शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

इथल्याही पुलांना ‘सावित्री’चं भय...

By admin | Updated: August 4, 2016 01:30 IST

जिल्ह्यातील १० पेक्षाही जास्त पूल ब्रिटिशकालीन

सातारा : महाडच्या ‘सावित्री’ नदीनं तब्बल ३० जणांना पोटात घेतल्यानंतर ब्रिटिशकालीन पुलांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील तिच्याच भगिनी असणाऱ्या नद्यांवरील जुन्या पुलांचा वापर आजही जनतेच्या नाकावर टिच्चून केला जातोय. अनेक पुलांनी ‘शंभरी’ गाठलीय. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नोंदीनुसार यातील काही पूल ‘गुड कंडिशन’मध्ये असले तरी कोणत्याही क्षणी या पुलावर ‘महाड’सारखी दुर्घटना घडू शकते. जुने पूल पाडून नवीन वाहतूक व्यवस्था निर्माण करा, ही सर्वसामान्य सातारकरांची आर्त हाक आजपावेतो शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचलीच नाही. म्हणून ‘लोकमत टीम’ने जिल्ह्यात प्रत्येक ब्रिटिशकालीन पुलाचा घेतलेला शोध...सातारकर धाडसी की यंत्रणा बेफिकीर ?धोकादायक पुलावरून प्रवास : बांधकाम विभागाकडे ‘गुड कंडिशन’ म्हणून नोंदजावेद खान-साताऱ्यातील संगमनगर येथील कृष्णा नदीवरील कृष्णा पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली असूनदेखील या पुलाला अद्यापही धोका नसल्याचे बांधकाम विभागाने सांगितले असले तरी पुलाला भिंतीमध्ये वाढतच जाणाऱ्या पिंपळाच्या झाडांची मुळे खोलवर रुजून बांधकाम ठिसूळ करण्याच्या मार्गावर आहेत. तर पुलावर पडलेल्या खड्ड्यात वाहने आदळत असल्याने पुलावर मोठे दणके बसत असल्याने या पुलाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांतून प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. महाड येथील ब्रिटिश काळातील पूल वाहून गेला. यामध्ये दोन एसटी बसेस प्रवाशांसह वाहून गेल्याची भीती व्यक्त होत असताना मात्र सातारकरांना कृष्णा पुलाबाबत काळजी वाटू लागली आहे. दि. २८ जून १९१५ रोजी या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानुसार जून २०१५ रोजी या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, या पुलाबाबत वैधता संपल्याचे ब्रिटिशांचे पत्रही बांधकाम विभागाला आले होते. परंतु बांधकाम विभागाने या पुलाची पाहणी करत अजून काही वर्षे या पुलाला कोणताच धोका नसल्याचे सांगितले आहे. तरी देखील आजच्या घटनेमुळे सातारकरांना या पुलाबाबत काळजी वाटू लागली आहे.एकूण ७ कमानी असलेला दगडी पूल हा साताऱ्याच्या कृष्णा नदीत वैभवाला भर टाकत आहे. सध्या या पुलाच्या दोन्ही बाजूस काही ठिकाणी पिंपळाची झाडे वाढत आहेत. यांची मुळे दगडाच्या खाचांमधून खोलवर रुजली आहेत. तर पुलाच्या रस्त्यावरच मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून येणारे प्रत्येक वाहन जागो-जागी खड्ड्यात आदळत असून, याचा दणकाही पुलाला बसत असल्याने हा पूल रहदारीला कितपत सुरक्षित असू शकतो, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या पुलांव्यतिरिक्त जिल्ह्यातील नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या हद्दीत असणारे जुने पूलही धोकादायक ठरत आहेत. या बाबीकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.ब्रिटिश एजन्सीचे पत्र‘लोकमत’ने या धोकादायक पुलांबाबत वेळोवेळी आवाज उठवला आहे. ब्रिटिश एजन्सीने यातील बहुतांश पुलांबाबत प्रशासनाला पत्र पाठवून सजग केले असले तरीही बांधकाम खात्याच्या दफ्तरी यापैकी बहुसंख्य पुलांची नोंद ‘इन गुड कंडिशन’ अशी असल्याचे वास्तव समोर येत आहे. महाडच्या दुर्घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलांचा तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. यापूर्वीचे रिपोर्ट काय आहेत, यावर विसंबून राहण्यापेक्षा आजच्या क्षणी जिल्ह्यातील जुन्या पुलांची अवस्था जाणून घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ब्रिटिशकालीन पुलांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. सातारा-कोरेगाव रस्त्यावरील माहुली पुलाचा अभ्यास मे महिन्यात केला असला तरी आज पुन्हा एकदा या पुलाच्या सुरक्षिततेविषयी अभ्यास करण्यात आला आहे. नवीन पुलाच्या बांधकामासाठी लवकरात लवकर प्रक्रिया राबविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.- अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी, सातारा