शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
2
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
3
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
5
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
6
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
8
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
9
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
11
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
12
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
13
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
14
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
15
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
16
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
17
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
18
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
19
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
20
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा

खरीप हंगामासाठी खताचा पुरेसा अन् संरक्षितही साठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असून कृषी विभागाकडून खते आणि बियाण्यांचे नियोजन सुरू झाले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असून कृषी विभागाकडून खते आणि बियाण्यांचे नियोजन सुरू झाले आहे. हंगामासाठी १ लाख ६० हजार मेट्रिक टन रासायनिक खत साठा उपलब्ध होणार आहे. तसेच खताचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके असतील, तर युरियाची समस्या निर्माण होते यासाठी संरक्षित साठा जिल्हा स्तरावर ठेवला जाणार आहे. नियोजनामुळे बळिराजाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.

जिल्ह्यात जून महिन्यापासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरवर असते. या हंगामात बाजरी, भात, सोयाबीन, ज्वारी, नाचणी, भुईमूग या प्रमुख पिकांबरोबरच तूर, उडीद, मूग तसेच इतर कडधान्ये घेण्यात येतात. बाजरी आणि सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक राहते. गेल्यावर्षी बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६४ हजार, तर सोयाबीनचे ६३ हजार ७०० हेक्टरवर होते, तर भाताचे सर्वसाधारणपणे ४९ हजार आणि भुईमूगचे ३८ हजार हेक्टरवर क्षेत्र होते, तर इतर पिकांचे क्षेत्र कमी प्रमाणात होते.

जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होतो. त्यातच वेळेत पाऊस झाला तर पेरणीची लगबग सुरू होते. याचा विचार करून कृषी विभाग दोन महिने अगोदर खत आणि बियाण्यांचे नियोजन करतो. यावर्षीही कृषी विभागाचे नियोजन झालेले आहे. कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १ लाख ३० हजार मेट्रिक टन रासायनिक खत साठ्याची मागणी केली आहे, तर शासनाकडून १ लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन खत साठा मंजूरही झाला आहे. त्याचबरोबर सध्या ४२ हजार ६२२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. यामुळे खरीप हंगामासाठी सर्व मिळून १ लाख ६० हजार ३५२ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध होणार आहे. परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.

चौकट :

युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा मंजूर...

खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते कमी पडू नयेत, वितरण विस्कळीत होऊ नये यासाठी जिल्हास्तरावरून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच खत टंचाई भासू नये, काळाबाजार होऊ नये यासाठी भरारीपथके आणि नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर खरिपात युरिया खताची मागणी अधिक असते. त्यामुळे समस्या निर्माण होतात. यासाठी ५० हजार मेट्रिक टन युरिया खताचा साठा जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे, अशी माहितीही कृषी विभागातून देण्यात आली.

.........................................

कोट :

खरीप हंगामासाठी खताचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. विशेषत: युरियाची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ४५०० मेट्रिक टन संरक्षित साठाही जिल्हास्तरावर ठेवण्यात येणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नियोजन आहे.

- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.

......................................................