शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जमीन वाटप सुरू झाल्यावरच आंदोलन थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ठरल्याप्रमाणे १ मे या महाराष्ट्र दिनी जमीन वाटपाचे आदेश होते. मात्र, ...

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ठरल्याप्रमाणे १ मे या महाराष्ट्र दिनी जमीन वाटपाचे आदेश होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता लढताना मरण आले तरी चालेल, पण जमीन वाटप सुरू होऊन ताब्यात मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन करावे लागले, तरी कोयना प्रकल्पग्रस्त माघार घेणार नाहीत, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात डॉ.भारत पाटणकर यांनी म्हटले आहे की, या आंदोलनात महाराष्ट्रातील सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व अहमदनगर जिल्ह्यामधील ३५० वसाहतीमधील सुमारे ५० हजार स्त्री-पुरुष सहभाग घेतील, तसेच कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, कोयना धरणग्रस्तांचे प्रमाणित व पात्र प्रकल्पग्रस्तांचे अद्ययावत संकलन रजिस्टर पूर्ण करण्यासाठी ९ ते १० वर्षांचा काळ प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला दिला होता. गेल्या तीन वर्षांत झालेल्या बैठकांमधून निर्णयांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले, पण जिल्हा प्रशासनाने या बैठकांच्या इतिवृत्तामध्ये घातलेल्या कालमर्यादा एकदाही पाळल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २५ मार्चला सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या सर्व कामासाठी स्वतंत्र कार्यालय प्रस्थापित करावे, कोणतीही त्रुटी शिल्लक न ठेवता पात्र प्रकल्पग्रस्तांचे अद्यावत सर्वांगीण प्रमाणित संकलन रजिस्टर तयार करावे. आठ किलोमीटरमध्ये जमीन वाटप होऊ शकेल, अशा गावठाणांचा पुनर्वसन आराखडाही तयार करावा. ही तयारी झाल्याबरोबर लोकांच्या सामुदायिक गाव कमिटीच्या माध्यमातून आलेल्या पसंतीनुसार जमीन वाटप सुरू करावे. यासाठी नवी तारीख जिल्हा प्रशासनाने सर्व विचार करून द्यावी. ही तारीख पुन्हा पाळली नाही, तर मात्र जमीन वाटप सुरू होईपर्यंत प्राणपणाने लढत राहण्याचा निर्णय कोयना प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे, तसेच सर्व वंचित खातेदारांना जमीन प्रत्यक्षात मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशाराही डॉ.पाटणकर यांनी दिला आहे.

चौकट :

... तर १७ मे पासून आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनच्या व्यवहाराची १६ मे पर्यंत प्रकल्पग्रस्त वाट पाहतील. तोपर्यंत पात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणित संकलन रजिस्टर पूर्ण होऊन जमीन वाटपाची निश्चिती झाली नाही तर १७ मे पासून बेमुदत आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन कोरोना स्थिती तीव्र असो वा नसो पण जमीन वाटप निर्धोकपणे सुरू होत नाही, तोपर्यंत मागे घेतले जाणार नाही, अशी तयारीही कोयना प्रकल्पग्रस्तांनी केली आहे, असेही प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

............................................................................