शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

प्रशासन लढतय;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

कोरोनाने कसं जगावं हे शिकवलं; पण काहींना अजून कसं वागावं ते समजलेलं नाही. प्रशासन सांगतय घरात राहा, तर हे ...

कोरोनाने कसं जगावं हे शिकवलं; पण काहींना अजून कसं वागावं ते समजलेलं नाही. प्रशासन सांगतय घरात राहा, तर हे रस्त्यावर फिरताहेत. प्रशासन सांगतय मास्क घाला, तर हे दात काढताहेत. एवढच नव्हे तर संचारबंदीत चौकात उभं राहून प्रशासनावर तोंडसुख घेण्याचा दळभद्रीपणाही काहीजण करताहेत. कडक लॉकडाऊन लावायला पाहिजे, असं काहींचं म्हणणं; पण संचारबंदी आपण किती पाळली, याचा विचार कोण करणार? नाठाळाच्या माथी हाणावी काठी, असं संतवचन आहे; पण या अतिशहाण्यांच्या पाठीवरच पोलिसांची लाठी आता बसायला हवी.

संक्रमण भयावह पद्धतीने पसरलंय. रूग्णालयात जागा नाही. घराघरात रूग्ण तडफडताहेत. किड्या-मुंगीसारखी माणसं मरताहेत. सावरायला कोणी नाही, रडणाराही कुणी नाही.

मी-मी म्हणणारे स्मशानभूमीत वेटिंगवर आहेत आणि अशा परिस्थितीतही आपण शहाणं होऊ नये, हा करंटेपणाच नाही का? हात दाखवून अवलक्षण म्हणतात. आपलही सध्या तेच चाललय. पुढच्याला ठेच लागली की मागच्याने शहाणं व्हावं; पण पुढचा जिवानिशी गेला तरी आपण वेड पांघरून घेतलंय त्याचं काय? शहाणपण देगा देवा, असं आपणच म्हणतो; पण प्रशासन देत असलेलं शहाणपण आपल्या पचनी पडतय का, आपण शहाण्यासारख वागतोय का, याचाही विचार प्रत्येकाने करायला हवा.

वास्तविक, कोरोनाला अद्यापही अनेकांनी हलक्यात घेतलय. खांदे उडवून काय होतय, म्हणणारेही उदंड झालेत. एवढच काय तर कोरोनावाढीचं खापर प्रशासनाच्या माथी मारण्यातही काहीजण धन्यता मानताहेत; पण प्रशासनाला दूषणं देताना आपण जबाबदारीने वागतोय का, प्रशासनाने घातलेले निर्बंध पाळतोय का, याचाही अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. डोंगर दुरून साजरे दिसतात. स्वर्ग मेल्यानंतर दिसतो. तसंच कोरोना घरापर्यंत आल्याशिवाय त्याचं गांभीर्य आपल्याला समजणार नाही; पण जेव्हा तो येईल तेव्हा पश्चातापाशिवाय हाती काही राहणार नाही, हे नक्कीच.

शेवटी एवढच...

घरी राहा, सुरक्षित राहा. तुमचं कुटुंब ही तुमचीच जबाबदारी.

- संजय पाटील, कऱ्हाड