शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अथक प्रयत्नानंतर नीरामाई खळाळली

By admin | Updated: May 10, 2017 22:52 IST

अथक प्रयत्नानंतर नीरामाई खळाळली

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : खंडाळा तालुक्याच्या कृषी, औद्योगिक क्षेत्राबरोबरच सामाजिक जीवनात परिवर्तन घडण्यासाठी नीरा-देवघर आणि धोम-बालकवडी प्रकल्पाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच नीरा -देवघरच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी देव पाण्यात घालून प्रतीक्षा केली. खंडाळ्याच्या पूर्व भागातील पाणीटंचाई कायमची मिटण्यासाठी हे पाणी वाघोशीपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. अथक प्रयत्नानंतर नीरामाई वाघोशीत खळाळली अन् ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता गावोगावी पाणीपूजन करून आनंद साजरा केला जात आहे. नीरा-देवघरचे पाणी मिळण्याची प्रतीक्षा आता संपली असून ६७ किलोमीटरपर्यंतची कालव्याची कामे पूर्ण करून तब्बल १७ वर्षांनंतर पाणी वाघोशीच्या शिवारात पोहोचले. त्यामुळे १७ वर्षांच्या वनवासानंतर वाघोशीकरांची तहान भागली अन् ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला. खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची व शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन मोर्वे येथील पुलावर तात्पुरत्या सिमेंट पाईप टाकून त्याद्वारे वाघोशी गावापर्यंत नीरा-देवघर कालव्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. नीरा-देवघर धरणाचे पाणी रविवारी वाघोशी गावामध्ये पोहोचले आहे. हे पाणी पाहण्यासाठी नागरिक वाघोशी येथे मोठी गर्दी करत आहेत. नीरा-देवघर धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना धरण बांधल्यापासून पाण्याची प्रतीक्षा होती. मात्र नीरा-देवघरचे पाणी पूर्व भागासाठी मृगजळ ठरत होते. नीरा-देवघर धरणाच्या कालव्याचे खंडाळा तालुक्यातील हायवेपर्यंत काम पूर्ण झाले होते. मात्र, हायवे क्रॉसिंग व मोर्वे येथील जमीन संपादनाचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने नीरा-देवघरचे पाणी खंडाळा तालुक्यात येत नव्हते. राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांच्याकडे तालुक्यातील जनता ‘काहीही करा; पण नीरा-देवघरचे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्या,’ अशी वारंवार मागणी करत होती. त्यामुळे काहीही करून नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत खंडाळा तालुक्यात आणण्याचा सकंल्प केला होता. आमदार मकरंद पाटील यांनी लक्ष घातल्यामुळेच नीरा-देवघरचा कालवा हायवे क्रॉस करू शकला. तसेच मोर्वे येथे धरणाच्या कालव्यासाठी जमीन संपादन करण्याचा प्रश्न देखील अनेक दिवसांपासून रखडला होता. हा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. हे दोन प्रश्न मार्गी लागल्यावरच नीरा-देवघरच्या कालव्याच्या खंडाळा तालुक्यातील कामाला गती मिळाली आहे. पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा शेतकऱ्यांच्या पवित्र्यानंतर पालकमंत्र्यांनीही अधिकाऱ्यांना सूचना करून ठेकेदारांना कामे उरकण्याची तंबी दिली. त्यामुळे नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत येण्याचा मार्ग मोकळा झाला. खंडाळा तालुक्यातील नीरा-देवघर धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी, शेतीसाठी मोठी पाणीटंचाई जाणवत होती. नीरा-देवघर धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण करून वाघोशीला मार्चअखेर पाणी प्रवाहित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले होते.मात्र, मोर्वे गावच्या हद्दीतील कालव्याच्या कामांच्या दिरंगाईमुळे पाणी उपलब्ध असतानाही वाघोशी व आसपासच्या गावच्या नागरिकांना व प्रकल्पग्रस्तांना केवळ पाण्याची प्रतीक्षा करण्यापलीकडे काहीही करता येत नव्हते. खंडाळा तालुक्यामध्ये सध्या वाघोशी परिसरात मोठी पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे नीरा-देवघर कालव्याचे वाघोशीपर्यंत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. चार-पाच दिवस वाघोशी, कराडवाडी, अंदोरी परिसरातील नागरिक या पाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. तसेच पाण्याला प्रवाहित होण्यासाठी येणारे अडथळे श्रमदान करून दूर करत होते. यामध्ये वाघोशी ग्रामस्थांनी सर्वाधिक श्रमदान व कष्ट केले. तसेच रात्रीचा दिवस करून नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत आणले आहे.