शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

पाऊस येताच पूल पाण्याखाली!

By admin | Updated: July 15, 2015 21:13 IST

कास भागातील लोकांचे दुखणे : संरक्षक कठड्यांअभावी पाण्याखाली जात असल्याने वाहतुकीस धोका

पेट्री : सातारा-बामणोली रस्त्यावर असलेल्या कास पुलाची उंची कमी असून, पुलाच्या दोन्ही बाजूंस संरक्षक कठडे नसल्याने हा पूल पावसाळ्यात वाहतुकीस धोकादायक बनू लागला आहे.सातारा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर कास, ता. जावळी गाव आहे. कास तलावाच्या दक्षिणेस धोकादायक वळणावर हा पूल असून, या पुलाच्या दक्षिणोत्तर बाजूस फक्त रक्षक दगड असून, दोन्ही बाजूंस संरक्षक कठड्यांचा अभाव आहे. या पुलाची उंची चार ते पाच फूट असल्याने कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या पावसात दरवर्षी या पुलावरून तीन-चार फुटांवरून पाणी वेगाने वाहते.३५ ते ४० फूट लांबीपर्यंत हा पूल पाण्याखाली जातो. यामुळे अरुंद रस्त्याचादेखील अंदाज येत नाही. तसेच पुलाच्या उत्तरेला गवत, लहान झाडेझुडपे वाढली असल्याने या ठिकाणची धोकादायक परिस्थिती पाहता पुलावरून पाणी वाहत असताना हा पूल दळणवळणात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. यंदाच्यावर्षी जून महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कास पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अशी परिस्थिती कित्येक वर्षे पावसाळ्यात बहुतांशवेळी होताना दिसते. साताऱ्याच्या पश्चिमेला कास-बामणोली भागात अतिवृष्टीचे प्रमाण अधिक आहे. सातारा-बामणोली मार्गावरील कास तलावाच्या दक्षिणेस रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने मुसळधार पावसात कास तलाव पूर्णपणे भरून वाहू लागला की हा पूल पाण्याखाली दिसेनासा होतो. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असते. वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचणाऱ्या नोकरदारवर्गाची तारांबळ उडते.परिसरातील धबधबे निसर्गदृश्य पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी फिरावे लागत असल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होताना दिसते. या पुलावरून पाणी वाहू लागले की, पलीकडील वाहने पलीकडे तर पुलाच्या अलीकडील वाहने अलीकडे अडकून पडतात. अनेकवेळा पश्चिम भागातील गावांचा संपर्क तुटतो. साताऱ्याहून बामणोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व सध्या निसर्गरम्य पर्वणीचा आस्वाद घेण्याचा हंगाम असल्याने पर्यटकांसह वाहनचालकांच्या सोयीसाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात येणारे दुर्दैवी प्रसंग टाळले जाऊ शकतात. तसेच संरक्षक दगडावरून पाणी वाहताना पूल ओलांडू नये, हा दर्शनी फलकच बहुतांशी पाण्यात असतो. कास रस्त्यावर दुरवस्थेत असलेला हा फलक वाहनचालकांच्या सहज निदर्शनास येणे आवश्यक आहे. यामुळे कास पुलाची उंची वाढविण्याची मागणी विद्यार्थी, पर्यटक, नोकरदारवर्ग व सर्व वाहनचालकांकडून होत आहे, प्रशासनाने लोकांच्या गैरसोयीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)पुलांची उंची वाढविण्याची मागणीपावसाळ्यात बहुतांश वेळा हा पूल पाण्याखाली जाऊन या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड असतो. तसेच पुलावरून मोठी वर्दळ असल्याने व दोन्ही बाजंूच्या धोकादायक वळणामुळे विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संरक्षक कठड्यांसहित पुलाची उंची वाढविण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.कास पुलावरून पाणी वाहताना बऱ्याचदा हुल्लडबाजी व स्टंटबाजी करणारी तरुणाई बेभरवशावर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून आपली वाहने पलीकडे घालण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मोठा अपघाताची संभावना अधिक आहे. तसेच तातडीने वैद्यकीय सेवा भासल्यास वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी उपाययोजना तत्काळ होणे आवश्यक आहे. - बाबूराव भोसले, पर्यटक