शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

कोरोना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा राहणार सक्रिय सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढतच चालले असल्याने जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आता पूर्ण तयारीनिशी या लढ्यात उतरले आहेत. ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढतच चालले असल्याने जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आता पूर्ण तयारीनिशी या लढ्यात उतरले आहेत. कोरोना रोखण्यासाठी सर्व विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच एखादा रुग्ण सापडला तर निकट सहवासित किमान ३० लोकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी किंवा त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सुरुवातीच्या काळात कमी बाधित आढळले. पण, जुलै महिन्यापासून कोरोनाचा कहर होता. हा कहर सप्टेंबर महिन्यापर्यंत चालला. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत गेली. मात्र, या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा बाधित वाढू लागले. मार्च महिन्यापेक्षा एप्रिलमध्ये कहर आहे. गेल्या काही दिवसांत तर हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता ७९ हजारांजवळ पोहोचला आहे. तर आतापर्यंत २ हजार ४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण व मृतांचा वाढता आकडा पाहता प्रशासनासमोर चिंता निर्माण झाली आहे. त्यातूनच जिल्हा परिषदेने कोरोना रोखण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

जिल्हा परिषदेत विविध विभाग कार्यरत आहेत. या विभागांच्या प्रमुखांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. तर कोरोना लसीकरण मोहीमही जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. आतापर्यंत पावणेचार लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे. लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणात मोहीम वेगाने सुरू आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याकडे एका तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणातील अडथळ्यांचे प्रमाण नगण्य झाले आहे.

यामधील महत्त्वाची बाब म्हणजे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध. कारण, एका रुग्णामुळे त्याच्या निकट आलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा होऊ शकते. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक काम करत होते. पण, त्यांच्या जोडीला प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर चार तंत्रस्नेही शिक्षक तर उपकेंद्रस्तरावर २ शिक्षक कार्यरत असणार आहेत. या माध्यमातून रुग्णाच्या संपर्कातील ३० लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे गावपातळीवर कोरोना साखळी तुटण्यासाठी मदत होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंतच्या कोरोना लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून आता इतर विभागही पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग सक्रिय होणार आहेत.

कोट :

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग आता या कोरोना लढ्यात आहेत. प्रत्येक विभागप्रमुखांकडे एक-एक जबादारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या संपर्कातील ३० जणांचा शोध घेण्यात येणार आहे. यामुळे कोरोना साखळी खंडित होईल. कोरोना रोखण्यासाठी लोकांचीही साथ महत्त्वाची आहे.

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी

...........................................................