शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धोम-बलकवडी, नीरा-देवघरमुळे कृषीक्रांती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

खंडाळा : खंडाळा तालुका हा कायम दुष्काळी म्हणून गणला जात होता. उन्हाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याची टंचाई ही ...

खंडाळा : खंडाळा तालुका हा कायम दुष्काळी म्हणून गणला जात होता. उन्हाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याची टंचाई ही ठरलेली असायची; मात्र धोम-बलकवडी आणि नीरा-देवघरच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्याने दुष्काळाचे सावट दूर होऊन तालुक्याची तहान भागलेली आहे. या प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला असून, शेतीपिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे कालवे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत.

खंडाळा तालुका हा तसा पिढ्यान्‌ पिढ्याचा दुष्काळी तालुका. शेती सिंचनाचा प्रश्न सोडाच; पण पिण्याच्या पाण्याचीही इथं उन्हाळ्यात वानवा व्हायची. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते; पण डोंगर पोखरून धोम-बलकवडी आणि नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे तालुक्यात पोहोचले. त्यामुळे पाण्यासाठी लोकांची होणारी फरफट थांबली आहे. धोम-बलकवडी प्रकल्पांतर्गत खंडाळा, बावडा, पारगाव, म्हावशी, अहिरे, खेड बुद्रुक, बोरी, पाडळी, निंबोडी, सुखेड यांसह १८ गावे लाभक्षेत्रात आली आहेत तर नीरा-देवघरच्या लाभक्षेत्रात शेखमिरेवाडी, मोर्वे, भादे, अंदोरी, शेडगेवाडी, कराडवाडी, वाघोशी, भोळी यांसह २४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

या दोन्ही कालव्यांना पाणी वाटप करारानुसार आवर्तने सोडली जातात, त्यामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होत आहे. पारंपरिक सिंचन स्त्रोतामध्ये पाणी क्षमता वाढली आहे. त्याचा फायदा शेतीपिकांच्या सिंचनासाठी होत आहे तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला आहे. पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते. पण ही परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. यावर्षी टँकर सुरू करण्याची वेळ कोणत्याही गावावर येणार नसल्याचे चित्र आहे. पण त्यासाठी दोन्ही कालव्यांना उन्हाळ्याच्या फेब्रुवारी ते मेअखेर चार महिन्यांत किमान दोनवेळा पाणी सोडणे आवश्यक आहे.

तालुक्याच्या पूर्वभागात उन्हाळी पिके पूर्वी घेतली जात नव्हती; परंतु आता पाणी शिवारात खळाळू लागल्याने बहुतांशी जमीन ओलिताखाली आहे. त्यामुळे ऊस, कांदा यासारख्या नगदी पिकांसह फळबागा, भाजीपाला पिकांचे उत्पादन होऊ लागले आहे. त्यामुळे दोन्ही कालवे शेतीसाठी वरदान ठरलेले आहेत.

(चौकट..)

आमदारांकडून सद्य:स्थितीचा आढावा....

धोम-बलकवडी व नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची उर्वरित कामे व पोट पाटांची कामे पूर्ण व्हावीत, तसेच उपसा सिंचन योजनेची कामे सुरू करावीत, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा सद्य:स्थितीचा आढावा घेतला. उर्वरित कामे सुरू करण्यासाठी करावयाच्या तरतुदी याची माहिती घेऊन मंत्रालय स्तरावर प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

..................................

१२खंडाळा

फोटो - नीरा-देवघरच्या पाण्यामुळे कालवे भरून वाहत आहेत.