शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आधीच दुष्काळ; त्यात गळती!

By admin | Updated: October 16, 2015 22:42 IST

वाईत तेरावा महिना : मुख्य पाईपलाइनमधून लाखो लिटर पाणी वाया; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

वाई: वाई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनच्या व्हॉल्व्हला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिणामी नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. असे असतानाही पालिकेने याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने नागरिकांमधूून आश्चर्य व्यक्त केले जात आहेशासन पाणी वाचविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत असताना वाई नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून शासनाच्या प्रयत्नांना राजरोसपणे काळिमा फासण्याचे काम चालू आहे. ही बात गंभीर असून, त्यावर त्वरित उपाययोजना करणे गरज असताना पालिकेने मात्र अजून कोणतीही उपाययोजना केली नाही.याबात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ‘स्वच्छ वाई सुंदर वाई’ हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी हागणदारीमुक्त वाई शहर करण्याची संकल्पना आखण्यात येत असताना मुख्य पाईप लाईनच्या व्हॉल्व्हमधून होणारा बेसुमार पाण्याचा अपव्यय टाळण्यात पालिकेला अपयश येत आहे. पालिकेने संबंधित पाईपलाइनची तत्काळ दुरुस्ती करावी व पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मनसे उभारणार आंदोलन पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भीषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण होत असताना पालिकेकडून दररोज लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी चालू आहे़ ही अतिशय निदंनीय बाब असून, या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा ‘मनसे’च्या वतीने देण्यात आला आहे.जनतेच्या माथी भुर्दंड नको...वाई शहरात लाखो लिटर पाणी वाया जात आहे, याला जबाबदार कोण? पाण्यासाठीचा वसूल करण्यात येणारा कर संबंधित आधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा जनतेच्या माथी त्याचा भुर्दंड का? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.