शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

धोम-बलकवडी, नीरा-देवघरमुळे कृषीक्रांती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

खंडाळा : खंडाळा तालुका हा कायम दुष्काळी म्हणून गणला जात होता. उन्हाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याची टंचाई ही ...

खंडाळा : खंडाळा तालुका हा कायम दुष्काळी म्हणून गणला जात होता. उन्हाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याची टंचाई ही ठरलेली असायची; मात्र धोम-बलकवडी आणि नीरा-देवघरच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्याने दुष्काळाचे सावट दूर होऊन तालुक्याची तहान भागलेली आहे. या प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला असून, शेतीपिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे कालवे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत.

खंडाळा तालुका हा तसा पिढ्यान्‌ पिढ्याचा दुष्काळी तालुका. शेती सिंचनाचा प्रश्न सोडाच; पण पिण्याच्या पाण्याचीही इथं उन्हाळ्यात वानवा व्हायची. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते; पण डोंगर पोखरून धोम-बलकवडी आणि नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे तालुक्यात पोहोचले. त्यामुळे पाण्यासाठी लोकांची होणारी फरफट थांबली आहे. धोम-बलकवडी प्रकल्पांतर्गत खंडाळा, बावडा, पारगाव, म्हावशी, अहिरे, खेड बुद्रुक, बोरी, पाडळी, निंबोडी, सुखेड यांसह १८ गावे लाभक्षेत्रात आली आहेत तर नीरा-देवघरच्या लाभक्षेत्रात शेखमिरेवाडी, मोर्वे, भादे, अंदोरी, शेडगेवाडी, कराडवाडी, वाघोशी, भोळी यांसह २४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

या दोन्ही कालव्यांना पाणी वाटप करारानुसार आवर्तने सोडली जातात, त्यामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होत आहे. पारंपरिक सिंचन स्त्रोतामध्ये पाणी क्षमता वाढली आहे. त्याचा फायदा शेतीपिकांच्या सिंचनासाठी होत आहे तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला आहे. पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते. पण ही परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. यावर्षी टँकर सुरू करण्याची वेळ कोणत्याही गावावर येणार नसल्याचे चित्र आहे. पण त्यासाठी दोन्ही कालव्यांना उन्हाळ्याच्या फेब्रुवारी ते मेअखेर चार महिन्यांत किमान दोनवेळा पाणी सोडणे आवश्यक आहे.

तालुक्याच्या पूर्वभागात उन्हाळी पिके पूर्वी घेतली जात नव्हती; परंतु आता पाणी शिवारात खळाळू लागल्याने बहुतांशी जमीन ओलिताखाली आहे. त्यामुळे ऊस, कांदा यासारख्या नगदी पिकांसह फळबागा, भाजीपाला पिकांचे उत्पादन होऊ लागले आहे. त्यामुळे दोन्ही कालवे शेतीसाठी वरदान ठरलेले आहेत.

(चौकट..)

आमदारांकडून सद्य:स्थितीचा आढावा....

धोम-बलकवडी व नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची उर्वरित कामे व पोट पाटांची कामे पूर्ण व्हावीत, तसेच उपसा सिंचन योजनेची कामे सुरू करावीत, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा सद्य:स्थितीचा आढावा घेतला. उर्वरित कामे सुरू करण्यासाठी करावयाच्या तरतुदी याची माहिती घेऊन मंत्रालय स्तरावर प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

..................................

१२खंडाळा

फोटो - नीरा-देवघरच्या पाण्यामुळे कालवे भरून वाहत आहेत.