शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

सचिन काकडे गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो ...

सचिन काकडे

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे नियोजन केले जाते. अलीकडच्या काही वर्षांत विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय महत्त्वाचा ठरू लागला आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी ही तळी महत्त्वाची भूमिका बजावत असली, तरी केवळ आणि केवळ नागरिकांच्या भावनेखातर प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च या तळ्यांवर करावा लागत आहे.

सातारा शहराचा विचार करायचा झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहा दिवसांच्या धामधुमीनंतर गणेशमूर्ती शहरातील ऐतिहासिक तळी, नदी अथवा विहिरींमध्ये विसर्जित केल्या जायच्या. मात्र पर्यावरणाची होणारी हानी व जलप्रदूषण टाळण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून नदी, विहिरी यांची जागा कृत्रिम तळ्यांनी घेतली. जुनी तळी विसर्जनासाठी बंद ठेवण्यात आली. काही तरी नागरिकांनी कचरा टाकून इतकी घाण केली की त्यांचा वापर भविष्यात होईल की नाही हे सांगता येत नाही.

गणेशोत्सव आला की कृत्रिम खेळांचे खोदकाम करणे, त्यात पाणीसाठा करणे, दीड, पाच दिवस सात व दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणे असा प्रशासनाचा दिनक्रम सुरू होतो. सातारा शहरात दरवर्षी कृत्रिम तळ्यांवर सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचा खर्च केला जातो. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर पालिकेला विसर्जन व्यवस्थेवर तब्बल दीड कोटींहून अधिक रुपये खर्च करावे लागले आहेत. इतक्या मोठ्या रकमेतून कायमस्वरूपी तळ्याचीदेखील उभारणी झाली असती. मात्र नागरिकांची, गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दरवर्षी कृत्रिम तळ्यांची उभारणी करावी लागते. परंतु हे असं आणखी किती वर्षे चालणार आहे. विसर्जनासाठी नागरिकांनी, प्रशासनाने सक्षम पर्याय शोधायला हवा. अनेक नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे तळ्यांमध्ये नव्हे, तर घरच्या घरी विसर्जन करण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. ही चळवळ जर व्यापक झाली, तर अनेक प्रश्न आपोआपच सुटू शकतील.

(चौकट)

... तर कोट्यवधींचा खर्च वाचेल :

- जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून विहिरी, तलाव व नदीमध्ये मूर्तींचे विसर्जन केले जाते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे.

- मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामुळे जलप्रदूषण तर होतेच शिवाय जलचरांवरदेखील मोठा परिणाम होतो.

- हे रोखण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती कृत्रिम तळ्यांची उभारणी करत आहे. ठिकठिकाणी मूर्ती दान उपक्रमही राबविला जातो.

- केवळ प्रदूषण रोखणे हा यामागचा उद्देश असला, तरी नागरिकांच्या भावना दुखावू नयेत, यासाठी प्रशासनाला कृत्रिम तळ्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत

- मूर्तींचे आपण घरच्या घरी विसर्जन केले अथवा एकदा प्रतिष्ठापना केलेली मूर्ती तीन ते पाच वर्ष विसर्जित केली नाही, तर हा खर्च वाचू शकतो.

फोटो : जावेद खान