शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वायू प्रदूषणाने नागरिक त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:12 IST

सातारा : गेली सव्वा वर्ष सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम आणि भुयारी गटार योजना सातारकरांसाठी उपयुक्त असली तरीही त्यामुळे ...

सातारा : गेली सव्वा वर्ष सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम आणि भुयारी गटार योजना सातारकरांसाठी उपयुक्त असली तरीही त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कामामुळे हवेत धूलिकण मिसळून सातारकरांना श्वसनाचे आजार उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुखावह व्हावी, या उद्देशाने ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले. हे काम सुरू असतानाच सर्वत्र भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाले. या दोन्ही योजना सातारकरांसाठी उपयुक्त असल्या तरीही त्यामुळे अनेक सातारकरांना श्वसनाचे आजार जडले आहेत. दिवसभर शहरात विविध ठिकाणी कामं सुरू असल्यामुळे शहराच्या कुठल्याही टोकावर गेलो तरी धूलिकणांचा त्रास सर्वांना जाणवत आहेच.वायू प्रदूषणाबरोबरच साताऱ्यातील नैसर्गिक स्त्रोत असलेल्या तळ्यांमधील पाणीही प्रदूषणमुक्त नाही. शहरातील मंगळवार तळे, मोती तळे आणि हत्ती तळे यांची अवस्था प्रदूषणामुळे बिकट झाली आहे. मोती तळ्याने तर प्रदूषणाची सर्व मानके ओलांडली आहेत. त्यामुळे मोती तळं आता धोका पातळीच्या पलीकडे जाऊन पोहोचले आहे.सातारा शहरातील ड्रेनेजचे पाणी ओढ्यामार्गे वेण्णा नदीला मिसळतं. वेण्णा नदी माहुलीजवळ कृष्णेला मिसळतं. जिथं या दोन्ही नद्यांचा संगम होतो तिथून अगदी ४०० मीटर अंतरावर सातारा शहर व परिसराला पाणी पुरवठा करणारी कृष्णा उद्भव योजना आहे. सगळ्या साताºयाचे ड्रेनेजचे पाणी या संगमात कृष्णा नदीत मिसळतं. तिथून ४०० मीटर अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पाणी उपसतं. अगदी जागतिक दर्जाचं जलशुध्दीकरण यंत्रणा इथं बसविण्यात आली तरीही पाण्यात मिसळलेले हे घटक काढणे केवळ अशक्य ठरतं. पाणी पुरवठा योजनापासून थोड्या अंतरावर स्मशानभूमी आहे. येथे येणारे वाहतं पाणी म्हणून मृत व्यक्तीचे कपडे, साहित्य, गादी, चादरी अशा अनेक वस्तू पाण्यात सोडतात.प्रशासन काय उपाय करतेय?जल, वायू व ध्वनी प्रदूषण ही सर्वच शहरांपुढील भीषण समस्या बनली आहे. सातारा शहरात प्रामुख्याने ध्वनी व वायू प्रदूषणाचे प्रमाण प्रकर्षाने जाणवते. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी घरे, कारखाने, वाहने यामधून होणाºया धुराचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या वायू प्रदूषणाचा मुद्दा पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. सातारा शहरातून दररोज जवळपास सत्तर टन ओला व सुका कचरा संकलित केला जातो. या कचºयाची सोनगाव येथील डेपोत विल्हेवाट लावली जाते. आतापर्यंत अनेकदा डेपोतील कचरा पेटल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले आहे. हे टाळण्यासाठी पालिकेकडून कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, येथे कचºयाची वर्गवारी करून विल्हेवाट लावली जाणार आहे. तसेच कचºयापासून खतनिर्मितीवर भर दिला जाणार आहे. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी देखील प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पिण्याच्या पाण्यामध्ये जंतुनाशक औषधांचा उपयोग केला जातो. शहरातील पाणी साठवण टाक्यांची वेळोवेळी स्वच्छता केली जाते. सांडपाण्याचे निर्मलून करण्यासाठी पालिकेने भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतली असून, या योजनेचे कामही प्रगतिपथावर आहे.