शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जंगलातील प्राणीही प्लास्टिकमुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:20 IST

खंडाळा : शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा कमी होऊ लागला असला तरी मानवाने केलेल्या अतिवापरामुळे तो शहरे सोडून जंगलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा त्रास प्राण्यांनाही होत आहे. जंगली प्राणीही प्लास्टिक मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जंगलात प्लास्टिक निर्मूलनाची चळवळ उभी राहणे गरजेचे असून, पर्यटकांनी ...

खंडाळा : शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा कमी होऊ लागला असला तरी मानवाने केलेल्या अतिवापरामुळे तो शहरे सोडून जंगलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा त्रास प्राण्यांनाही होत आहे. जंगली प्राणीही प्लास्टिक मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जंगलात प्लास्टिक निर्मूलनाची चळवळ उभी राहणे गरजेचे असून, पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.मानवी आरोग्याच्यादृष्टीने प्लास्टिक कचरा घातक ठरत आहे. त्यामुळे यापासून मुक्तता मिळावी, यासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातही प्लास्टिक वापरावर मर्यादा आल्या; पण अगोदरपासूनच मानवाच्या कृत्यामुळे प्लास्टिकचे लोन जंगलापर्यंत पोहोचले होते. वास्तविक जंगलात पडलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, खाऊचे कागद, जेवणाचे डबे, प्लास्टिक कागद या सर्वांमुळे जंगलातील प्राणी, पक्ष्यांना त्याचा त्रास होत असतो. अनेकदा हे प्राणी खाद्याच्या शोधार्थ या पिशव्यांच्या मोहात पडतात. त्यामुळे त्यांच्याकडून ते खाल्ले जाते. पक्षी जमिनीवरील खाद्य टिपताना हे प्लास्टिकचे तुकडे त्यांच्या पोटात जातात. सजीवांच्या जीविताला धोका निर्माण होतो.जंगलातील सफरीसाठी किंवा ट्रेकिंगसाठी तसेच निसर्गरम्य ठिकाणी सहलींसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पर्यटनाला जाताना आवश्यक वस्तू सोबत नेण्यासाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु या वस्तूंचा वापर झाल्यानंतर हा सर्व कचरा जंगलातच फेकला जातो. त्यामुळे निसर्गरम्य परिसरसुद्धा प्रदूषित होत आहे. शहरी आणि ग्रामीण भागासह जंगल परिसरातही स्वच्छता मोहीम राबवून जंगली जीवांची या जीवघेण्या समस्येतून सुटका करणे गरजेचे आहे.या गोष्टी पाळापर्यटनाला जाताना कापडी पिशव्यांचा वापर करावाजेवणाचे प्लास्टिक पॅकिंग डबे, खाऊचे कागद पर्यटनावरून येताना परत घेऊन यावेतजंगल भागात धूम्रपान करू नयेपर्यटन करतेवेळी प्लास्टिक कचरा आढळल्यास तो एकत्र गोळा करून घेऊन यावा