शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

शांतता बैठकीत पोलिसांवर आगपाखड

By admin | Updated: March 11, 2015 00:12 IST

नागरिकांचा रोष : समित्या केवळ कागदावरच उरल्याचा आरोप

कऱ्हाड : कऱ्हाड शहर पोलिसांचा सर्वसामान्यांशी संपर्कच नाही. त्यामुळे सामान्यांच्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत पोलिसांना कसलीच माहिती नसते. मोहल्ला समिती, पोलीस मित्र अशा अनेक समित्या पोलिसांनी स्थापन केल्या आहेत. मात्र, या समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचा आरोप नागरीकांनी शांतता समितीच्या बैठकीत केला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस उपअधिक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसिलदार सुधाकर भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, आप्पा गायकवाड, दादा शिंगण, सागर बर्गे, फारूख पटवेकर, मजहर कागदी, बादशाहभाई मुल्ला यांच्यासह अनेक नागरीक उपस्थित होते.  शांतता समितीची बैठक कायदा व सुव्यवस्थेबाबत होते. मात्र, एकही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. नगरसेवकांना कऱ्हाडातील शांततेशी काही देणंघेणं नाही, असा आरोपही उपस्थित नागरीकांनी यावेळी केला. आप्पा गायकवाड यांनी पोलिसांकडून शांतता समितीच्या सदस्यांना मिळणाऱ्या सन्मानावरच बोट ठेवले. पोलिसांकडून सन्मान मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मजहर कागदी यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. मनसेचे सागर बर्गे यावेळी बोलताना म्हणाले, शांतता समितीची बैठक महत्वाची असते. मात्र, या बैठकीला असलेली अत्यल्प उपस्थिती चिंताजनक आहे. पोलीस व पालिका प्रशासनाची जागरूकता त्यावरूनच दिसुन येते. पोलिसांचा सामान्यांशी कसलाही संपर्क नाही. सामान्य लोकांमध्ये किंमत असणाऱ्या नागरीकांना पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीस बोलविणे गरजेचे आहे. पूर्वी शांतता समितीची बैठक होत होती. त्यावेळी नागरीक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित रहायचे; पण सध्या पोलिसच सामान्यांना जवळ करीत नसल्याने बैठकांकडे पाठ फिरविली जात आहे. (प्रतिनिधी)दोषींवर कठोर कारवाई होईलउंब्रजमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कऱ्हाडात शांतता कायम राखली, ही बाब कौतुकास्पद आहे. उंब्रज प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही यावेळी तहसिलदार सुधाकर भोसले यांनी दिली.