शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

अमोल कांबळेला पोलिस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवडूज : खरीप निधीतील तीन कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी आरोपी आणि खटाव तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळेला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात पोलिसांच्या वतीने तपासासाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असे म्हणणे मांडण्यात आले होते.याबाबत अधिक माहिती अशी, खरीप निधीत सुमारे तीन कोटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडूज : खरीप निधीतील तीन कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी आरोपी आणि खटाव तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळेला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयात पोलिसांच्या वतीने तपासासाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असे म्हणणे मांडण्यात आले होते.याबाबत अधिक माहिती अशी, खरीप निधीत सुमारे तीन कोटी रुपयांचा घोटाळा केल्यावरून तत्कालीन तहसीलदार कांबळेच्या विरोधात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर डॉ. कांबळे फरार झाला होता. कांबळेचा शोध घेण्यासाठी वडूज पोलिस ठाण्यातील पथकाने उस्मानाबाद व इतर ठिकाणी तपास यंत्रणा राबविली होती. मात्र, कांबळे अटकपूर्व जामीन घेण्यासाठी सातारा येथे आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.गुरुवारी दुपारी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात कांबळेला हजर करण्यात आले. न्यायाधीश डी. एम. झाटे यांनी ‘पोलिसांबाबत काय तक्रार आहे का ?’ अशी विचारणा केली असता कांबळेने ‘नाही,’ असे उत्तर दिले. त्यानंतर पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन तपासाच्या दृष्टीने सखोल चौकशी करण्यासाठी दहा दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असे म्हणणे मांडले.सहायक सरकारी अभियोक्ता अभिजित गोपलकर यांनी ‘कांबळेवर शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा मोठा गुन्हा आहे,’ असे म्हणणे मांडले. यावेळी कांबळेच्या वकिलांनीही बाजू मांडली. सहायक सरकारी अभियोक्ता गोपलकर व कांबळेचे वकील पी. जी. नलवडे यांचे म्हणणे ऐकून न्यायाधीशांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.कांबळेंना कडक शिक्षा देण्याची मागणीवडूज : शासकीय रकमेच्या अपहारप्रकरणी अटकेत असलेल्या उपजिल्हाधिकारी अमोल कांबळे यांना कडक शिक्षा करावी, अशा मागणीचे निवेदन शहाजीराजे मित्र मंडळ व खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीने तहसीलदार सुशील वेल्हेकर यांना देण्यात आले आहे. यावेळी तहसील कार्यालयासमोर अमोल कांबळेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, अमोल कांबळे यांना व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात येऊ नये. अनुदानाचा पैसा खाऊन शेतकºयांवर उपासमारी व आत्महत्येसारखी परिस्थिती निर्माण करणाºया कांबळेंना कडक शिक्षा होण्याची गरज आहे. यावेळी शहाजी गोडसे, संदीप गोडसे, विजय शिंदे, गणेश गोडसे, वैभव फडतरे, जगन्नाथ इंगळे, सुनील गोडसे, विक्रम गोडसे आदी उपस्थित होते.