शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

वायू प्रदूषणाने नागरिक त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:12 IST

सातारा : गेली सव्वा वर्ष सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम आणि भुयारी गटार योजना सातारकरांसाठी उपयुक्त असली तरीही त्यामुळे ...

सातारा : गेली सव्वा वर्ष सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम आणि भुयारी गटार योजना सातारकरांसाठी उपयुक्त असली तरीही त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कामामुळे हवेत धूलिकण मिसळून सातारकरांना श्वसनाचे आजार उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुखावह व्हावी, या उद्देशाने ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले. हे काम सुरू असतानाच सर्वत्र भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाले. या दोन्ही योजना सातारकरांसाठी उपयुक्त असल्या तरीही त्यामुळे अनेक सातारकरांना श्वसनाचे आजार जडले आहेत. दिवसभर शहरात विविध ठिकाणी कामं सुरू असल्यामुळे शहराच्या कुठल्याही टोकावर गेलो तरी धूलिकणांचा त्रास सर्वांना जाणवत आहेच.वायू प्रदूषणाबरोबरच साताऱ्यातील नैसर्गिक स्त्रोत असलेल्या तळ्यांमधील पाणीही प्रदूषणमुक्त नाही. शहरातील मंगळवार तळे, मोती तळे आणि हत्ती तळे यांची अवस्था प्रदूषणामुळे बिकट झाली आहे. मोती तळ्याने तर प्रदूषणाची सर्व मानके ओलांडली आहेत. त्यामुळे मोती तळं आता धोका पातळीच्या पलीकडे जाऊन पोहोचले आहे.सातारा शहरातील ड्रेनेजचे पाणी ओढ्यामार्गे वेण्णा नदीला मिसळतं. वेण्णा नदी माहुलीजवळ कृष्णेला मिसळतं. जिथं या दोन्ही नद्यांचा संगम होतो तिथून अगदी ४०० मीटर अंतरावर सातारा शहर व परिसराला पाणी पुरवठा करणारी कृष्णा उद्भव योजना आहे. सगळ्या साताºयाचे ड्रेनेजचे पाणी या संगमात कृष्णा नदीत मिसळतं. तिथून ४०० मीटर अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पाणी उपसतं. अगदी जागतिक दर्जाचं जलशुध्दीकरण यंत्रणा इथं बसविण्यात आली तरीही पाण्यात मिसळलेले हे घटक काढणे केवळ अशक्य ठरतं. पाणी पुरवठा योजनापासून थोड्या अंतरावर स्मशानभूमी आहे. येथे येणारे वाहतं पाणी म्हणून मृत व्यक्तीचे कपडे, साहित्य, गादी, चादरी अशा अनेक वस्तू पाण्यात सोडतात.प्रशासन काय उपाय करतेय?जल, वायू व ध्वनी प्रदूषण ही सर्वच शहरांपुढील भीषण समस्या बनली आहे. सातारा शहरात प्रामुख्याने ध्वनी व वायू प्रदूषणाचे प्रमाण प्रकर्षाने जाणवते. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी घरे, कारखाने, वाहने यामधून होणाºया धुराचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या वायू प्रदूषणाचा मुद्दा पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. सातारा शहरातून दररोज जवळपास सत्तर टन ओला व सुका कचरा संकलित केला जातो. या कचºयाची सोनगाव येथील डेपोत विल्हेवाट लावली जाते. आतापर्यंत अनेकदा डेपोतील कचरा पेटल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले आहे. हे टाळण्यासाठी पालिकेकडून कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, येथे कचºयाची वर्गवारी करून विल्हेवाट लावली जाणार आहे. तसेच कचºयापासून खतनिर्मितीवर भर दिला जाणार आहे. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी देखील प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पिण्याच्या पाण्यामध्ये जंतुनाशक औषधांचा उपयोग केला जातो. शहरातील पाणी साठवण टाक्यांची वेळोवेळी स्वच्छता केली जाते. सांडपाण्याचे निर्मलून करण्यासाठी पालिकेने भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतली असून, या योजनेचे कामही प्रगतिपथावर आहे.