शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सातारा जिल्ह्यातील ८ नगरपंचायतींच्या कर्मचाऱ्यांचे समायोजन लालफितीत

By admin | Updated: July 15, 2017 12:46 IST

कर्मचारी नवीन वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी

आॅनलाईन लोकमतकोरेगाव(जि. सातारा), दि. १५ : कोरेगाव : राज्य शासनाने तालुका मुख्यालय हे संक्रमित क्षेत्र ग्राह्य धरून प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी नगरपंचायतींची स्थापना केली. शासनाच्या एका निर्णयामुळे अनेक वर्षे ग्रामविकास विभागाकडे सेवा बजावणारे कर्मचारी नगरविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत, मात्र त्यांना अद्याप जुन्या तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. दफ्तर दिरंगाईमुळे दोन वर्षांपासून या कर्मचाऱ्यांचे शासकीय समायोजन रखडले आहे. सध्या हा विषय लालफितीत पडला असून, कर्मचारी नवीन वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी करत आहेत. सातारा जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात कऱ्हाड शहरानजीक असलेल्या मलकापूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केल्याने या नगरपंचायतीला अनेकविध सुविधा व योजनांचा लाभ मिळाला. नगरपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील अत्यंत चांगल्याप्रकारे काम करून राज्यात रोलमॉडेल नगरपंचायत म्हणून मान मिळविला. काँग्रेस-राष्ट्रवादी शासन गेल्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने ग्रामीण भागात पाळेमुळे भक्कम करण्याच्या हेतूने तालुका पातळीसह प्रमुख गावांमध्ये (नव्याने शहर होऊ घातलेल्या) नगरपंचायती स्थापन करण्याचा सपाटा लावला आणि जिल्ह्यात लोणंदला पहिला मान मिळाला. कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा, पाटण व खंडाळा या तालुका मुख्यालयाच्या शहरांमध्ये ग्रामपंचायती बरखास्त करत तेथे नगरपंचायतीची स्थापना शासनाने केली आहे. निर्णय घेत असताना शासनाने दजार्वाढ केला. मात्र त्यासाठी आवश्यक सामुग्री, अधिकारी वर्ग अथवा दिली नाही. पहिले सहा महिने ज्या-त्या तालुक्यांच्या तहसीलदारांकडे प्रशासकपदाचा कार्यभार देण्यात आला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेऊन नव्याने लोकप्रतिनिधींना काम करण्याची संधी दिली. कालांतराने प्रत्येक नगरपंचायतीसाठी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती देखील शासनाने केली.लोकप्रतिनिधी आणि मुख्याधिकाऱ्यांनी कामकाज देखील सुरू केले. मात्र, कर्मचारी चांगलेच लटकले. तब्बल दोन वर्षे उलटत आले तरी ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यात आलेले नाही. या कर्मचाऱ्यांची शासनाने यादी मागवली होती, त्याप्रमाणे प्रत्येक नगरपंचायतीकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागाकडून यादी शासनाला पाठविण्यात आली होती. शासनस्तरावर नव्याने आकृतिबंध तयार करण्यात येत असल्याने या कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले असल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कोणताही अधिकारी याबाबत ठामपणे सांगू शकत नाही. कर्मचाऱ्यांची समायोजनाची प्रक्रिया सुरू नसल्याने त्यांना नव्याने वेतनश्रेणी लागू झालेली नाही. ग्रामपंचायतीत ज्या पगारावर जे काम केले जात होते, अगदी तेच काम नगरपंचायतीत केले जात आहे. त्यासाठी स्वतंत्र कामकाज पद्धतीची माहिती अथवा प्रशिक्षण वर्ग देखील घेण्यात आलेला नाही. वरिष्ठ अधिकारी ज्या प्रमाणे माहिती मागतील, त्यापद्धतीने माहिती देणे आदी कामे दैनंदिन पद्धतीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. ग्रामपंचायतीची ज्या बँकांमध्ये खाती होती, तीच खाती चालू ठेवण्यात आली असून, त्यावरील नाव केवळ बदलण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना जुन्याच पद्धतीने पगार दिला जात असून, हंगामी कर्मचाऱ्यांबाबत देखील कोणतेही धोरण निश्चित झालेले नसल्याने त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उभा आहे.

शासनाने लवकर धोरण ठरवावे : राजाभाऊ बर्गे

शासनाने नगरपंचायतींची स्थापना करून कामकाजाचा व्याप वाढविला आहे. पूर्वी ग्रामविकास विभागाची कामकाजपद्धती वेगळी होती, आता नवीन पद्धत आधुनिक आहे. थेट जिल्हाधिकारी आणि मंत्रालयाशी संपर्क होत आहे. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांबाबत शासनाने लवकरात लवकर धोरण ठरविणे आवश्यक आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, जुन्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना शैक्षणिक पात्रता विचारात घेण्यात यावी, ज्यांची शैक्षणिक पात्रता आहे, त्यांचा प्रामुख्याने विचार करावा; मात्र अन्य कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा, नगरपंचायत कर्मचाऱ्यांना यशदाच्या धर्तीवर स्वतंत्रपणे प्रशिक्षण द्यावे, आदी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या आहेत. नगरपंचायतीचा कारभार करत असताना आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला जाणार आहे, असे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.