शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

शांतता बैठकीत पोलिसांवर आगपाखड

By admin | Updated: March 11, 2015 00:12 IST

नागरिकांचा रोष : समित्या केवळ कागदावरच उरल्याचा आरोप

कऱ्हाड : कऱ्हाड शहर पोलिसांचा सर्वसामान्यांशी संपर्कच नाही. त्यामुळे सामान्यांच्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत पोलिसांना कसलीच माहिती नसते. मोहल्ला समिती, पोलीस मित्र अशा अनेक समित्या पोलिसांनी स्थापन केल्या आहेत. मात्र, या समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचा आरोप नागरीकांनी शांतता समितीच्या बैठकीत केला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस उपअधिक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसिलदार सुधाकर भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, आप्पा गायकवाड, दादा शिंगण, सागर बर्गे, फारूख पटवेकर, मजहर कागदी, बादशाहभाई मुल्ला यांच्यासह अनेक नागरीक उपस्थित होते.  शांतता समितीची बैठक कायदा व सुव्यवस्थेबाबत होते. मात्र, एकही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. नगरसेवकांना कऱ्हाडातील शांततेशी काही देणंघेणं नाही, असा आरोपही उपस्थित नागरीकांनी यावेळी केला. आप्पा गायकवाड यांनी पोलिसांकडून शांतता समितीच्या सदस्यांना मिळणाऱ्या सन्मानावरच बोट ठेवले. पोलिसांकडून सन्मान मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मजहर कागदी यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. मनसेचे सागर बर्गे यावेळी बोलताना म्हणाले, शांतता समितीची बैठक महत्वाची असते. मात्र, या बैठकीला असलेली अत्यल्प उपस्थिती चिंताजनक आहे. पोलीस व पालिका प्रशासनाची जागरूकता त्यावरूनच दिसुन येते. पोलिसांचा सामान्यांशी कसलाही संपर्क नाही. सामान्य लोकांमध्ये किंमत असणाऱ्या नागरीकांना पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीस बोलविणे गरजेचे आहे. पूर्वी शांतता समितीची बैठक होत होती. त्यावेळी नागरीक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित रहायचे; पण सध्या पोलिसच सामान्यांना जवळ करीत नसल्याने बैठकांकडे पाठ फिरविली जात आहे. (प्रतिनिधी)दोषींवर कठोर कारवाई होईलउंब्रजमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कऱ्हाडात शांतता कायम राखली, ही बाब कौतुकास्पद आहे. उंब्रज प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही यावेळी तहसिलदार सुधाकर भोसले यांनी दिली.