शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आढाव दाम्पत्यावरील बहिष्कार मागे

By admin | Updated: February 25, 2015 00:02 IST

‘लोकमत’चा प्रभाव : एकी टिकविणार; मरडमुरे ग्रामस्थांकडून प्रशासनाला लेखी ग्वाही

सातारा : यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमावरून तानाजी गणपत आढाव आणि त्यांच्या पत्नी रंजना यांच्यावर जावली तालुक्यातील मरडमुरे ग्रामस्थांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने मंगळवारी ग्रामस्थांची बैठक घेतली. गावकीच्या माध्यमातून बहिष्कार टाकणे, दंड करणे असे प्रकार यापुढे होणार नाहीत, अशी लेखी ग्वाही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली.यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमातील वादावादीतून ही घटना घडल्याचे समोर आले होते. तानाजी आणि रंजना आढाव यांनी आपल्याला बहिष्कृत केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे लेखी तक्रार केली होती. गावातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्याला बोलावले जात नाही, असे त्यांनी म्हटले होते. शुक्रवारच्या (दि. २०) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जावळीचे तहसीलदार रणजित देसाई आणि सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी ग्रामस्थांची बैठक बोलाविली. बैठकीला प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच ‘अंनिस’च्या डॉ. शैला दाभोलकर, प्रशांत पोतदार, शंकर कणसे उपस्थित होते. बहिष्कृत दाम्पत्य आणि ग्रामस्थांना तहसीलदारांनी म्हणणे मांडण्यास सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमावरून गावातील काही तरुण आणि आढाव यांचा मुलगा सुनील यांच्यात वादाचा प्रसंग उद््भवला आणि त्यातून हा प्रकार घडला, असे समोर आले. अशा कारणावरून दंड आकारण्याचा अथवा कोणाला बहिष्कृत करण्याचा प्रकार घटनाबाह्य असून, संबंधितांना क़डक शासन होऊ शकते, याची समज तहसीलदार देसाई आणि सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी ग्रामस्थांना दिली. काही वेळा वादाचे प्रसंगही उद््भवले; मात्र अंतिमत: सामोपचाराने घेत ग्रामस्थांनी असे प्रकार भविष्यात घडू न देण्याची ग्वाही दिली. गावकीच्या माध्यमातून गावातले वाद गावात मिटविण्याची पद्धत योग्य असली, तरी पुढे घडणारे प्रकार कायद्याला मान्य नसल्याने यापुढे गावकीद्वारे निर्णय न घेता तंटामुक्ती समिती आणि पोलिसांचीच मदत याकामी घेतली जाईल, हेही ग्रामस्थांनी मान्य केले. (प्रतिनिधी)साखर वाटून आनंद व्यक्तबैठकीत सामोपचाराने निर्णय झाल्यानंतर बहिष्कृत आढाव दाम्पत्याला सरपंच शालन भिकू मर्ढेकर यांनी साखर दिली. नंतर आढाव दाम्पत्याने गावकऱ्यांना साखर वाटून आनंद व्यक्त केला. ाावात या वर्षभरात झालेल्या तीन विवाहांच्या पत्रिका आढाव दाम्पत्याला देण्यात आल्या नव्हत्या. तथापि, ‘लोकमत’मधील वृत्तानंतर दुसऱ्याच दिवशी एक लग्नपत्रिका या दाम्पत्याला देण्यात आली. असेच गोड वातावरण कायम राखण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. (संबंधित वृत्त पान २ वर)