शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचे नियोजन, लोकांचे पालन, कोरोना बाधित अन् मृतांचे कमी प्रमाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर असला, तरी सध्या बाधित आणि मृतांचा आकडा ...

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर असला, तरी सध्या बाधित आणि मृतांचा आकडा कमी झाला आहे. डिसेंबर महिन्यात तर, नोव्हेंबरपेक्षा रुग्ण आणि मृत कमी झालेत. कोरोनाने ६८ जणांचाच मृत्यू झाला आहे. प्रशासनाचे नियोजन, लोकांकडून नियमांचे पालन यामुळेच हे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीला कोरोना बाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २०, तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत गेले. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोना बाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यँत तर कोरोनाने कहर केला. कधी ६००, ७००, तर कधी ८०० च्यावर कोरोना बाधित सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली. असे असले तरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात २३१५४ कोरोना बाधित आढळले, तर १९८६६ जण बरे झाले होते. त्याचबरोबर ७४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. पण, ऑक्टोबर महिन्यात बाधितांचे प्रमाण एकदम कमी आले. अवघे ८१८४ रुग्ण सापडले, तर ३८७ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी होते, तर बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक झाले. १३७१३ कोरोनामुक्त झालेले. प्रथमच कोरोना मुक्तचा आकडा वाढल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला होता.

नोव्हेंबर महिना तर आणखी दिलासादायक ठरला. नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४४५० बाधित निष्पन्न झाले, तर ६६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. तर १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला आहे. डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३५५२ वाढले; तर ३३१२ जण मुक्त झाले, तर ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे प्रमाण आणखी कमी झाले असले तरी बाधितांपेक्षा मुक्त होणाऱ्यांचे थोडे प्रमाण कमी आहे. तरीही जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे, हे जिल्ह्याच्यादृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.

कोट :

जिल्ह्यातील कोरोनाबाधित संख्या कमी झाली आहे. ही बाब सुखावह आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही. यापुढेही लोकांनी शासकीय नियमांचे पालन करावे. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, गर्दी टाळावी. तरच कोरोनावर आपल्याला पूर्णपणे मात करणे शक्य होईल.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी