शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

क्षेत्राबाहेरच्या शेतीला फायदा

By admin | Updated: November 20, 2015 00:16 IST

बाणगंगा धरण : पाणी उशाला असूनही पिके जळण्याचा धोका

फलटण : बाणगंगा धरणातील उपलब्ध पाणीसाठा शासन निर्णयानुसार राखून ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांऐवजी बाहेरील शेतीला त्याचा लाभ होत आहे. लाभ क्षेत्रातील पिके उशाला पाणी असूनही जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बाणगंगा नदीवर असलेल्या बाणगंगा धरणाची पाणी साठवण क्षमता ६.४९ द.ल.घ.मी. असून, सध्या या धरणात १. २८ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. तथापि, दि. ७ सप्टेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार धरणातील पाणीसाठे पिण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय धरणातील पाणी वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंत्यांच्या अखत्यारित असलेल्या बाणगंगा धरणातील पाणी साठ्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दि. ३० आॅक्टोबर रोजी लेखी स्वरूपात पाठविली आहे. लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी पाण्याची मागणी असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेच निर्देश प्राप्त झाले नसल्याचे नीरा उजवा कालवा कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान, बाणगंगा धरणाच्या लाभक्षेत्रात १०३६ हेक्टर क्षेत्र असून, आज जवळपास या संपूर्ण क्षेत्रात रब्बीची पिके उभी आहेत. यापूर्वी झालेल्या पावसावर आणि काही प्रमाणात विहिरींच्या पाण्यावर ही पिके आतापर्यंत उभी राहिली. मात्र, आता विहिरीतील पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याची एक पाळी या पिकासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे पाटबंधारे खात्याचे अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडेही केली आहे. मात्र कोणीच त्यांची दाद घेत नसल्याने या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाच्या विरोधात प्रखर आंदोलन छेडण्याच्या विचारात शेतकरी आहेत. आतापर्यंत मोठ्या मेहनतीने आणि कष्टाने आणलेली भुसार पिके केवळ एक पाणी न मिळाल्याने जळून जाण्याचा धोका आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत ही पिके हातची गेल्याने लाभक्षेत्रातील या शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) बेसुमार पाणी उपसा सुरूलाभक्षेत्रातील दालवडी, मांडवखडक, तरटेवस्ती (वाठर-निंबाळकर) वाखरी आदी गावातील सुमारे ३० ते ४० शेतकऱ्यांनी उपसा सिंचनासाठी परवानग्या घेऊन सुमारे १२० हेक्टर क्षेत्रासाठी याच बाणगंगा धरणातून विजेच्या पंपाद्वारे बेसुमार पाणी उपसा सुरू ठेवला आहे. या शेतकऱ्यांना १२० हेक्टर पैकी ३७ हेक्टर क्षेत्र प्रवाही पद्धतीने आणि ८३ हेक्टर क्षेत्रास ठिबक सिंचनाद्वारे पाणी वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्रत्यक्षात प्रवाही आणि ठिबक सिंचनाद्वारे किती क्षेत्र भिजविले जाते याचे मोजमाप केले जात नसल्याने सध्याच्या भीषण दुष्काळी व टंचाई परिस्थितीतून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना डावलून बेसुमार पाणी उपशाला कोणीही मर्यादा घालण्यास पुढे येत नाही. हक्काचे पाणी त्यांना नियमज्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मात्र, कायदे नियम दाखविले जात असल्याने त्यांची उभी पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन योग्य निर्णय घेऊन लाभक्षेत्रातील व लाभक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा. दोन्ही क्षेत्रांतील पिके जळणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.