शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:39 IST

सातारा : उत्तम मुहूर्त म्हणून ज्याची प्रतीक्षा केली जाते, असा अक्षय तृतीयेचा मुहूर्त यंदाही वाया गेला आहे. लॉकडाऊन सुरू ...

सातारा : उत्तम मुहूर्त म्हणून ज्याची प्रतीक्षा केली जाते, असा अक्षय तृतीयेचा मुहूर्त यंदाही वाया गेला आहे. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे लग्न ठरवून ठेवलेल्या अनेक जोडप्यांना आता पुढच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नोकरीनिमित्त परदेशी असलेल्या आणि केवळ लग्नासाठी भारतात आलेल्यांनीच या लॉकडाऊनमध्ये लग्नगाठ बांधली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने सध्या सर्वत्रच कडक निर्बंध लावले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव, सण यासह लग्न समारंभही साध्या पध्दतीने करण्याचे निर्देश दिल्याने अनेक वाग्दत वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबियांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर थाटात लग्न करण्याचे नियोजन केलेल्यांना आता पुन्हा नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

परदेशात नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने असणाऱ्या काहींनी मात्र नियोजित वेळेत शासनाचे नियम पाळून लग्नगाठ बांधली. अवघ्या महिना-दीड महिन्याच्या सुट्टीसाठी आलेल्यांना नोकरीकडे गेल्यावर रजा मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे या सगळ्यांनी ठरलेल्या वेळेत लग्न करून पुन्हा जाण्याचीही तयारी केली आहे. काहींनी शासनाच्या नियमाला हारताळ फासत कास बामणोली येथील रेसॉर्ट आणि हॉटेल्समध्ये डेस्टिनेशन वेडिंगही थाटात उरकले.

चौकट :

मे महिन्यातील मुहूर्त

१, २, ३, ४, ५, ८, १३, १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१

मंगल कार्यालयांचे गणित बिघडले

मंगल कार्यालये बंद असली तरीही तेथे कायमस्वरूपी काम करणाऱ्या कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते, वीज या सगळ्या गोष्टींचा खर्च मंगल कार्यालय चालकांना करावा लागत आहे. गतवर्षीपासून नोव्हेंबर-डिसेंबर महिना बरा होता. मे महिन्यात आठ बुकिंग होती. त्यापैकी एकच लग्न झालं. १५हून अधिक व्यवसाय मंगल कार्यालयावर अवलंबून असतात, ते सगळे आता कोलमडले आहेत, अशी माहिती मंगल कार्यालय व्यावसायिक मंगेश जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

नियमांचा अडसर

लग्नसोहळा पार पाडायचा असेल तर एकूण २५ लोकांना प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. यात कुटुंबीय, ब्राह्मण, वाजंत्री, यासह वाढप्यांचाही समावेश आहे. इतक्या कमी लोकांसाठी अख्खं कार्यालय बुक करणं परवडत नाही. या लॉकडाऊनच्या काळात केवळ तीन विवाह पार पडले. नोकरीनिमित्त परदेशी असलेल्या मुला-मुलींनी सुट्टी आहे, तेवढ्या दिवसात लग्न उरकून घेतलं. बाकी सगळ्यांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत.

कोट :

आमच्या मुलीचं लग्न आम्ही ठरवून ठेवलं. रमजान ईदनिमित्ताने पाहुणे येतील, तेव्हाच लग्न करायचं होतं. पण कोरोनाची स्थिती वाढू लागल्याने आम्ही हे लग्न नोव्हेंबरनंतर घ्यायचं ठरवलं आहे. लेकीबरोबर जास्तीचा वेळ घालवता येईल, असा सकारात्मक विचार आम्ही केला.

- इसाक बागवान, वधू पिता

धाकट्या लेकीचं लग्न मार्चमध्ये झाल्यानंतर मे महिन्यात मुलाचं लग्न धुमधडाक्यात करायचं, असं ठरवलं. पण सगळीकडेच कोविड रूग्ण आढळू लागल्याने लग्न अवघ्या २५ जणांत केलं. आमच्या घरातील शेवटचं लग्न असल्याने आम्हाला याचं मोठं साजरीकरण करता आलं नाही.

- पांडुरंग जाधव, वर पिता