शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

संगणकाच्या युगात टपालपेटी लुप्त होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:40 IST

कुडाळ : सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. एकमेकांशी संवादासाठी आता मोबाईलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची ...

कुडाळ : सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. एकमेकांशी संवादासाठी आता मोबाईलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल, मेसेजने घेतली आहे. दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहेत. यामुळे लालरंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे. गतिमान युगात याची जागा आता संगणकाने घेतली आहे.

आजघडीला तार, पत्र बंद झाले आहे. पत्रामधला प्रेमभाव, आदर आपल्या लिखाणातून होणारी देवाणघेवाण मोबाईल आणि संगणकाच्या कळफलकावर आली आहे. यामुळे लिखाणाचा सराव काहीसा थांबलाच म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकी संख्या असायची. त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत. आज काळ बदलला आहे. प्रगती होत परस्पर संवादाची साधने बदलली, शिक्षण आणि तंत्रज्ञानाने क्रांती घडवत सर्वांचेच जीवन बदलले.

प्रत्येक गावात पत्रापेटीसाठी लाल डबा लटकवलेला असायचा, आता मात्र तो कुठेही दिसेनासा झाला आहे. खाकी पोशाखातील पोस्टमन यातील सारी पत्रं गोळा करून पुढे पाठवत असे. आजही ज्याठिकाणी अजूनही तंत्रज्ञान पोहोचले नाही, तेथे याचाच वापर होत आहे. त्यावेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्राची उत्सुकता लागून असायची. आज मात्र तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्रप्रपंच काहीसा दुरावलेलाच आहे. सध्या ५० पैशाचे साधे पत्र, २ रुपये ५० पैशात मिळणारे आंतर्देशीय पत्र मात्र बदलत्या काळाबरोबर आपल्यातील संवादातूनही निघून गेल्यासारखेच आहे.

चौकट...

आधुनिक प्रगतीची किमया...

पूर्वीच्या काळात तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नव्हती. दूरवरच्या संवादासाठी पत्र हेच एकमेव साधन होते. आपत्कालिन प्रसंगी तार, टेलिग्रामचा उपयोग व्हायचा. आजच्या संगणकीय युगात यात आमुलाग्र बदल झालेला आहे. बसल्या जागी मोबाईलसारख्या छोट्याशा साधनाच्या मदतीने जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत थेट संवाद साधला जात आहे. ही सारी आधुनिक प्रगतीची किमया आहे.