शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचे नियोजन, लोकांचे पालन, कोरोना बाधित अन् मृतांचे कमी प्रमाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर असला, तरी सध्या बाधित आणि मृतांचा आकडा ...

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी कोरोनाचा कहर असला, तरी सध्या बाधित आणि मृतांचा आकडा कमी झाला आहे. डिसेंबर महिन्यात तर, नोव्हेंबरपेक्षा रुग्ण आणि मृत कमी झालेत. कोरोनाने ६८ जणांचाच मृत्यू झाला आहे. प्रशासनाचे नियोजन, लोकांकडून नियमांचे पालन यामुळेच हे शक्य झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीला कोरोना बाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २०, तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत गेले. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोना बाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यँत तर कोरोनाने कहर केला. कधी ६००, ७००, तर कधी ८०० च्यावर कोरोना बाधित सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली. असे असले तरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात २३१५४ कोरोना बाधित आढळले, तर १९८६६ जण बरे झाले होते. त्याचबरोबर ७४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. पण, ऑक्टोबर महिन्यात बाधितांचे प्रमाण एकदम कमी आले. अवघे ८१८४ रुग्ण सापडले, तर ३८७ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी होते, तर बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक झाले. १३७१३ कोरोनामुक्त झालेले. प्रथमच कोरोना मुक्तचा आकडा वाढल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला होता.

नोव्हेंबर महिना तर आणखी दिलासादायक ठरला. नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४४५० बाधित निष्पन्न झाले, तर ६६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. तर १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला आहे. डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३५५२ वाढले; तर ३३१२ जण मुक्त झाले, तर ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे प्रमाण आणखी कमी झाले असले तरी बाधितांपेक्षा मुक्त होणाऱ्यांचे थोडे प्रमाण कमी आहे. तरीही जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे, हे जिल्ह्याच्यादृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.

कोट :

जिल्ह्यातील कोरोनाबाधित संख्या कमी झाली आहे. ही बाब सुखावह आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही. यापुढेही लोकांनी शासकीय नियमांचे पालन करावे. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, गर्दी टाळावी. तरच कोरोनावर आपल्याला पूर्णपणे मात करणे शक्य होईल.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी