शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

एकजुटीने कऱ्हाडच्या लौकिकात भर घालावी

By admin | Updated: March 23, 2015 00:46 IST

शांतता कमिटीच्या बैठकीत चव्हाण यांचे आवाहन

कऱ्हाड : ‘संवेदनशील शहर म्हणून निर्माण झालेली कऱ्हाडची ओळख आपल्याला पुसायची आहे. सर्वांनी एकजुटीने राहून शहराच्या नावलौकिकात भर घालणे गरजेचे आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.कऱ्हाड शहर पोलिसांच्या वतीने अर्बन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार सुधाकर भोसले, भाजपाचे भरत पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंंदे यांच्यासह नागरिक, विविध संघटना, पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘यापूर्वी झालेल्या काही दुर्देवी घटनांमुळे कऱ्हाडची ओळख संवेदनशील शहर अशी झाली आहे. मात्र, गेल्या दहा-बारा वर्षांत हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यामध्ये नागरिकांचा मोठा वाटा आहे. कऱ्हाडचा नावलौकिक वाढून शहराच्या वैभवात भर पडावी, यासाठी आपण मुख्यमंत्री म्हणून कोट्यवधींचा निधी दिला आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे कऱ्हाडच्या नावलौकिकाला गालबोट लागू नये, असा सर्वांचाच प्रयत्न असला पाहिजे.’ आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘ज्या घटनेच्या अनुषंगाने ही शांतता समितीची बैठक आयोजित केली आहे, त्या उंब्रजकरांचे मनोगत विचारात घेणे आवश्यक आहे.’ प्रारंभी डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘कऱ्हाडने देशाला तसेच राज्याला नवी दिशा देण्याचे काम केले आहे,’ असे सांगितले. आमदार आनंदराव पाटील, फारुख पटवेकर, विनायक पावसकर, मजहर कागदी, नितीन काशीद, आनंदराव लादे, अप्पा गायकवाड, शिल्पा वाळिंबे, मुुकुंद कुलकर्णी, हणमंतराव पवार, सागर बर्गे यावेळी भाषणे झाली. (प्रतिनिधी)