शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

पेरण्या झाल्यावर म्हणे... ‘बियाणं घ्या !’

By admin | Updated: June 23, 2016 01:22 IST

कऱ्हाड तालुका : कृषी विभागाचं वरातीमागून घोडं; सदस्य अधिकाऱ्यांकडून पाऊस, पाण्यावर चर्चा; वीजवितरणसह प्राधिकरणही धारेवर

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी साठ टक्के पेरण्या पूर्ण केलेल्या आहेत. मात्र, आता शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरण्या करण्यासाठी उत्तम दर्जाची बियाणे आणली आहेत. त्यामुळे त्या बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून केले गेल्याने वरातीमागून घोडे असा प्रकार बुधवारी पंचायत समितीच्या सभेत पाहायला मिळाला. ‘पावसानेच दडी मारल्याने शेतकऱ्यावर आता दुबार पेरण्या करण्याची वेळ येणार असल्याचे सांगत शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता नवीन बियाने व पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन तालुका कृषी अधिकारी खरात यांनी सभेदरम्यान केले. यावेळी तालुक्यातील धोकादायक पोल, पावसाळापूर्व केला जाणारा सर्व्हे तसेच तांबवे येथे ढासलेल्या पाण्याच्या टाकी प्रकरणावरून वीजवितरण व जीवन प्राधिकरण विभागाला सदस्यांनी धारेवर धरले. कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. सभेस अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील उपस्थित होते. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सभेच्या सुरुवातीस वीजवितरण कंपनीच्या विभागाचा आढावा अधिकारी वायदंडे यांनी सादर केला. यावेळी सदस्या अनिता निकम, रूपाली यादव, राजश्री थोरात, सदस्य लक्ष्मण जाधव, राजेंद्र बामणे, भाऊसाहेब चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ‘पावसाळा आला तरी अद्याप वीजवितरणकडून तालुक्यातील वाकलेले विद्युत खांब, धोकादायक स्थितीत असलेले ट्रान्सफॉर्मर तसेच लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. विभागाकडे कर्मचारी असूनही खासगी लोकांकडून कामे करून का घेतली जात आहेत. याचा खुलासा अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. आढावा देण्यापेक्षा अगोदर कामे करा तसेच संपूर्ण तालुक्याचा सर्व्हे विभागाकडून केला जावा, अशी मागणी सदस्य लक्ष्मण जाधव यांनी केली. तर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊ नये. त्यांनी कामे करावी,’ अशा सूचना सदस्या रूपाली यादव यांनी केल्या.तांबवे येथील पाणी पुरवठ्याची टाकी कोसळ्याने या घटनेस जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी व जीवन प्राधिकरणमार्फत नवीन टाकी बांधून देण्यात यावी, असा ठराव करण्यात आला. तांबवे प्रमाणे इतर गावांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून जीवन प्राधिकरण विभाग व पाणीपुरवठा विभागांमार्फत तालुक्यातील धोकादायक स्थितीत असलेल्या पाण्याच्या टाकीचा सर्व्हे करावा, अशा सूचना सभापती देवराज पाटील यांनी दिल्या. तसेच कृषी विभागाच्या आढावावेळी तालुक्यात १८ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी खरात यांनी दिली. दरम्यान जिल्ह्याला यावर्षी सोयाबीन बियाण्याचा कार्यक्रम आला नसल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात जिल्ह्याचा समावेश करावा, असा ठराव सभापती देवराज पाटील यांनी मांडला.यावेळी पशुसंवर्धन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती कृषी विभाग, वनविभाग, एसटी महामंडळ आदी विभागांचा आढावा मांडण्यात आला. (प्रतिनिधी)अधिकारी, सदस्य म्हणे आता निसर्गावरच विश्वासप्रत्येकवेळी हवामान खात्याकडून पाऊस पडण्याचे संकेत दर्शविले जातात. सध्या वातावरण तर ढगाळ दिसते मात्र, पाऊस पडत नाही. त्यामुळे आता हवामान खात्यापेक्षा निसर्गावरच विश्वास ठेवून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल, असे मत सभेदरम्यान सदस्य व अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी रोपांची मागणी वाढली शासनाच्या सूचनेनुसार १ जुलै रोजी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडे ७६ हजार रोपे तर परिक्षेत्र वनविभागाकडे ४७ हजार ५०० रोपे तयार असल्याने त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची माहिती संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.पाण्याच्या टाकीचा व जिल्ह्याचा योजनेत सहभागाचा ठराव तांबवे येथे कोसळलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या टाकीच्या दुर्घटनेची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्यांना सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच जाईल, असे सांगत गावकऱ्यांना जीवन प्राधिकरणाकडून नवीन टाकी बांधून देण्यात यावी व सोयाबीन बियाणे वाटप कार्यक्रमात जिल्ह्याचा समावेश करावा, असे दोन महत्त्वपूर्ण ठराव पंचायत समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले.