शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

उडतारे गावाचा उत्तरप्रदेशमध्ये समावेश करावा

By admin | Updated: May 2, 2017 18:46 IST

ग्रामसभेचा ठराव : महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशचे सरकार शेतकऱ्यांबाबतीत संवेदनशील

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. 0२ : वाई तालुक्यातील उडतारे या गावाचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या उत्तरप्रदेश राज्यात समावेश करावा, अशी खळबळजनक मागणी १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आली.महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच स्वप्नील निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत शेतकरी कर्जमाफीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत शेती उत्पादनाला भाव नाही, पिकावर खर्च केलेले भांडवलदेखील परत मिळत नाही. अशात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने वर्षभर शेतीसाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. उडतारे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिके घेतात. मात्र, पाणीटंचाईमुळे नगदी पिकाची लागवड करणे अशक्य झाले आहे. कडधान्य, गळिताची धान्ये, तृणधान्य यातील कशालाही भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले आहे. त्यात अनेक सहकारी, सरकारी बँकांच्या कजार्चा डोंगर डोक्यावर आहे, म्हणून ग्रामस्थांनी १ मेच्या ग्रामसभेत तीन ठराव मंजूर केले आहेत. कुणाल सुनील बाबर यांनी ठराव मांडला. प्रवीण तानाजी पवार यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिले. गेले अनेक दिवस शेतकरी कर्जमाफीसाठी मायबाप सरकारकडे आस लावून बघत आहे; परंतु पदरी निराशाच पडत आहे. जर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास असमर्थ असेल तर शेतकऱ्यांची संवेदनशीलता जाणून घेऊन उत्तरप्रदेश राज्यात कर्जमाफी जाहीर केली आहे. उडतारे गावाचा समावेश शेतकऱ्यांची संवेदनशीलता जाणणाऱ्या उत्तरप्रदेश राज्यात व्हावा, या मागणीला ग्रामसभेने मंजुरी दिली. ग्रामसभेत मंजूर झालेले ठराव- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.- शेती उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के अधिक हमीभाव द्यावा.- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात.