शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

एकजुटीने कऱ्हाडच्या लौकिकात भर घालावी

By admin | Updated: March 23, 2015 00:46 IST

शांतता कमिटीच्या बैठकीत चव्हाण यांचे आवाहन

कऱ्हाड : ‘संवेदनशील शहर म्हणून निर्माण झालेली कऱ्हाडची ओळख आपल्याला पुसायची आहे. सर्वांनी एकजुटीने राहून शहराच्या नावलौकिकात भर घालणे गरजेचे आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.कऱ्हाड शहर पोलिसांच्या वतीने अर्बन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, भाजपाचे भरत पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंंदे यांच्यासह नागरिक, विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘यापूर्वी झालेल्या काही दुर्देवी घटनांमुळे कऱ्हाडची ओळख संवेदनशील शहर अशी झाली आहे. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यामध्ये नागरिकांचा मोठा वाटा आहे. कऱ्हाडचा नावलौकिक वाढून शहराच्या वैभवात भर पडावी, यासाठी आपण मुख्यमंत्री म्हणून कोट्यवधींचा निधी दिला आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कऱ्हाडच्या नावलौकिकाला गालबोट लागू नये, असा सर्वांचाच प्रयत्न असला पाहिजे.’ आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘ज्या घटनेच्या अनुषंगाने ही शांतता समितीची बैठक आयोजित केली आहे, त्या उंब्रजकरांचे मनोगत विचारात घेणे आवश्यक आहे.’ प्रारंभी डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘कऱ्हाडने देशाला तसेच राज्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे,’ असे सांगितले. आमदार आनंदराव पाटील, फारुख पटवेकर, विनायक पावसकर, मजहर कागदी, नितीन काशीद, आनंदराव लादे, अप्पा गायकवाड, शिल्पा वाळिंबे, मुुकुंद कुलकर्णी, हणमंतराव पवार, सागर बर्गे यावेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)