शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

शिकारीच्या चौकशीसाठी कार्यकर्ते ‘तरस’ले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 21:23 IST

फलटण : फलटण तालुक्यात वनविभागाच्या मनमानी कारभारामुळे वृक्षतोड वाढण्याबरोबरच तरसाची शिकार करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देतालुक्यात वृक्षतोड, जनावरांची अवैध वाहतूक डोंगराळ भागात नागपंचमीला तरसाची शिकार ग्रामस्थांच्या सहकार्याने शिकाºयांना पकडता आले असतेशासनाने चांगल्या प्रतीच्या गाड्याही अधिकाºयांना दिल्या आहेत

फलटण : फलटण तालुक्यात वनविभागाच्या मनमानी कारभारामुळे वृक्षतोड वाढण्याबरोबरच तरसाची शिकार करण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. माहिती देऊनही शिकार झाल्याने अद्यापही संबंधितांविरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही. तसेच शिकार प्रकरणाची चौकशीही सुरू न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, जनतेतून होत आहे.नागपंचमीला शिकार करण्याची प्रथा पूर्वी अनेक भागात होती. काळाच्या ओघात तसेच वन्यजीवच्या संरक्षण कायद्यामुळे शिकारीचे प्रमाण कमी झाले असले तरी वनविभागाने सावध राहण्याची नितांत गरज होती. फलटण तालुक्यातही काहीजण शिकार करीत असतात. शिकाºयांना प्राणी कोणत्या भागात आहेत, याची माहिती लागलेली असते.यावर्षी नागपंचमीला शिकारीच्या शक्यतेबाबत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड रिसर्च सोसायटीने अगोदरच माहिती दिली होती. त्या पद्धतीने वनाधिकाºयांनी पूर्वतयारीने सावधानता बाळगून शिकाºयांवर पाळत ठेवणे गरजेचे होते. तसेच बंदोबस्तात वाढ करणे आवश्यक होते. शासनाने चांगल्या प्रतीच्या गाड्याही अधिकाºयांना दिल्या आहेत. मात्र, वनविभाग व अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने विंचुर्णी, ता. फलटणच्या डोंगराळ भागात नागपंचमीला तरसाची शिकार झाली. या तरसाचे मारून मारून हाल करण्यात आले. नंतर शिकारी पसार झाले. याबाबतची माहिती सर्वांना देऊन शिकाºयांवर कारवाई करण्याची गरज होती. मात्र, हे प्रकरण दडपण्याचाच अधिकाºयांनी प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिकारीची माहिती ग्रामस्थांना मिळाली नाही. ग्रामस्थांच्या सहकार्याने शिकाºयांना पकडता आले असते.गुपचूप शिकार करण्याचे काम...फलटण तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या आहे. त्यामुळे शिकारीही या भागात लक्ष ठेवून असतात. अनेकवेळा गुपचूप शिकार केली जाते. मात्र, त्याचा पत्ता लागत नाही. असाच प्रकार तरसाच्या शिकारीच्या बाबतीत घडला असता. आता ही घटना उघडकीस आल्याने वनविभागाचा कारभार संशयात सापडला आहे. तालुक्यात वृक्षतोड, जनावरांची अवैध वाहतूक होते. या घटना वाढूनही वनविभाग लक्ष देत नाही. आतातरी संबंधितांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

मुळातच दुर्मीळ होत असणाºया तरस या प्राण्याची शिकार होणे दुर्दैवी आहे. वनविभागाने वेळीच लक्ष दिले असते तर शिकारीचा प्रकार घडला नसता. वनविभागाचा कारभार रामभरोसे असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी.- विक्रम चोरमले,सामाजिक कार्यकर्ते