शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

सर्व विषयांमध्ये पास असूनही विद्यापीठ म्हणते नापास!

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

हजारो विद्यार्थी संभ्रमात : कला शाखेचे पहिले दोन वर्षे उत्तीर्ण असूनही अंतिम गुणपत्रिकेत केले नापास

सातारा : शिवाजी विद्यापीठांतर्गत घेतल्या जात असलेल्या परीक्षा, निकाल यांचा गोंधळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सातारा येथील एक तरुण कला शाखेतून पहिली दोन वर्षे उत्तीर्ण झालेला असताना तिसऱ्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविले आहे. त्यामुळे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सातारा, सांगली,कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा येथील गोरख कुंभार याने येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. तो पहिली दोन वर्षे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याने मार्च-एप्रिल २०१५ मध्ये तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच लागला. हा निकाल पाहिल्यानंतर त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याने मार्च एप्रिल २०१५ मध्ये सहा सेमिस्टरची परीक्षा दिली आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या निकालात सर्व विषयांत ‘पी’ दाखविलेले आहे. मात्र अंतिम निकाल पत्रिकेत त्याला अनुत्तीर्ण म्हणून जाहीर केले आहे. निकाल हातात पडल्यानंतर गोरख कुंभार याने सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यांनी ही चूक विद्यापीठाकडून झाल्याचे सांगत विद्यापीठाशीच संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुंभार हे दोन-तीन वेळा विद्यापीठात जाऊनही आले. त्याठिकाणी योग्य ती दखल न घेतल्याने कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एक पत्र देऊन निकाल बदलून देण्याची विनंती केली आहे. प्रकारच्याच तक्रारी असलेल्या हजारो विद्यार्थी विद्यापीठात येत आहेत. परीक्षा नियंत्रण मंडळांशी त्यांनी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांशी चांगली वागणूक दिली जात नाही. एका टेबलवरून दुसरीकडे फिरविले जात आहे. (प्रतिनिधी)निकाल लागून महिना संपत आला तरी बदल झालेला नाही. एम.ए. प्रवेशासाठी ३० जुलै हा अंतिम मुदत आहे. त्यामुळे पुढील वर्ष वाया जाऊ शकते. विद्यापीठात गेलो असता तेथेही आम्हाला हिन वागणूक देण्यात आली आहे. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसताना आत जाण्यास रोखले.- गोरख कुंभार, परीक्षार्थीचार हजार विद्यार्थ्यांपुढे तुझं काय होणार?गोरख कुंभार यासंदर्भात विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला असता अनोखाच अनुभव आला. ‘विद्यापीठात चार हजार विद्यार्थी आहेत. त्यात तुझं एकट्याचं काय घेऊन बसलास. तू कुठंही गेला तरी काही फरक पडणार नाही,’ असा सज्जड दमच त्या महाशयांनी भरला.सुरक्षारक्षकाकडून धक्काबुक्कीकोणतेही विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिर असते. या ज्ञानमंदिरात गेलेल्या विद्यार्थ्यांना अनोखाच अनुभव येत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी विद्यापीठात येत असतात. विद्यापीठातील सुरक्षारक्षकांकडून धक्काबुक्की सहन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.