शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

आढाव दाम्पत्यावरील बहिष्कार मागे

By admin | Updated: February 25, 2015 00:02 IST

‘लोकमत’चा प्रभाव : एकी टिकविणार; मरडमुरे ग्रामस्थांकडून प्रशासनाला लेखी ग्वाही

सातारा : यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमावरून तानाजी गणपत आढाव आणि त्यांच्या पत्नी रंजना यांच्यावर जावली तालुक्यातील मरडमुरे ग्रामस्थांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासनाने मंगळवारी ग्रामस्थांची बैठक घेतली. गावकीच्या माध्यमातून बहिष्कार टाकणे, दंड करणे असे प्रकार यापुढे होणार नाहीत, अशी लेखी ग्वाही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली.यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रमातील वादावादीतून ही घटना घडल्याचे समोर आले होते. तानाजी आणि रंजना आढाव यांनी आपल्याला बहिष्कृत केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे लेखी तक्रार केली होती. गावातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्याला बोलावले जात नाही, असे त्यांनी म्हटले होते. शुक्रवारच्या (दि. २०) ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच जावळीचे तहसीलदार रणजित देसाई आणि सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी ग्रामस्थांची बैठक बोलाविली. बैठकीला प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच ‘अंनिस’च्या डॉ. शैला दाभोलकर, प्रशांत पोतदार, शंकर कणसे उपस्थित होते. बहिष्कृत दाम्पत्य आणि ग्रामस्थांना तहसीलदारांनी म्हणणे मांडण्यास सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमावरून गावातील काही तरुण आणि आढाव यांचा मुलगा सुनील यांच्यात वादाचा प्रसंग उद््भवला आणि त्यातून हा प्रकार घडला, असे समोर आले. अशा कारणावरून दंड आकारण्याचा अथवा कोणाला बहिष्कृत करण्याचा प्रकार घटनाबाह्य असून, संबंधितांना क़डक शासन होऊ शकते, याची समज तहसीलदार देसाई आणि सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी ग्रामस्थांना दिली. काही वेळा वादाचे प्रसंगही उद््भवले; मात्र अंतिमत: सामोपचाराने घेत ग्रामस्थांनी असे प्रकार भविष्यात घडू न देण्याची ग्वाही दिली. गावकीच्या माध्यमातून गावातले वाद गावात मिटविण्याची पद्धत योग्य असली, तरी पुढे घडणारे प्रकार कायद्याला मान्य नसल्याने यापुढे गावकीद्वारे निर्णय न घेता तंटामुक्ती समिती आणि पोलिसांचीच मदत याकामी घेतली जाईल, हेही ग्रामस्थांनी मान्य केले. (प्रतिनिधी)साखर वाटून आनंद व्यक्तबैठकीत सामोपचाराने निर्णय झाल्यानंतर बहिष्कृत आढाव दाम्पत्याला सरपंच शालन भिकू मर्ढेकर यांनी साखर दिली. नंतर आढाव दाम्पत्याने गावकऱ्यांना साखर वाटून आनंद व्यक्त केला. ाावात या वर्षभरात झालेल्या तीन विवाहांच्या पत्रिका आढाव दाम्पत्याला देण्यात आल्या नव्हत्या. तथापि, ‘लोकमत’मधील वृत्तानंतर दुसऱ्याच दिवशी एक लग्नपत्रिका या दाम्पत्याला देण्यात आली. असेच गोड वातावरण कायम राखण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. (संबंधित वृत्त पान २ वर)