शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पाऊस येताच पूल पाण्याखाली!

By admin | Updated: July 15, 2015 21:13 IST

कास भागातील लोकांचे दुखणे : संरक्षक कठड्यांअभावी पाण्याखाली जात असल्याने वाहतुकीस धोका

पेट्री : सातारा-बामणोली रस्त्यावर असलेल्या कास पुलाची उंची कमी असून, पुलाच्या दोन्ही बाजूंस संरक्षक कठडे नसल्याने हा पूल पावसाळ्यात वाहतुकीस धोकादायक बनू लागला आहे.सातारा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर कास, ता. जावळी गाव आहे. कास तलावाच्या दक्षिणेस धोकादायक वळणावर हा पूल असून, या पुलाच्या दक्षिणोत्तर बाजूस फक्त रक्षक दगड असून, दोन्ही बाजूंस संरक्षक कठड्यांचा अभाव आहे. या पुलाची उंची चार ते पाच फूट असल्याने कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या पावसात दरवर्षी या पुलावरून तीन-चार फुटांवरून पाणी वेगाने वाहते.३५ ते ४० फूट लांबीपर्यंत हा पूल पाण्याखाली जातो. यामुळे अरुंद रस्त्याचादेखील अंदाज येत नाही. तसेच पुलाच्या उत्तरेला गवत, लहान झाडेझुडपे वाढली असल्याने या ठिकाणची धोकादायक परिस्थिती पाहता पुलावरून पाणी वाहत असताना हा पूल दळणवळणात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. यंदाच्यावर्षी जून महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कास पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अशी परिस्थिती कित्येक वर्षे पावसाळ्यात बहुतांशवेळी होताना दिसते. साताऱ्याच्या पश्चिमेला कास-बामणोली भागात अतिवृष्टीचे प्रमाण अधिक आहे. सातारा-बामणोली मार्गावरील कास तलावाच्या दक्षिणेस रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने मुसळधार पावसात कास तलाव पूर्णपणे भरून वाहू लागला की हा पूल पाण्याखाली दिसेनासा होतो. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असते. वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचणाऱ्या नोकरदारवर्गाची तारांबळ उडते.परिसरातील धबधबे निसर्गदृश्य पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना माघारी फिरावे लागत असल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होताना दिसते. या पुलावरून पाणी वाहू लागले की, पलीकडील वाहने पलीकडे तर पुलाच्या अलीकडील वाहने अलीकडे अडकून पडतात. अनेकवेळा पश्चिम भागातील गावांचा संपर्क तुटतो. साताऱ्याहून बामणोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने व सध्या निसर्गरम्य पर्वणीचा आस्वाद घेण्याचा हंगाम असल्याने पर्यटकांसह वाहनचालकांच्या सोयीसाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात येणारे दुर्दैवी प्रसंग टाळले जाऊ शकतात. तसेच संरक्षक दगडावरून पाणी वाहताना पूल ओलांडू नये, हा दर्शनी फलकच बहुतांशी पाण्यात असतो. कास रस्त्यावर दुरवस्थेत असलेला हा फलक वाहनचालकांच्या सहज निदर्शनास येणे आवश्यक आहे. यामुळे कास पुलाची उंची वाढविण्याची मागणी विद्यार्थी, पर्यटक, नोकरदारवर्ग व सर्व वाहनचालकांकडून होत आहे, प्रशासनाने लोकांच्या गैरसोयीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)पुलांची उंची वाढविण्याची मागणीपावसाळ्यात बहुतांश वेळा हा पूल पाण्याखाली जाऊन या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग प्रचंड असतो. तसेच पुलावरून मोठी वर्दळ असल्याने व दोन्ही बाजंूच्या धोकादायक वळणामुळे विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संरक्षक कठड्यांसहित पुलाची उंची वाढविण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे.कास पुलावरून पाणी वाहताना बऱ्याचदा हुल्लडबाजी व स्टंटबाजी करणारी तरुणाई बेभरवशावर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून आपली वाहने पलीकडे घालण्याचा प्रयत्न करतात. यामुळे मोठा अपघाताची संभावना अधिक आहे. तसेच तातडीने वैद्यकीय सेवा भासल्यास वाहतुकीस कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी उपाययोजना तत्काळ होणे आवश्यक आहे. - बाबूराव भोसले, पर्यटक