शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

सचिन काकडे गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो ...

सचिन काकडे

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गणेश भक्तच नव्हे, तर प्रशासनही जबाबदारीने काम करत असते. उत्सव सुरू झाल्यापासून तो संपेपर्यंत प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे नियोजन केले जाते. अलीकडच्या काही वर्षांत विसर्जनासाठी कृत्रिम तळ्यांचा पर्याय महत्त्वाचा ठरू लागला आहे. जलप्रदूषण टाळण्यासाठी ही तळी महत्त्वाची भूमिका बजावत असली, तरी केवळ आणि केवळ नागरिकांच्या भावनेखातर प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च या तळ्यांवर करावा लागत आहे.

सातारा शहराचा विचार करायचा झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दहा दिवसांच्या धामधुमीनंतर गणेशमूर्ती शहरातील ऐतिहासिक तळी, नदी अथवा विहिरींमध्ये विसर्जित केल्या जायच्या. मात्र पर्यावरणाची होणारी हानी व जलप्रदूषण टाळण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून नदी, विहिरी यांची जागा कृत्रिम तळ्यांनी घेतली. जुनी तळी विसर्जनासाठी बंद ठेवण्यात आली. काही तरी नागरिकांनी कचरा टाकून इतकी घाण केली की त्यांचा वापर भविष्यात होईल की नाही हे सांगता येत नाही.

गणेशोत्सव आला की कृत्रिम खेळांचे खोदकाम करणे, त्यात पाणीसाठा करणे, दीड, पाच दिवस सात व दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणे असा प्रशासनाचा दिनक्रम सुरू होतो. सातारा शहरात दरवर्षी कृत्रिम तळ्यांवर सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचा खर्च केला जातो. गेल्या पाच वर्षांचा विचार केला तर पालिकेला विसर्जन व्यवस्थेवर तब्बल दीड कोटींहून अधिक रुपये खर्च करावे लागले आहेत. इतक्या मोठ्या रकमेतून कायमस्वरूपी तळ्याचीदेखील उभारणी झाली असती. मात्र नागरिकांची, गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी दरवर्षी कृत्रिम तळ्यांची उभारणी करावी लागते. परंतु हे असं आणखी किती वर्षे चालणार आहे. विसर्जनासाठी नागरिकांनी, प्रशासनाने सक्षम पर्याय शोधायला हवा. अनेक नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे तळ्यांमध्ये नव्हे, तर घरच्या घरी विसर्जन करण्याचा नवा पायंडा सुरू केला आहे. ही चळवळ जर व्यापक झाली, तर अनेक प्रश्न आपोआपच सुटू शकतील.

(चौकट)

... तर कोट्यवधींचा खर्च वाचेल :

- जिल्हा प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून विहिरी, तलाव व नदीमध्ये मूर्तींचे विसर्जन केले जाते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे.

- मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामुळे जलप्रदूषण तर होतेच शिवाय जलचरांवरदेखील मोठा परिणाम होतो.

- हे रोखण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती कृत्रिम तळ्यांची उभारणी करत आहे. ठिकठिकाणी मूर्ती दान उपक्रमही राबविला जातो.

- केवळ प्रदूषण रोखणे हा यामागचा उद्देश असला, तरी नागरिकांच्या भावना दुखावू नयेत, यासाठी प्रशासनाला कृत्रिम तळ्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत

- मूर्तींचे आपण घरच्या घरी विसर्जन केले अथवा एकदा प्रतिष्ठापना केलेली मूर्ती तीन ते पाच वर्ष विसर्जित केली नाही, तर हा खर्च वाचू शकतो.

फोटो : जावेद खान