शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

क्षेत्राबाहेरच्या शेतीला फायदा

By admin | Updated: November 20, 2015 00:16 IST

बाणगंगा धरण : पाणी उशाला असूनही पिके जळण्याचा धोका

फलटण : बाणगंगा धरणातील उपलब्ध पाणीसाठा शासन निर्णयानुसार राखून ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांऐवजी बाहेरील शेतीला त्याचा लाभ होत आहे. लाभ क्षेत्रातील पिके उशाला पाणी असूनही जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बाणगंगा नदीवर असलेल्या बाणगंगा धरणाची पाणी साठवण क्षमता ६.४९ द.ल.घ.मी. असून, सध्या या धरणात १. २८ द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध आहे. तथापि, दि. ७ सप्टेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार धरणातील पाणीसाठे पिण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय धरणातील पाणी वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नीरा उजवा कालवा कार्यकारी अभियंत्यांच्या अखत्यारित असलेल्या बाणगंगा धरणातील पाणी साठ्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दि. ३० आॅक्टोबर रोजी लेखी स्वरूपात पाठविली आहे. लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी पाण्याची मागणी असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतेच निर्देश प्राप्त झाले नसल्याचे नीरा उजवा कालवा कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान, बाणगंगा धरणाच्या लाभक्षेत्रात १०३६ हेक्टर क्षेत्र असून, आज जवळपास या संपूर्ण क्षेत्रात रब्बीची पिके उभी आहेत. यापूर्वी झालेल्या पावसावर आणि काही प्रमाणात विहिरींच्या पाण्यावर ही पिके आतापर्यंत उभी राहिली. मात्र, आता विहिरीतील पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणात उपलब्ध असलेल्या पाण्याची एक पाळी या पिकासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे पाटबंधारे खात्याचे अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडेही केली आहे. मात्र कोणीच त्यांची दाद घेत नसल्याने या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाच्या विरोधात प्रखर आंदोलन छेडण्याच्या विचारात शेतकरी आहेत. आतापर्यंत मोठ्या मेहनतीने आणि कष्टाने आणलेली भुसार पिके केवळ एक पाणी न मिळाल्याने जळून जाण्याचा धोका आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत ही पिके हातची गेल्याने लाभक्षेत्रातील या शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी) बेसुमार पाणी उपसा सुरूलाभक्षेत्रातील दालवडी, मांडवखडक, तरटेवस्ती (वाठर-निंबाळकर) वाखरी आदी गावातील सुमारे ३० ते ४० शेतकऱ्यांनी उपसा सिंचनासाठी परवानग्या घेऊन सुमारे १२० हेक्टर क्षेत्रासाठी याच बाणगंगा धरणातून विजेच्या पंपाद्वारे बेसुमार पाणी उपसा सुरू ठेवला आहे. या शेतकऱ्यांना १२० हेक्टर पैकी ३७ हेक्टर क्षेत्र प्रवाही पद्धतीने आणि ८३ हेक्टर क्षेत्रास ठिबक सिंचनाद्वारे पाणी वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्रत्यक्षात प्रवाही आणि ठिबक सिंचनाद्वारे किती क्षेत्र भिजविले जाते याचे मोजमाप केले जात नसल्याने सध्याच्या भीषण दुष्काळी व टंचाई परिस्थितीतून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना डावलून बेसुमार पाणी उपशाला कोणीही मर्यादा घालण्यास पुढे येत नाही. हक्काचे पाणी त्यांना नियमज्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मात्र, कायदे नियम दाखविले जात असल्याने त्यांची उभी पिके जळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन योग्य निर्णय घेऊन लाभक्षेत्रातील व लाभक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा. दोन्ही क्षेत्रांतील पिके जळणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.