शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

मिसळनंतर ‘हॅपी फ्रेंडशिप डे’ म्हणत ‘चाय पे चर्चा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:02 IST

सातारा : लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवेंद्रसिंहराजे आणि नरेंद्र पाटील यांनी हॉटेलात मिसळ खाल्ली होती. त्याचा ठसका अनेकांना बसला. त्यानंतर रविवारी ...

सातारा : लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवेंद्रसिंहराजे आणि नरेंद्र पाटील यांनी हॉटेलात मिसळ खाल्ली होती. त्याचा ठसका अनेकांना बसला. त्यानंतर रविवारी पुन्हा दोघांनीही त्याच हॉटेलात येऊन ‘चाय पे चर्चा’ केली. यावेळी पाटील यांनी सातारा-जावळीचा खरा राजा शिवेंद्रराजेच असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगत एकप्रकारे आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली.सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मैत्री सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तर ही मैत्री अधिक दृढ होत गेली. या निवडणुकीच्या काळात दोघांनी साताऱ्यातील एका हॉटेलात एकत्र येत झणझणीत मिसळ खाल्ली होती. त्यामुळे या मिसळीचा अनेकांना ठसका बसलेला. त्यामुळे निवडणुकीत काय-काय होणार, याचा अंदाज बांधला जात होता. तर आता हे दोघेही पुन्हा साताºयातील त्याच हॉटेलात एकत्र आलेले दिसले.रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आमदार शिवेंद्रसिंहराजे, नरेंद्र पाटील हॉटेलात एकत्र दिसून आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय काटवटे, सातारा शहर उपाध्यक्ष आप्पा कोरे हेही होते. शिवेंद्रसिंहराजे आणि पाटील यांनी पाऊस पडत असताना व थंडगार वातावरणात गरमागरम चहा घेतला. यावेळी दोघांत बराचवेळ चर्चा झाली. राजकीय आणि सातारा विधानसभा मतदारसंघाबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. जवळपास पाऊण तास दोघांनी ही चर्चा घडवली. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात काही तरी घडतंय-बिघडतंय असाच संदेश यातून गेला.रविवारच्या या ‘फें्रडशिप डे’च्या शुभेच्छाची दिवसभर राजकीय वातावरणात चर्चा सुरू होती. तर ‘चाय पे चर्चा’ झाल्यानंतर दोघांनीही पत्रकारांशी संवाद साधला. चर्चेत काय झाले, याचा तपशीलही कथन केला.विकासाच्या मार्गावर जाताना वाईट वाटून घेऊ नकाआम्ही ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने एकत्र आलो. यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट झालीय. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे चाललोय. आम्ही विकासासाठीच वेगळा मार्ग धरलाय. त्याचं कोणी वाईट वाटून घेऊ नये. जिल्ह्यासाठी आम्ही दोघंही मित्र म्हणून चांगलं काम करू. मी दहा वर्षे सातारा-जावळीचा आमदार आहे. येथील मतदार माझ्यावर विश्वास दाखवतील, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कोणत्याही मतदारसंघातून लढण्यासाठी तयारफे्रंडशिप डे’च्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. चाय पे चर्चा झाली असून, विकासाच्याही दिशेने जाण्यासाठीही बोललो. सातारा-जावळीतील खरा राजा हे शिवेंद्रसिंहराजे हेच आहेत. किती फॉर्म आले, त्याला अर्थ नाही. आता जिल्हाच केसरीमय होणार आहे. पक्षाने विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत काही सांगितलं नाही; पण वरून आदेश आला तर कोणत्याही मतदारसंघातून लढण्यास तयार आहे, असे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.