शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

जंगलातील प्राणीही प्लास्टिकमुक्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:20 IST

खंडाळा : शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा कमी होऊ लागला असला तरी मानवाने केलेल्या अतिवापरामुळे तो शहरे सोडून जंगलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा त्रास प्राण्यांनाही होत आहे. जंगली प्राणीही प्लास्टिक मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जंगलात प्लास्टिक निर्मूलनाची चळवळ उभी राहणे गरजेचे असून, पर्यटकांनी ...

खंडाळा : शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा कमी होऊ लागला असला तरी मानवाने केलेल्या अतिवापरामुळे तो शहरे सोडून जंगलापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्याचा त्रास प्राण्यांनाही होत आहे. जंगली प्राणीही प्लास्टिक मुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जंगलात प्लास्टिक निर्मूलनाची चळवळ उभी राहणे गरजेचे असून, पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.मानवी आरोग्याच्यादृष्टीने प्लास्टिक कचरा घातक ठरत आहे. त्यामुळे यापासून मुक्तता मिळावी, यासाठी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला गेला. या निर्णयाने शहरी भागासह ग्रामीण भागातही प्लास्टिक वापरावर मर्यादा आल्या; पण अगोदरपासूनच मानवाच्या कृत्यामुळे प्लास्टिकचे लोन जंगलापर्यंत पोहोचले होते. वास्तविक जंगलात पडलेल्या प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, खाऊचे कागद, जेवणाचे डबे, प्लास्टिक कागद या सर्वांमुळे जंगलातील प्राणी, पक्ष्यांना त्याचा त्रास होत असतो. अनेकदा हे प्राणी खाद्याच्या शोधार्थ या पिशव्यांच्या मोहात पडतात. त्यामुळे त्यांच्याकडून ते खाल्ले जाते. पक्षी जमिनीवरील खाद्य टिपताना हे प्लास्टिकचे तुकडे त्यांच्या पोटात जातात. सजीवांच्या जीविताला धोका निर्माण होतो.जंगलातील सफरीसाठी किंवा ट्रेकिंगसाठी तसेच निसर्गरम्य ठिकाणी सहलींसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पर्यटनाला जाताना आवश्यक वस्तू सोबत नेण्यासाठी प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. परंतु या वस्तूंचा वापर झाल्यानंतर हा सर्व कचरा जंगलातच फेकला जातो. त्यामुळे निसर्गरम्य परिसरसुद्धा प्रदूषित होत आहे. शहरी आणि ग्रामीण भागासह जंगल परिसरातही स्वच्छता मोहीम राबवून जंगली जीवांची या जीवघेण्या समस्येतून सुटका करणे गरजेचे आहे.या गोष्टी पाळापर्यटनाला जाताना कापडी पिशव्यांचा वापर करावाजेवणाचे प्लास्टिक पॅकिंग डबे, खाऊचे कागद पर्यटनावरून येताना परत घेऊन यावेतजंगल भागात धूम्रपान करू नयेपर्यटन करतेवेळी प्लास्टिक कचरा आढळल्यास तो एकत्र गोळा करून घेऊन यावा