शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आता सर्व दुकाने सुरु राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

सातारा : सातारा जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणीतील रुग्णवाढ कमी झाल्याने सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ...

सातारा : सातारा जिल्ह्यातील आरटीपीसीआर तपासणीतील रुग्णवाढ कमी झाल्याने सातारा जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी काढले. हे आदेश २६ जुलैपासून ते पुढील आदेश होईपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत.

सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार, सातारा जिल्ह्यामध्ये आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी ५ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, औषधांची दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पिटलमधील औषधांची दुकाने पूर्णवेळ सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकान, आस्थापना या सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट यांना आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ या कालावधीत घरपोच पार्सल सेवा सुरु ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग सुरु ठेवण्यास परवानगी असेल. ज्या हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये लॉजिंग सुविधा उपलब्ध आहे, अशा हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ या कालावधीमध्ये आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी असेल. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, चालणे, सायकल चालविणे यासाठी आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ यावेळेत परवानगी असेल. खुल्या जागेतील क्रीडाविषयक बाबी या आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ५ ते ९ यावेळेत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र, कोणत्याही क्रीडासंबंधी स्पर्धा आयोजित करण्यास मनाई असेल.

चित्रीकरण - आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी ५ नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. लग्न समारंभ दोन तासांपेक्षा जास्त नसेल इतक्या कालावधीत २५ लोकांच्या (संपूर्ण कार्यक्रमासाठी भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी/वाढपी इ.सह) मर्यादेत लग्न आयोजन करण्याकामी संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.

सर्व बांधकामांना परवानगी असेल. ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल, त्यांनी बांधकाम करण्यास हरकत नाही. तथापि, ज्या मजुरांची राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी नसेल, अशा मजुरांनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत बांधकामाचे ठिकाण सोडावे. शेतकऱ्यांना आवश्यक असणारे बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवांची दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल.

हे पूर्णत: बंदच राहणार...

सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रार्थनास्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे, व्यायामशाळा, स्पा, वेलनेस सेंटर, मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे आदी पूर्णपणे बंद राहतील.

बाजार समित्यांमध्ये सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत व्यवहार

सातारा जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांनाच तेथे जाऊन माल घेता येईल, कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीला बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल, या शर्तीसह समित्या सुरु राहतील.