शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

सचिन काकडे गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो ...

सचिन काकडे

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे नियोजन केले जाते. अलीकडच्या काही वर्षांत विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय महत्त्वाचा ठरू लागला आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी ही तळी महत्त्वाची भूमिका बजावत असली, तरी केवळ आणि केवळ नागरिकांच्या भावनेखातर प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च या तळ्यांवर करावा लागत आहे.

सातारा शहराचा विचार करायचा झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहा दिवसांच्या धामधुमीनंतर गणेशमूर्ती शहरातील ऐतिहासिक तळी, नदी अथवा विहिरींमध्ये विसर्जित केल्या जायच्या. मात्र पर्यावरणाची होणारी हानी व जलप्रदूषण टाळण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून नदी, विहिरी यांची जागा कृत्रिम तळ्यांनी घेतली. जुनी तळी विसर्जनासाठी बंद ठेवण्यात आली. काही तरी नागरिकांनी कचरा टाकून इतकी घाण केली की त्यांचा वापर भविष्यात होईल की नाही हे सांगता येत नाही.

गणेशोत्सव आला की कृत्रिम खेळांचे खोदकाम करणे, त्यात पाणीसाठा करणे, दीड, पाच दिवस सात व दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणे असा प्रशासनाचा दिनक्रम सुरू होतो. सातारा शहरात दरवर्षी कृत्रिम तळ्यांवर सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचा खर्च केला जातो. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर पालिकेला विसर्जन व्यवस्थेवर तब्बल दीड कोटींहून अधिक रुपये खर्च करावे लागले आहेत. इतक्या मोठ्या रकमेतून कायमस्वरूपी तळ्याचीदेखील उभारणी झाली असती. मात्र नागरिकांची, गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दरवर्षी कृत्रिम तळ्यांची उभारणी करावी लागते. परंतु हे असं आणखी किती वर्षे चालणार आहे. विसर्जनासाठी नागरिकांनी, प्रशासनाने सक्षम पर्याय शोधायला हवा. अनेक नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे तळ्यांमध्ये नव्हे, तर घरच्या घरी विसर्जन करण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. ही चळवळ जर व्यापक झाली, तर अनेक प्रश्न आपोआपच सुटू शकतील.

(चौकट)

... तर कोट्यवधींचा खर्च वाचेल :

- जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून विहिरी, तलाव व नदीमध्ये मूर्तींचे विसर्जन केले जाते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे.

- मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामुळे जलप्रदूषण तर होतेच शिवाय जलचरांवरदेखील मोठा परिणाम होतो.

- हे रोखण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती कृत्रिम तळ्यांची उभारणी करत आहे. ठिकठिकाणी मूर्ती दान उपक्रमही राबविला जातो.

- केवळ प्रदूषण रोखणे हा यामागचा उद्देश असला, तरी नागरिकांच्या भावना दुखावू नयेत, यासाठी प्रशासनाला कृत्रिम तळ्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत

- मूर्तींचे आपण घरच्या घरी विसर्जन केले अथवा एकदा प्रतिष्ठापना केलेली मूर्ती तीन ते पाच वर्ष विसर्जित केली नाही, तर हा खर्च वाचू शकतो.

फोटो : जावेद खान