शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मिसळनंतर ‘हॅपी फ्रेंडशिप डे’ म्हणत ‘चाय पे चर्चा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 00:02 IST

सातारा : लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवेंद्रसिंहराजे आणि नरेंद्र पाटील यांनी हॉटेलात मिसळ खाल्ली होती. त्याचा ठसका अनेकांना बसला. त्यानंतर रविवारी ...

सातारा : लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवेंद्रसिंहराजे आणि नरेंद्र पाटील यांनी हॉटेलात मिसळ खाल्ली होती. त्याचा ठसका अनेकांना बसला. त्यानंतर रविवारी पुन्हा दोघांनीही त्याच हॉटेलात येऊन ‘चाय पे चर्चा’ केली. यावेळी पाटील यांनी सातारा-जावळीचा खरा राजा शिवेंद्रराजेच असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगत एकप्रकारे आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली.सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मैत्री सर्वश्रूत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तर ही मैत्री अधिक दृढ होत गेली. या निवडणुकीच्या काळात दोघांनी साताऱ्यातील एका हॉटेलात एकत्र येत झणझणीत मिसळ खाल्ली होती. त्यामुळे या मिसळीचा अनेकांना ठसका बसलेला. त्यामुळे निवडणुकीत काय-काय होणार, याचा अंदाज बांधला जात होता. तर आता हे दोघेही पुन्हा साताºयातील त्याच हॉटेलात एकत्र आलेले दिसले.रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आमदार शिवेंद्रसिंहराजे, नरेंद्र पाटील हॉटेलात एकत्र दिसून आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय काटवटे, सातारा शहर उपाध्यक्ष आप्पा कोरे हेही होते. शिवेंद्रसिंहराजे आणि पाटील यांनी पाऊस पडत असताना व थंडगार वातावरणात गरमागरम चहा घेतला. यावेळी दोघांत बराचवेळ चर्चा झाली. राजकीय आणि सातारा विधानसभा मतदारसंघाबाबतही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. जवळपास पाऊण तास दोघांनी ही चर्चा घडवली. त्यामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात काही तरी घडतंय-बिघडतंय असाच संदेश यातून गेला.रविवारच्या या ‘फें्रडशिप डे’च्या शुभेच्छाची दिवसभर राजकीय वातावरणात चर्चा सुरू होती. तर ‘चाय पे चर्चा’ झाल्यानंतर दोघांनीही पत्रकारांशी संवाद साधला. चर्चेत काय झाले, याचा तपशीलही कथन केला.विकासाच्या मार्गावर जाताना वाईट वाटून घेऊ नकाआम्ही ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने एकत्र आलो. यामुळे आमची मैत्री आणखी घट्ट झालीय. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे चाललोय. आम्ही विकासासाठीच वेगळा मार्ग धरलाय. त्याचं कोणी वाईट वाटून घेऊ नये. जिल्ह्यासाठी आम्ही दोघंही मित्र म्हणून चांगलं काम करू. मी दहा वर्षे सातारा-जावळीचा आमदार आहे. येथील मतदार माझ्यावर विश्वास दाखवतील, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कोणत्याही मतदारसंघातून लढण्यासाठी तयारफे्रंडशिप डे’च्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. चाय पे चर्चा झाली असून, विकासाच्याही दिशेने जाण्यासाठीही बोललो. सातारा-जावळीतील खरा राजा हे शिवेंद्रसिंहराजे हेच आहेत. किती फॉर्म आले, त्याला अर्थ नाही. आता जिल्हाच केसरीमय होणार आहे. पक्षाने विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत काही सांगितलं नाही; पण वरून आदेश आला तर कोणत्याही मतदारसंघातून लढण्यास तयार आहे, असे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.