शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सत्तेसाठी ‘आघाडी’च; पण जुनी की नवी !

By admin | Updated: February 22, 2017 22:57 IST

कऱ्हाड तालुका : कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही; सत्ता कोणाची येणार याचीच चर्चा

प्रमोद सुकरे ल्ल कऱ्हाडतालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ७३ टक्के मतदान मंगळवारी झाले. निवडणुकीपूर्वी अन् निवडणुकीनंतर काही ठिकाणी वादाचे प्रकारही घडले. आता पंचायत समितीवर कोणाची सत्ता येणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जो-तो आपापल्या परिने सत्तेचा दावा करीत आहे. पण एकूणच चित्र पाहता कोणा एकाला स्पष्ट बहुमताची शक्यता दिसत नाही. सत्तेसाठी पुन्हा आघाडीच करावी लागणार, हे निश्चित. पण सध्या पंचायत समितीत असणारी राष्ट्रवादी व उंडाळकर आघाडीच पुढे राहणार की दक्षिणेत अवतरलेली काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सत्तेसाठी एकत्रित येणार, हे पाहावे लागेल. सातारा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून कऱ्हाडकडे पाहिले जाते. येथे उत्तर अन् दक्षिण असे विधानसभेचेही दोन मतदारसंघ आहेत. या तालुक्यातून १२ जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधीत्व करतात. तर २४ पंचायत समिती सदस्य असणारी जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती कऱ्हाडचीच आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या कऱ्हाड तालुक्याला जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात महत्त्व आहे.अलीकडच्या काही वर्षांत कऱ्हाड तालुक्याचे राजकारण प्रत्येक निवडणुकीला वेगळे वळण घेताना दिसते. गेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणेवर स्वारी केली. त्यामुळे बंडखोर उंडाळकर अस्वस्थ झाले. त्यांनी भोसलेंना बरोबर घेत ‘मैत्रिपर्व’ सुरू केलं. पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते तुटलं ! त्याचवेळी कृष्णाकाठी ‘मनोमिलना’चे वारे वाहू लागले. दुसरीकडे ‘उत्तर’च्या आमदारांची इच्छा नसतानाही वाठारकर आबा, रेठरेकर दादा अन् उंडाळकर भाऊ यांच्या मागणीमुळे कुठे नव्हे ती दक्षिणेत काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी पाहायला मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत एकाच तालुक्यात दक्षिणेत तिरंगी तर उत्तरेत चौरंगी लढत पाहायला मिळाली. काही ठिकाणी या लढती बहुरंगीही झाल्या. दक्षिणेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, उंडाळकरांची विकास आघाडी अन् डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप अशी लढत झाली. तर उत्तरेत काँगे्रस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने ही लढत चौरंगी झाली. त्यामुळे मतविभागणीचा फायदा कोणाला अन् तोटा कोणाला हे निकालानंतरच स्पष्ट होईल. एकूणच पंचायत समितीवर एकट्या राष्ट्रवादीचं घड्याळ सत्तेची ‘टिक-टिक’ करू शकणार नाही. त्यासाठी ते काँगे्रसच्या हातात ‘हात’ घालणार की ‘कपबशी’तील चहा पित-पित जुनी आघाडीच पुढे कायम ठेवणार, हे पाहावे लागणार. शिवाय ‘कमळ’ हातात घेतलेले ‘बाबा’ आपल्या सदस्यांना विरोधी बाकांवर बसायला सांगणार की ‘मैत्रिपर्वा’चा नवा अध्याय सुरू करीत सत्तेत जाण्याचा प्रयत्न करणार, हे ही पाहावे लागेल. कारण राजकारणात कोणाचा कायमचा शत्रू नसतो म्हणे.