शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

प्रशासन लढतय;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

कोरोनाने कसं जगावं हे शिकवलं; पण काहींना अजून कसं वागावं ते समजलेलं नाही. प्रशासन सांगतय घरात राहा, तर हे ...

कोरोनाने कसं जगावं हे शिकवलं; पण काहींना अजून कसं वागावं ते समजलेलं नाही. प्रशासन सांगतय घरात राहा, तर हे रस्त्यावर फिरताहेत. प्रशासन सांगतय मास्क घाला, तर हे दात काढताहेत. एवढच नव्हे तर संचारबंदीत चौकात उभं राहून प्रशासनावर तोंडसुख घेण्याचा दळभद्रीपणाही काहीजण करताहेत. कडक लॉकडाऊन लावायला पाहिजे, असं काहींचं म्हणणं; पण संचारबंदी आपण किती पाळली, याचा विचार कोण करणार? नाठाळाच्या माथी हाणावी काठी, असं संतवचन आहे; पण या अतिशहाण्यांच्या पाठीवरच पोलिसांची लाठी आता बसायला हवी.

संक्रमण भयावह पद्धतीने पसरलंय. रूग्णालयात जागा नाही. घराघरात रूग्ण तडफडताहेत. किड्या-मुंगीसारखी माणसं मरताहेत. सावरायला कोणी नाही, रडणाराही कुणी नाही.

मी-मी म्हणणारे स्मशानभूमीत वेटिंगवर आहेत आणि अशा परिस्थितीतही आपण शहाणं होऊ नये, हा करंटेपणाच नाही का? हात दाखवून अवलक्षण म्हणतात. आपलही सध्या तेच चाललय. पुढच्याला ठेच लागली की मागच्याने शहाणं व्हावं; पण पुढचा जिवानिशी गेला तरी आपण वेड पांघरून घेतलंय त्याचं काय? शहाणपण देगा देवा, असं आपणच म्हणतो; पण प्रशासन देत असलेलं शहाणपण आपल्या पचनी पडतय का, आपण शहाण्यासारख वागतोय का, याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा.

वास्तविक, कोरोनाला अद्यापही अनेकांनी हलक्यात घेतलय. खांदे उडवून काय होतय, म्हणणारेही उदंड झालेत. एवढच काय तर कोरोनावाढीचं खापर प्रशासनाच्या माथी मारण्यातही काहीजण धन्यता मानताहेत; पण प्रशासनाला दूषणं देताना आपण जबाबदारीने वागतोय का, प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळतोय का, याचाही अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. डोंगर दुरून साजरे दिसतात. स्वर्ग मेल्यानंतर दिसतो. तसंच कोरोना घरापर्यंत आल्याशिवाय त्याचं गांभीर्य आपल्याला समजणार नाही; पण जेव्हा तो येईल तेव्हा पश्चातापाशिवाय हाती काही राहणार नाही, हे नक्कीच.

शेवटी एवढच...

घरी राहा, सुरक्षित राहा. तुमचं कुटुंब ही तुमचीच जबाबदारी.

- संजय पाटील, कऱ्हाड