शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

तडीपारीच्या विक्रमानंतर आता मोक्कातही शतक : सातारा पोलिसांची डबल धमाका कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:47 IST

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शंभरपेक्षा जास्त जणांना तडीपार केले. त्यानंतर आता १३ टोळ्यांमधील १०२ जणांवर मोक्का कारवाई करत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवार्इंची डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे.

सातारा जिल्ह्यातील दहशत करून बेकायदा आर्थिक फायदा करणारे, बेकायदेशीर कृत्ये करणारे, अवैध खासगी सावकारी करणारे सराईत गुन्हेगार, मारामारी, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या १३ टोळ्यांवर सर्व पोेलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यामार्फत मोक्काचे प्रस्ताव पाठवले होते. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी १३ प्रस्तावातील १०२ जणांना मोक्का कारवाईस मंजुरी दिली आहे.

यामध्ये २०१६ मध्ये जबरीचोरी गुन्हेगारांच्या १ टोळीमधील ६, २०१७ मध्ये दरोडा टाकून दहशत माजवून मारहाण करत जबरदस्तीने वसुली करणारे ९ टोळीतील ६७ आरोपींवर व २०१८ मध्ये ३ दरोडे टाकून खून करून जबरी चोरी, सावकारीच्या व्याजासाठी दहशत करून वाहने जबरदस्तीने चोरून घेऊन जाणाºया टोळ्यांमध्ये २९ आरोपींवर मोक्का लावण्यात आला. त्यामध्ये रॉयल ऊर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा, प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित ऊर्फ सोन्या देशमुख, आकाश ऊर्फ बाळू खुडे, शेखर गोरे, आशिष जाधव, अनिल कस्तुरे, चंद्रकांत ऊर्फ चंदर लोखंडे, अमित ऊर्फ बिºया कदम, रुकल्या दशरथ, बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांच्या टोळीतील १०२ सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे-पाटील व संदीप पाटील हे हजर झाल्यापासून जनतेतून सावकारी करणारे, खून, जबरीचोरी करणाºया लोकांवर जनतेमधून कारवाईची मागणी होत होती. त्यामुळे जिल्ह्यातून तडीपार करून शतक पूर्ण केल्यानंतर आतापर्यंत १०२ लोकांवर मोक्का अन्वये कारवाईचे शतक पूर्ण केले. येवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.जिल्ह्यातील क्राईम रेट आला खालीसातारा शहरासह जिल्ह्यात बेकायदा दारू, मटका चालवणारे, खासगी सावकारी करणाºया टोळ्या व्यापारी, वाहन चालक व महिलांना १० ते २० टक्के व्याज दराने पैसे देत होते. त्यांनी धमकावणे, मारहाण व अपहरण करत दहशतीने वाहने, जमिनी व घरे स्वत:च्या अगर इतरांच्या नावे करत कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा केली होती. त्यामुळे जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला होता. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडीपारी आणि मोक्काचे हत्यार उपसले. प्रतिबंधक कारवायांमुळे अनेकजणांना जेरबंद तर काही फरार झाल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या आहेत.