शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या जागी असलेला थोरला भाऊ गेला; विरहात धाकट्यानंही प्राण सोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 16:58 IST

वडिलांप्रमाणे प्रेम केलेल्या सुखदु:खात सहभागी झालेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. काळजावर दगड ठेवून मोठ्या भावाचे सर्व कार्य पार केले. त्यानंतर रात्री मुंबईला गेले पण विरह सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का आला अन् लहान भावानेही या जगाचा निरोप घेतला. हृदयद्रावक ही घटना जावळी तालुक्यातील पिंपळी येथे घडली.

ठळक मुद्देमोठ्या भावाच्या मृत्यूनंतर लहान भावानेही घेतला जगाचा निरोपविरह असह्य : सर्व विधी उरकून मुंबईला गेल्यानंतर हृदयविकाराचा धक्का

दिलीप पाडळेपाचगणी : वडिलांप्रमाणे प्रेम केलेल्या सुखदु:खात सहभागी झालेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. काळजावर दगड ठेवून मोठ्या भावाचे सर्व कार्य पार केले. त्यानंतर रात्री मुंबईला गेले पण विरह सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का आला अन् लहान भावानेही या जगाचा निरोप घेतला. हृदयद्रावक ही घटना जावळी तालुक्यातील पिंपळी येथे घडली.पिंगळीमध्ये पवार कुुटुंबात चार भावंडे पण एकत्र कुटुंबपध्दत त्यामुळे सर्व कसं आनंदात चाललं होतं. मोठे भाऊ विठ्ठल पवार हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. ते गावीच राहत होते. कुटुंबात त्यांचा शब्द अंतिम असे. इतर भाऊ त्यांचा अंतिम मानत होते. एकमेकांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करत. दु:खात सहभागी होत होते.

पिंपळी येथे सोमवार, दि. ५ माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल महादेव पवार (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने घरात एक निर्वात पोकळी तयार झाली होती. हीच बाब कुटुंबियांच्या मनात घर करून राहिली होती.

दादाच्या निधनानंतर त्याचे मुंबईला वास्तव्यास असणारे तृतीय बंधू सुभाष गावी आले होते. सर्व विधी उरकून ते बुधवार, दि. ७ रोजी सुभाष पुन्हा मुंबईला निघून गेले. मात्र गुरुवार, दि. ८ रोजी रात्री त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा प्रयत्न कुटुंबीय व शेजाऱ्यानी केला पण त्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. आणि सुभाषने जग सोडलं.दादापाठोपाठ लहान्यावरही अंत्यसंस्कारदादांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानेचं यांच्यावरही काळाने घाला घातला. निष्ठुर काळाने नानाची सुभाष नानाच्या जीवनाची दोरी ओढली आणि पवार कटुंबियांवर दु:खाचा आघात केला. ज्या स्मशानभूमीत मोठ्या भावावर अंत्यसंसकार करण्यात आले. तिथंच काही दिवसांत सुभाषवर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीय, नातेवाईकांबरोबरच ग्रामस्थांचे मन हेलावून होते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर