शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

खरीप हंगामासाठी खताचा पुरेसा अन् संरक्षितही साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असून कृषी विभागाकडून खते आणि बियाण्यांचे नियोजन सुरू झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असून कृषी विभागाकडून खते आणि बियाण्यांचे नियोजन सुरू झाले आहे. हंगामासाठी १ लाख ६० हजार मेट्रिक टन रासायनिक खत साठा उपलब्ध होणार आहे. तसेच खताचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके असतील, तर युरियाची समस्या निर्माण होते यासाठी संरक्षित साठा जिल्हा स्तरावर ठेवला जाणार आहे. नियोजनामुळे बळिराजाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.

जिल्ह्यात जून महिन्यापासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरवर असते. या हंगामात बाजरी, भात, सोयाबीन, ज्वारी, नाचणी, भुईमूग या प्रमुख पिकांबरोबरच तूर, उडीद, मूग तसेच इतर कडधान्ये घेण्यात येतात. बाजरी आणि सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक राहते. गेल्यावर्षी बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६४ हजार, तर सोयाबीनचे ६३ हजार ७०० हेक्टरवर होते, तर भाताचे सर्वसाधारणपणे ४९ हजार आणि भुईमूगचे ३८ हजार हेक्टरवर क्षेत्र होते, तर इतर पिकांचे क्षेत्र कमी प्रमाणात होते.

जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होतो. त्यातच वेळेत पाऊस झाला तर पेरणीची लगबग सुरू होते. याचा विचार करून कृषी विभाग दोन महिने अगोदर खत आणि बियाण्यांचे नियोजन करतो. यावर्षीही कृषी विभागाचे नियोजन झालेले आहे. कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १ लाख ३० हजार मेट्रिक टन रासायनिक खत साठ्याची मागणी केली आहे, तर शासनाकडून १ लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन खत साठा मंजूरही झाला आहे. त्याचबरोबर सध्या ४२ हजार ६२२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. यामुळे खरीप हंगामासाठी सर्व मिळून १ लाख ६० हजार ३५२ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध होणार आहे. परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.

चौकट :

युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा मंजूर...

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते कमी पडू नयेत, वितरण विस्कळीत होऊ नये यासाठी जिल्हास्तरावरून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच खत टंचाई भासू नये, काळाबाजार होऊ नये यासाठी भरारीपथके आणि नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर खरिपात युरिया खताची मागणी अधिक असते. त्यामुळे समस्या निर्माण होतात. यासाठी ५० हजार मेट्रिक टन युरिया खताचा साठा जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे, अशी माहितीही कृषी विभागातून देण्यात आली.

.........................................

कोट :

खरीप हंगामासाठी खताचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. विशेषत: युरियाची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ४५०० मेट्रिक टन संरक्षित साठाही जिल्हास्तरावर ठेवण्यात येणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नियोजन आहे.

- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.

......................................................