शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

जावलीतील बाधित गावांचे पुनर्वसन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

कुडाळ : जुलै महिन्यात जावली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळघर भागातील शेती, विहिरी व पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. येथील ...

कुडाळ : जुलै महिन्यात जावली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळघर भागातील शेती, विहिरी व पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. येथील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व बाधित गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, २२ व २३ जुलैला जावलीतील केळघर भागात ढगफुटी होऊन सहाशे मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. याचा वेण्णा नदीच्या काठावर असणाऱ्या बोंडारवाडी, भुतेघर, बाहुळे, वाळंजवाडी, तळोशी तर वाहिटे, मुकवली, वाटंबे, वरोशी, केडंबे, पुनवडी, केळघर, नांदगणे, आंबेघर, डांगरेघर, भामघर, गवडी, करंजे, आसणी भामघर सावली म्हाते कुरळोशी, गाढवली, ओखवडी, भोगवली आदी गावांना फटका बसला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात येथील डोंगरमाथ्यावरील जमिनी खचत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या गावांचे नजिकच्या वनविभागातील जमिनीवर कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, जमिनीची दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन मंडळामार्फत ‘खास बाब’ म्हणून विशेष योजना राबवावी, शेती तयार करण्यासाठी मशिनरी व इंधन पुरवठा व्हावा, बोंडारवाडी ते करंजे गावापर्यंत वेण्णा नदीचे दोन्ही काठ मजबूत करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.