शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा राहणार सक्रिय सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढतच चालले असल्याने जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आता पूर्ण तयारीनिशी या लढ्यात उतरले आहेत. ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढतच चालले असल्याने जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आता पूर्ण तयारीनिशी या लढ्यात उतरले आहेत. कोरोना रोखण्यासाठी सर्व विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच एखादा रुग्ण सापडला तर निकट सहवासित किमान ३० लोकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी किंवा त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सुरुवातीच्या काळात कमी बाधित आढळले. पण, जुलै महिन्यापासून कोरोनाचा कहर होता. हा कहर सप्टेंबर महिन्यापर्यंत चालला. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत गेली. मात्र, या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा बाधित वाढू लागले. मार्च महिन्यापेक्षा एप्रिलमध्ये कहर आहे. गेल्या काही दिवसांत तर हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता ७९ हजारांजवळ पोहोचला आहे. तर आतापर्यंत २ हजार ४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण व मृतांचा वाढता आकडा पाहता प्रशासनासमोर चिंता निर्माण झाली आहे. त्यातूनच जिल्हा परिषदेने कोरोना रोखण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

जिल्हा परिषदेत विविध विभाग कार्यरत आहेत. या विभागांच्या प्रमुखांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. तर कोरोना लसीकरण मोहीमही जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. आतापर्यंत पावणेचार लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे. लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणात मोहीम वेगाने सुरू आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याकडे एका तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणातील अडथळ्यांचे प्रमाण नगण्य झाले आहे.

यामधील महत्त्वाची बाब म्हणजे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध. कारण, एका रुग्णामुळे त्याच्या निकट आलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा होऊ शकते. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक काम करत होते. पण, त्यांच्या जोडीला प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर चार तंत्रस्नेही शिक्षक तर उपकेंद्रस्तरावर २ शिक्षक कार्यरत असणार आहेत. या माध्यमातून रुग्णाच्या संपर्कातील ३० लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे गावपातळीवर कोरोना साखळी तुटण्यासाठी मदत होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंतच्या कोरोना लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून आता इतर विभागही पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग सक्रिय होणार आहेत.

कोट :

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग आता या कोरोना लढ्यात आहेत. प्रत्येक विभागप्रमुखांकडे एक-एक जबादारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या संपर्कातील ३० जणांचा शोध घेण्यात येणार आहे. यामुळे कोरोना साखळी खंडित होईल. कोरोना रोखण्यासाठी लोकांचीही साथ महत्त्वाची आहे.

- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी

...........................................................