शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

हळद गेली वाहून, वीज झाली गायब

By admin | Updated: April 13, 2015 00:06 IST

कऱ्हाड तालुक्याला अवकाळीचा दणका : ऊसतोडणी ठप्प; फळभाज्या, कलिंगडाचे लाखोंचे नुकसान

मसूर : पाडळी (हेळगाव), ता. कऱ्हाड येथे झालेल्या अवकाळी पावसाने शिजवून वाळत घातलेली हळदच पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेली असल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे, तसेच विजेचे खांब कोलमडले आहेत. त्यामुळे काही परिसरातील वीजच गायब झाली आहे. गारांसह पडलेल्या पावसाने ऊसतोडणी ठप्प झाली आहे. फळभाज्यांचेही नुकसान झाले आहे, तर कलिंगडाचे उशिरा लावलेल्या पिकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.याबाबत माहिती अशी की, पाडळी परिसरात दोन-तीन दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाने शनिवारी रौद्ररूप धारण करत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही कळायच्या आतच बाळासाहेब जाधव यांची शिजवून वाळत घातलेली हळद वाहून गेली. शेतात पाणी साचले व त्याचा लोंढा हळद वाळत घातलेल्या ठिकाणी आला. त्या पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाळत घातलेली ही हळद वाहून गेली. त्यामुळे त्यांचे हजारोंची हळदच पाण्यात गेली आहे. वारे एवढे प्रचंड होते की त्यामुळे विजेचे खांब कोलमडून पडले आहेत. परिणामी काही ठिकाणी रात्रीपासून वीज गायब झाली आहे. तर श्रावण आनंदा पिंंपळे (पाडळी) यांच्या घराचा पूर्ण पत्रा उडून गेला आहे. घराची भिंंत पडून हजारांचे नुुकसान झाले आहे. तसेच शेवग्याची सुमारे ५० झाडे मोडून पडली. दीड एकर मका भुईसपाट होऊन सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.सुनील माळी यांचे गुरांचे शेड उडून पूर्णपणे बाजूला पडले आहे. त्यांचे २५ हजारांचे नुकसान झाले. तर कांता आण्णा जाधव यांची अर्ध्या एकरातील मका जमीनदोस्त होऊन २५ हजारांचे नुकसान झाले आहे. कालगाव परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने उसाचे पीक भुईसपाट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान झाले आहे. वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडल्याने शेतीची कामे ठप्प झाली. तसेच भाजीपाल्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. हेळगाव परिसरात शाळू व गहू काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. परिसरात कडब्याची पसर तशीच आहे. तर उसाची तोडणी सुरू असून, त्यामध्येही पावसाने व्यत्यय आणल्याने ऊसतोडणी मजुरासह शेतकरी वर्ग चिंतेमध्ये आहे. यावर्षी उसाचे पीक शेतातच राहते की काय, या काळजीने शेतकरी वर्गाने सुरुवातीला मिळेल त्या कारखान्याची तोड घेऊन ऊसतोडणी करण्याचा प्रयत्न केला; परंतु यातूनही जो ऊस शेतात उभा आहे. त्याची तोडणी केव्हा होणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष आहे. अशातच चालू तोडणीत पावसाने व्यत्यय आणल्याने आता तर शेतकरी गांगरून गेला आहे. तर टोमॅटो, वांगी या पालेभाज्यांचे गारांच्या पावसाने नुकसान झाले आहे. उशिरा लागवड केलेले कलिंगडाचे पीक नुकतेच बहरात आले होते. तोच आता गारांचा मार बसल्याने हे पीक खराब होणार असल्याने लागवडीचा खर्च तरी निघतोय का नाही, अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, मसूर व परिसरात यापूर्वीही अवकाळी पाऊस झाला होता. आतापर्यंत चार ते पाचवेळा पावसाने दणका दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. (वार्ताहर) फलटण पूर्व भागात नुकसानपंचनाम्याचे आदेश : विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून पाहणीवाठार निंबाळकर : फलटण तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण यांनी केली. त्यावेळी त्यांनी तहसीलदार विवेक जाधव व प्रशासकीय यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली.फलटण तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. हणमंतवाडी, तामखडा, शिंदेनगर, आसू, पवारवाडी या गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस, मका, कडवळ, टोमॅटो यासह फळबागा आणि भाजीपाल्यांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण यांनी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दोघांनीही संबंधितांनी दिले आहेत.यावेळी जितेंद्र पवार, शिवाजी पवार, मोहन पवार, अशोक शिंदे, नितीन शिंदे, वसंत शिंदे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध गावातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर) धान्य वाळविणाऱ्यांची तारांबळ...खटाव : खटाव व परिसराला दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. या पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसणार आहे. तसेच या पावसामुळे धान्य वाळविणाऱ्यांची तारांबळ उडाली होती. खटाव तालुक्यात आतापर्यंत चार ते पाचवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान केले आहे. दोन दिवसांपूर्वीही खटावसह परिसरात मुसळधार पावसास सुरुवात झाली. बघता-बघता रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले होते. काही लोकांनी धान्य वाळविण्यास घातले होते. या पावसामुळे धान्य भरण्यासाठी त्यांची गडबड उडाली होती. या अवकाळी पावसाचा फटका खटाव व परिसरातील कांदा आणि टोमॅटो पिकांना बसणार आहे.