शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

तडीपारीच्या विक्रमानंतर आता मोक्कातही शतक : सातारा पोलिसांची डबल धमाका कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:47 IST

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शंभरपेक्षा जास्त जणांना तडीपार केले. त्यानंतर आता १३ टोळ्यांमधील १०२ जणांवर मोक्का कारवाई करत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवार्इंची डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे.

सातारा जिल्ह्यातील दहशत करून बेकायदा आर्थिक फायदा करणारे, बेकायदेशीर कृत्ये करणारे, अवैध खासगी सावकारी करणारे सराईत गुन्हेगार, मारामारी, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या १३ टोळ्यांवर सर्व पोेलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यामार्फत मोक्काचे प्रस्ताव पाठवले होते. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी १३ प्रस्तावातील १०२ जणांना मोक्का कारवाईस मंजुरी दिली आहे.

यामध्ये २०१६ मध्ये जबरीचोरी गुन्हेगारांच्या १ टोळीमधील ६, २०१७ मध्ये दरोडा टाकून दहशत माजवून मारहाण करत जबरदस्तीने वसुली करणारे ९ टोळीतील ६७ आरोपींवर व २०१८ मध्ये ३ दरोडे टाकून खून करून जबरी चोरी, सावकारीच्या व्याजासाठी दहशत करून वाहने जबरदस्तीने चोरून घेऊन जाणाºया टोळ्यांमध्ये २९ आरोपींवर मोक्का लावण्यात आला. त्यामध्ये रॉयल ऊर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा, प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित ऊर्फ सोन्या देशमुख, आकाश ऊर्फ बाळू खुडे, शेखर गोरे, आशिष जाधव, अनिल कस्तुरे, चंद्रकांत ऊर्फ चंदर लोखंडे, अमित ऊर्फ बिºया कदम, रुकल्या दशरथ, बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांच्या टोळीतील १०२ सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे-पाटील व संदीप पाटील हे हजर झाल्यापासून जनतेतून सावकारी करणारे, खून, जबरीचोरी करणाºया लोकांवर जनतेमधून कारवाईची मागणी होत होती. त्यामुळे जिल्ह्यातून तडीपार करून शतक पूर्ण केल्यानंतर आतापर्यंत १०२ लोकांवर मोक्का अन्वये कारवाईचे शतक पूर्ण केले. येवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.जिल्ह्यातील क्राईम रेट आला खालीसातारा शहरासह जिल्ह्यात बेकायदा दारू, मटका चालवणारे, खासगी सावकारी करणाºया टोळ्या व्यापारी, वाहन चालक व महिलांना १० ते २० टक्के व्याज दराने पैसे देत होते. त्यांनी धमकावणे, मारहाण व अपहरण करत दहशतीने वाहने, जमिनी व घरे स्वत:च्या अगर इतरांच्या नावे करत कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा केली होती. त्यामुळे जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला होता. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडीपारी आणि मोक्काचे हत्यार उपसले. प्रतिबंधक कारवायांमुळे अनेकजणांना जेरबंद तर काही फरार झाल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या आहेत.