शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी खताचा पुरेसा अन् संरक्षितही साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असून कृषी विभागाकडून खते आणि बियाण्यांचे नियोजन सुरू झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असून कृषी विभागाकडून खते आणि बियाण्यांचे नियोजन सुरू झाले आहे. हंगामासाठी १ लाख ६० हजार मेट्रिक टन रासायनिक खत साठा उपलब्ध होणार आहे. तसेच खताचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके असतील, तर युरियाची समस्या निर्माण होते यासाठी संरक्षित साठा जिल्हा स्तरावर ठेवला जाणार आहे. नियोजनामुळे बळिराजाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.

जिल्ह्यात जून महिन्यापासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरवर असते. या हंगामात बाजरी, भात, सोयाबीन, ज्वारी, नाचणी, भुईमूग या प्रमुख पिकांबरोबरच तूर, उडीद, मूग तसेच इतर कडधान्ये घेण्यात येतात. बाजरी आणि सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक राहते. गेल्यावर्षी बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६४ हजार, तर सोयाबीनचे ६३ हजार ७०० हेक्टरवर होते, तर भाताचे सर्वसाधारणपणे ४९ हजार आणि भुईमूगचे ३८ हजार हेक्टरवर क्षेत्र होते, तर इतर पिकांचे क्षेत्र कमी प्रमाणात होते.

जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होतो. त्यातच वेळेत पाऊस झाला तर पेरणीची लगबग सुरू होते. याचा विचार करून कृषी विभाग दोन महिने अगोदर खत आणि बियाण्यांचे नियोजन करतो. यावर्षीही कृषी विभागाचे नियोजन झालेले आहे. कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १ लाख ३० हजार मेट्रिक टन रासायनिक खत साठ्याची मागणी केली आहे, तर शासनाकडून १ लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन खत साठा मंजूरही झाला आहे. त्याचबरोबर सध्या ४२ हजार ६२२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. यामुळे खरीप हंगामासाठी सर्व मिळून १ लाख ६० हजार ३५२ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध होणार आहे. परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.

चौकट :

युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा मंजूर...

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते कमी पडू नयेत, वितरण विस्कळीत होऊ नये यासाठी जिल्हास्तरावरून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच खत टंचाई भासू नये, काळाबाजार होऊ नये यासाठी भरारीपथके आणि नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर खरिपात युरिया खताची मागणी अधिक असते. त्यामुळे समस्या निर्माण होतात. यासाठी ५० हजार मेट्रिक टन युरिया खताचा साठा जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे, अशी माहितीही कृषी विभागातून देण्यात आली.

.........................................

कोट :

खरीप हंगामासाठी खताचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. विशेषत: युरियाची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ४५०० मेट्रिक टन संरक्षित साठाही जिल्हास्तरावर ठेवण्यात येणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नियोजन आहे.

- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.

......................................................