शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्व विषयांमध्ये पास असूनही विद्यापीठ म्हणते नापास!

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

हजारो विद्यार्थी संभ्रमात : कला शाखेचे पहिले दोन वर्षे उत्तीर्ण असूनही अंतिम गुणपत्रिकेत केले नापास

सातारा : शिवाजी विद्यापीठांतर्गत घेतल्या जात असलेल्या परीक्षा, निकाल यांचा गोंधळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सातारा येथील एक तरुण कला शाखेतून पहिली दोन वर्षे उत्तीर्ण झालेला असताना तिसऱ्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविले आहे. त्यामुळे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सातारा, सांगली,कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा येथील गोरख कुंभार याने येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. तो पहिली दोन वर्षे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याने मार्च-एप्रिल २०१५ मध्ये तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच लागला. हा निकाल पाहिल्यानंतर त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याने मार्च एप्रिल २०१५ मध्ये सहा सेमिस्टरची परीक्षा दिली आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या निकालात सर्व विषयांत ‘पी’ दाखविलेले आहे. मात्र अंतिम निकाल पत्रिकेत त्याला अनुत्तीर्ण म्हणून जाहीर केले आहे. निकाल हातात पडल्यानंतर गोरख कुंभार याने सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यांनी ही चूक विद्यापीठाकडून झाल्याचे सांगत विद्यापीठाशीच संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुंभार हे दोन-तीन वेळा विद्यापीठात जाऊनही आले. त्याठिकाणी योग्य ती दखल न घेतल्याने कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एक पत्र देऊन निकाल बदलून देण्याची विनंती केली आहे. प्रकारच्याच तक्रारी असलेल्या हजारो विद्यार्थी विद्यापीठात येत आहेत. परीक्षा नियंत्रण मंडळांशी त्यांनी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांशी चांगली वागणूक दिली जात नाही. एका टेबलवरून दुसरीकडे फिरविले जात आहे. (प्रतिनिधी)निकाल लागून महिना संपत आला तरी बदल झालेला नाही. एम.ए. प्रवेशासाठी ३० जुलै हा अंतिम मुदत आहे. त्यामुळे पुढील वर्ष वाया जाऊ शकते. विद्यापीठात गेलो असता तेथेही आम्हाला हिन वागणूक देण्यात आली आहे. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसताना आत जाण्यास रोखले.- गोरख कुंभार, परीक्षार्थीचार हजार विद्यार्थ्यांपुढे तुझं काय होणार?गोरख कुंभार यासंदर्भात विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला असता अनोखाच अनुभव आला. ‘विद्यापीठात चार हजार विद्यार्थी आहेत. त्यात तुझं एकट्याचं काय घेऊन बसलास. तू कुठंही गेला तरी काही फरक पडणार नाही,’ असा सज्जड दमच त्या महाशयांनी भरला.सुरक्षारक्षकाकडून धक्काबुक्कीकोणतेही विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिर असते. या ज्ञानमंदिरात गेलेल्या विद्यार्थ्यांना अनोखाच अनुभव येत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी विद्यापीठात येत असतात. विद्यापीठातील सुरक्षारक्षकांकडून धक्काबुक्की सहन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.