शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

मित्रांना सांगूनच अक्षयने केले होते विषप्राशन...

By admin | Updated: January 26, 2015 00:45 IST

वादही झाला : मित्रांनी पेनाने टोचले म्हणून संताप, शाळेतून तडक घरी परतला

सातारा : आईच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला आणि मुळातच ‘शॉर्ट टेम्परड’ असणारा अक्षय चव्हाण याला शनिवारी शाळेत काही मित्रांनी पेनाने टोचले आणि तो आणखी भडकला. यावेळी मित्रांशी त्याचा थोडाफार किरकोळ वादही झाला. परिणामी तो आणखी चिडला. संतापलेल्या अक्षयने शाळा अर्ध्यातूनच टाकून तडक घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. मित्रांनी त्याला अडविले; मात्र तो कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. ‘मी आता औषध घेणारच आणि जीव संपवणार,’ असा निर्णयच त्याने येथे जाहीर केला. तो तडक घराकडे आला आणि येथेच त्याने उंदीर मारण्यासाठी ठेवलेले औषध पाण्यात मिश्रण करून प्यायला. मात्र, अक्षयचे शिक्षक संजय वीरकर आणि अनिकेत बोराटे विद्यार्थी मित्राने दाखविलेल्या तत्परतेमुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात यश आले. अक्षय चव्हाण हा बारा वर्षीय विद्यार्थी त्रिपुटी येथील एका शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आईची भेट होत नसल्याचे कारणाने व्याकूळ होऊन शनिवारी त्याने सकाळी उंदीर मारण्याचे औषध पाण्यात मिश्रण करून प्यायला. यामुळे त्याला उलट्या झाल्या. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे प्राण वाचले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. अक्षयचे वडील हयात नाहीत. आजोबा शिवाजी ब्रह्मानंद चव्हाण (वय ७०) आणि आजी फुलाबाई (वय ६५) त्याचा सांभाळ करत आहेत. अक्षयची आई मात्र, महाड येथे मोलमजुरी करते. तिने तिच्यासमवेत आपल्या थोरल्या मुलाला ठेवले आहे. अक्षयदेखील तिच्याकडेच होता. मात्र, येथे तो शाळेत जात नव्हता. परिणामी गेल्यावर्षी त्याला त्याच्या आजोबांनी महाड येथून त्रिपुटीत आणले आणि शाळेत टाकले. सुरुवातीच्या काळात काही वाचायलाही न येणारा अक्षय मात्र, दोन वर्षांत इतका तयार झाला की खो-खो आणि कबड्डीतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याने नाव मिळविले. तो गृहपाठातही तत्परता दाखवू लागल्याने तो शाळेतील शिक्षकांचा आवडता बनला. मात्र, तत्काळ संतापणे ही त्याची सवय कायमचीच होती. त्याची प्रचिती शनिवारी अनेकांना आली.रविवारी तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला आत्महत्येचा मनात विचार का आला, अशी विचारणा केली तर अक्षय त्यावर काही फारसा बोलला नाही. मात्र, त्याचे आजोबा शिवाजी आणि आजी फुलाबाई यांचा चेहरा रडवेला झाला होता. २००५ मध्ये अक्षयच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तो काही दिवस महाडला आईकडे राहिला. मात्र, आता तो आजी-आजोबांकडे आहे. झाडावर बसून अक्षय पाहत होता...अक्षयचे आजोबा शिवाजी चव्हाण त्याला नेहमी शाळेत जाण्यासाठी आग्रह करायचे; मात्र अक्षयला अनेकदा शाळेत जायचा कंटाळा यायचा. अक्षय शाळेत जात नसल्याचे पाहून आजोबांनी त्याला मारहाणही केली. मात्र, सारखा-सारखा आग्रह होत असल्याचे पाहून अक्षय एकदा घरातून पळून गेल्याची आठवण आजोबांनी सांगितली. अक्षयला गावातील अनेक मंडळी शोधत होती. कदाचित तो आपल्या आईकडे महाड येथे गेला असावा म्हणून आजोबा तिकडे गेले. मात्र, अक्षय तेथेही नव्हता. अक्षय मात्र हा संपूर्ण प्रकार गावातील एका झाडावर बसून पाहत होता, अशी आठवणही त्याची आजी आणि शिक्षकाने यावेळी सांगितली. बाळा पुन्हा असे करू नकोसजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे आजी, आजोबा अतिशय घाबरले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पाहून ‘बाळा, पुन्हा कधी असे करू नकोस,’ असे रडतच्या त्याच्यापुढे विनंती करत होते. ‘तुझी आई आता दोन दिवसांनी त्रिपुटीला येणार आहे. त्यामुळे तू आता तिच्यासाठी व्याकूळ होऊ नकोस,’ असेही आजी-आजोबा अक्षयला सांगत होते.