शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

जमीन वाटप सुरू झाल्यावरच आंदोलन थांबेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ठरल्याप्रमाणे १ मे या महाराष्ट्र दिनी जमीन वाटपाचे आदेश होते. मात्र, ...

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ठरल्याप्रमाणे १ मे या महाराष्ट्र दिनी जमीन वाटपाचे आदेश होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता लढताना मरण आले तरी चालेल, पण जमीन वाटप सुरू होऊन ताब्यात मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाचे आंदोलन करावे लागले, तरी कोयना प्रकल्पग्रस्त माघार घेणार नाहीत, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात डॉ.भारत पाटणकर यांनी म्हटले आहे की, या आंदोलनात महाराष्ट्रातील सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व अहमदनगर जिल्ह्यामधील ३५० वसाहतीमधील सुमारे ५० हजार स्त्री-पुरुष सहभाग घेतील, तसेच कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, कोयना धरणग्रस्तांचे प्रमाणित व पात्र प्रकल्पग्रस्तांचे अद्ययावत संकलन रजिस्टर पूर्ण करण्यासाठी ९ ते १० वर्षांचा काळ प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला दिला होता. गेल्या तीन वर्षांत झालेल्या बैठकांमधून निर्णयांच्या अंमलबजावणीचे आदेश दिले, पण जिल्हा प्रशासनाने या बैठकांच्या इतिवृत्तामध्ये घातलेल्या कालमर्यादा एकदाही पाळल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २५ मार्चला सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने कोयना प्रकल्पग्रस्तांच्या सर्व कामासाठी स्वतंत्र कार्यालय प्रस्थापित करावे, कोणतीही त्रुटी शिल्लक न ठेवता पात्र प्रकल्पग्रस्तांचे अद्यावत सर्वांगीण प्रमाणित संकलन रजिस्टर तयार करावे. आठ किलोमीटरमध्ये जमीन वाटप होऊ शकेल, अशा गावठाणांचा पुनर्वसन आराखडाही तयार करावा. ही तयारी झाल्याबरोबर लोकांच्या सामुदायिक गाव कमिटीच्या माध्यमातून आलेल्या पसंतीनुसार जमीन वाटप सुरू करावे. यासाठी नवी तारीख जिल्हा प्रशासनाने सर्व विचार करून द्यावी. ही तारीख पुन्हा पाळली नाही, तर मात्र जमीन वाटप सुरू होईपर्यंत प्राणपणाने लढत राहण्याचा निर्णय कोयना प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे, तसेच सर्व वंचित खातेदारांना जमीन प्रत्यक्षात मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशाराही डॉ.पाटणकर यांनी दिला आहे.

चौकट :

... तर १७ मे पासून आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनच्या व्यवहाराची १६ मे पर्यंत प्रकल्पग्रस्त वाट पाहतील. तोपर्यंत पात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणित संकलन रजिस्टर पूर्ण होऊन जमीन वाटपाची निश्चिती झाली नाही तर १७ मे पासून बेमुदत आंदोलन सुरू होईल. हे आंदोलन कोरोना स्थिती तीव्र असो वा नसो पण जमीन वाटप निर्धोकपणे सुरू होत नाही, तोपर्यंत मागे घेतले जाणार नाही, अशी तयारीही कोयना प्रकल्पग्रस्तांनी केली आहे, असेही प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

............................................................................