शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

आगाशिवनगर व्यापारी संघटना लॉकडाऊनच्या विरोधात आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

मलकापूर : सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा विचार न करता केलेले लॉकडाऊन पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी आगाशिवनगर व्यापारी संघटनेच्या वतीने ...

मलकापूर : सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा विचार न करता केलेले लॉकडाऊन पूर्णपणे रद्द करावे, अशी मागणी आगाशिवनगर व्यापारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे करण्यात आली. तसेच यापुढे कोणतेही लॉकडाऊन पाळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. त्या वेळी हजारो लोक रस्त्यावर होते. त्या वेळी लॉकडाऊन का केला नाही. येथील लोकांची एवढीच काळजी होती तर निवडणुकांना परवानगी दिलीच कशी? निवडणुका घेतल्या त्या वेळी सभा व मेळावे यांना प्रतिबंध करायला हवा होता, तो केला नाही. त्या वेळी दुर्लक्ष केले, संचारबंदी असताना सभा झाल्या. त्या वेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही. म्हणजे याचा अर्थ मंत्री, मान्यवर, सरकारी अधिकारी यांना लॉकडाऊन संचारबंदी लागू नाही. सामान्य जनतेची पिळवणूक करून एक प्रकारे लॉकडाऊन पद्धतीने क्रूर हत्या होतेय. निवडणुकीवेळी हजारो लोक रस्त्यावर आले त्या वेळी कोणतीही काळजी वाटली नाही. निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला लोकांची काळजी वाटायला लागली हे मोठे आश्चर्य आहे.

गोरगरीब, व्यापारी-दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि सामान्य जनतेने जगायचे कसे, याचे उत्तर आम्हाला द्या. आम्ही आता कोणतेही नियम पाळणार नाही. आमच्यावर कारवाई केल्यास आम्हाला दुकानाचे भाडे, लाइट बिल, कामगारांचा पगार आम्हाला द्यावा. आम्ही दुकान बंद करून घरी बसतो. कोरोनाने नव्हे, उपासमारीने जनता तडफडून मारण्याचा डाव दिसत आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, वाढते कर्ज, वाढते भाडे, वाढते शिक्षण शुल्क, पाणी व लाइट बिल, वाढते व्याज आणि रोजचा उदरनिर्वाह आळा कसा घालायचा? हे सर्व राजकारण जनतेच्या लक्षात आले आहे. आता शांत बसणार नाही. जितके पोलीस प्रशासन, पालिका कर्मचारी रस्त्यावर दिसत आहे त्याच्या दहापटीने जनता आक्रमक होऊन रस्त्यावर दिसेल. जनतेने पाऊल उचलण्याआधी राजकारण थांबवा आणि लॉकडाऊन संपवा अन्यथा आंदोलन तर होणारच, असा आक्रमक पवित्रा घेतला.

050721\img-20210705-wa0032.jpg

फोटो कॕप्शन

आगाशिवनगर व्यापारी संघटनेच्या वतीने लॉकडाऊन बंद करावे अशी मागणी येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आली. ( छाया- माणिक डोंगरे)