणे गरजेचे असून, पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.मानवी आरोग्याच्यादृष्टीने प्लास्टिक कचरा घातक ठरत आहे. त्यामुळे यापासून मुक्तता मिळावी, यासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातही प्लास्टिक वापरावर मर्यादा आल्या; पण अगोदरपासूनच मानवाच्या कृत्यामुळे प्लास्टिकचे लोन जंगलापर्यंत पोहोचले होते. वास्तविक जंगलात पडलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, खाऊचे कागद, जेवणाचे डबे, प्लास्टिक कागद या सर्वांमुळे जंगलातील प्राणी, पक्ष्यांना त्याचा त्रास होत असतो. अनेकदा हे प्राणी खाद्याच्या शोधार्थ या पिशव्यांच्या मोहात पडतात. त्यामुळे त्यांच्याकडून ते खाल्ले जाते. पक्षी जमिनीवरील खाद्य टिपताना हे प्लास्टिकचे तुकडे त्यांच्या पोटात जातात. सजीवांच्या जीविताला धोका निर्माण होतो.जंगलातील सफरीसाठी किंवा ट्रेकिंगसाठी तसेच निसर्गरम्य ठिकाणी सहलींसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पर्यटनाला जाताना आवश्यक वस्तू सोबत नेण्यासाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु या वस्तूंचा वापर झाल्यानंतर हा सर्व कचरा जंगलातच फेकला जातो. त्यामुळे निसर्गरम्य परिसरसुद्धा प्रदूषित होत आहे. शहरी आणि ग्रामीण भागासह जंगल परिसरातही स्वच्छता मोहीम राबवून जंगली जीवांची या जीवघेण्या समस्येतून सुटका करणे गरजेचे आहे.या गोष्टी पाळापर्यटनाला जाताना कापडी पिशव्यांचा वापर करावाजेवणाचे प्लास्टिक पॅकिंग डबे, खाऊचे कागद पर्यटनावरून येताना परत घेऊन यावेतजंगल भागात धूम्रपान करू नयेपर्यटन करतेवेळी प्लास्टिक कचरा आढळल्यास तो एकत्र गोळा करून घेऊन यावा