शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कुडाळच्या सरपंच निवडीकडे साऱ्यांचेच लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सरपंच आरक्षणही जाहीर झाले. आता ८,९, १० फेब्रुवारी रोजी गावचा ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सरपंच आरक्षणही जाहीर झाले. आता ८,९, १० फेब्रुवारी रोजी गावचा कारभारी निवडला जाणार आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या कुडाळच्या ग्रामपंचायतीत त्रिशंकू परिस्थिती असल्याने या ठिकाणी कोणाचा सरपंच होणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

जावळी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काही ठिकाणी बिनविरोध तर काही अंशतः निवडणुका लागल्या होत्या. गावचे सरपंच आरक्षणात जाहीर झाले, यात मात्र अनेकांचा हिरमोड झाला. आता पुढील आठवड्यात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा होऊन सरपंचाची निवड होणार असल्याने बहुमत सिद्ध करण्याकरिता हालचाल होऊ लागली आहे.

ज्या ठिकाणी काठावरचे बहुमत आहे, अशा ग्रामपंचतीत खरी चुरस पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी सरपंच आरक्षणाचा उमेदवार नसल्याने हे पद रिक्तच राहणार आहे.

तालुक्याची सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुडाळमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. उपसभापती सौरभ शिंदे यांच्या रयत पॅनलला सर्वाधिक सात जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदासाठी हेच प्रमुख दावेदार असू शकतात. मात्र बहुमतासाठी त्यांना एका मताची गरज आहे. माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या चार जागा असून, हेमंत शिंदे व संजय शिंदे यांच्या कुडाळ बहुजन विकास आघाडीकडे चार जागा आहेत. राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो, राज्याच्या राजकारणावरून याची प्रचिती मिळाली आहे. यामुळे येथील सरपंच निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. यामुळे सरपंचपदासाठी येथे नेमकी काय खलबते घडणार, हे लवकरच स्पष्ट होईल. तसेच गावकारभारी ठरवण्यासाठी नेमकी कोणाची साथ कोणाला मिळणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.