शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : समाजातील महत्त्वपूर्ण आणि तितकाच दुर्लक्षित घटक म्हणून तृतीयपंथीयांची गेल्या अनेक वर्षांपासून हेळसांड सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : समाजातील महत्त्वपूर्ण आणि तितकाच दुर्लक्षित घटक म्हणून तृतीयपंथीयांची गेल्या अनेक वर्षांपासून हेळसांड सुरू आहे. त्यांच्या जगण्याला संविधानाने मान्यता दिलीये आता त्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळ कटिबद्ध राहील, अशी ग्वाही महामंडळच्या सदस्या अ‍ॅड. दिलशाद मुजावर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण निर्देशीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संग्राम संस्था, क्षितीज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था आणि जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांच्या कायदेविषयक समस्या आणि उपाय या विषयावर अ‍ॅड. मुजावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नितीन जाधव होते. यावेळी संग्रामचे प्रकल्प अधिकारी शशिकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जैन सोशल ग्रुपच्या गीता मामणिया, अ‍ॅड. मनीषा बर्गे, अ‍ॅड. माधुरी प्रभूणे, अ‍ॅड. सुचित्रा काटकर, प्रा. जीवन बोराटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करताना प्रशांत वारकर म्हणाले, ‘प्रत्येक जाती धर्माचे आणि प्रांताचे लोक तृतीयपंथीय म्हणून आमच्या समाजात येतात, त्यामुळे आम्ही सगळे खरे भारतीय आहोत. तृतीयंपथीयांच्या नावाने कमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या समाजात असणारी गुरू चेला ही पद्धत बंद होणं आवश्यक आहे. ज्येष्ठ तृतीयपंथीयांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा.’

अध्यक्षीय मनोगतात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नितीन जाधव म्हणाले, ‘कुठल्या चांगल्या कार्यक्रमात ज्यांचे आशीर्वाद लागतात, त्यांना समाजात अजूनही मान्यता मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्त्री-पुरुष यांच्यासारखंच तृतीयपंथी हा सुद्धा समाजाचा घटक आहे हे कायद्याला मान्य आहे. पण, या सर्वांसाठी न्याय व्यवस्था खंबीरपणे कार्यरत आहे.

या कार्यक्रमास प्रा. संध्या चौगुले, अ‍ॅड. शुभांगी दळवी यांच्यासह मान्यवर आणि तृतीयपंथी उपस्थित होते.

चौकट :

हाताला काम, राहायला घर यासाठी प्रयत्नशील

तृतीयपंथी म्हणून कोणीही जन्माला येत नाही. वयात येताना होणारे बदल लक्षात घेतल्यानंतर तृतीयपंथी असल्याचं कोणी सांगितलं तर कुटुंबीय आक्रमक होतात. अनेकांना तर घरातूनही बाहेर काढलं जातं. या सगळ्यांसाठी राहायला घर आणि हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन यावेळी उपस्थित संस्था प्रतिनिधींनी दिले.